शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

आठ पोलीस उपायुक्तांना हवी बदली

By admin | Updated: April 7, 2017 02:44 IST

९० टक्के पोलीस अधिकाऱ्यांना नागपुरातून बदली हवी आहे. काहींना मुंबई, पुण्यात पाहिजे तर काहींना कुठेही दिली तरी चालेल,

गृह विभागाला साकडे: चौघांचा सेवाकाळ पूर्ण नरेश डोंगरे नागपूर९० टक्के पोलीस अधिकाऱ्यांना नागपुरातून बदली हवी आहे. काहींना मुंबई, पुण्यात पाहिजे तर काहींना कुठेही दिली तरी चालेल, मात्र येथून बदली करून पाहिजे. होय, आधीच वरिष्ठ पोलीस अधिकारी नागपुरात रुजू व्हायला तयार नसताना नऊपैकी आठ पोलीस उपायुक्तांनी नागपुरातून बदली हवी म्हणून गृह विभागाला साकडे घातले आहे. चार उपायुक्तांचा सेवाकाळ पूर्ण झाल्यामुळे त्यांची बदली होणे, अपेक्षितच आहे तर चार उपायुक्तांना वेगवेगळ्या कारणामुळे बदली हवी आहे.झपाट्याने प्रगतीकडे झेपावणारे शहर म्हणून देशात नागपूरचे नाव घेतले जात असले तरी या शहरात काम करण्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची खास करून आयपीएस कॅडरच्या अधिकाऱ्यांची अजिबात इच्छा नसते, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. येथे बदली झालेले अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी नागपुरात रुजू न होताच बदली रद्द करवून घेण्याच्या कामी लागतात. त्यात यश न आलेली मंडळी येथे रुजू तर होतात मात्र लगेच येथून काढता पाय घेतात. बदली झाल्यानंतर येथे रुजूच न झालेल्या किंवा अगदी चार-सहा महिन्यातच येथून अधिकाऱ्यांनी बदली करवून घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.  

आठ पोलीस उपायुक्तांना हवी बदली अतिरिक्त आयुक्त दैठणकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुहास वारके, सहआयुक्त संतोष रस्तोगी, उपायुक्त जी. श्रीधर, एम. राजकुमार ही त्यातील काही नावे आहेत. अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झालेले विक्रमसिंह पाटणकर यांचीही लगेच पदोन्नतीवर नागपुरातून बदली झाली. आता येथे कार्यरत असलेल्या नऊपैकी आठ पोलीस उपायुक्त (परिमंडळ - ३ चे संभाजी कदम वगळता) बदलीसाठी उत्सूक आहेत. त्यापैकी परिमंडळ पाचचे उपायुक्त अभिनाश कुमार, गुन्हे शाखेचे (डिटेक्शन) रंजनकुमार शर्मा आणि गुन्हे शाखेचेच (ईओडब्ल्यू) ईशू सिंधू यांचा तीन वर्षांचा तसेच परिमंडळ एकच्या (दोनचाही अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या) उपायुक्त दीपाली मासिरकर यांचाही अडीच वर्षांचा सेवाकालावधी झाला आहे. त्यामुळे या चार अधिकाऱ्यांची बदली अपेक्षितच आहे.मात्र, अन्य पोलीस उपायुक्तांपैकी वाहतूक शाखेच्या स्मार्तना पाटील, विशेष शाखेसह परिमंडळ चारची जबाबदारी सांभाळणारे उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी, परिमंडळ दोनचे राकेश कलासागर, प्रशासन सांभाळणारे सुहास बावचे यांना येथे अजून एक वर्ष पूर्ण व्हायचेच आहे. परंतु त्यांनाही नागपुरातून बदली हवी आहे. त्यासाठी आवश्यक औपचारिकता संबंधितांकडून करण्यात आल्याची माहिती आहे. अतिरिक्त आयुक्त दैठणकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुहास वारके, सहआयुक्त संतोष रस्तोगी, उपायुक्त जी. श्रीधर, एम. राजकुमार ही त्यातील काही नावे आहेत. अतिरिक्त आयुक्त म्हणून रुजू झालेले विक्रमसिंह पाटणकर यांचीही लगेच पदोन्नतीवर नागपुरातून बदली झाली. आता येथे कार्यरत असलेल्या नऊपैकी आठ पोलीस उपायुक्त (परिमंडळ - ३ चे संभाजी कदम वगळता) बदलीसाठी उत्सूक आहेत. त्यापैकी परिमंडळ पाचचे उपायुक्त अभिनाश कुमार, गुन्हे शाखेचे (डिटेक्शन) रंजनकुमार शर्मा आणि गुन्हे शाखेचेच (ईओडब्ल्यू) ईशू सिंधू यांचा तीन वर्षांचा तसेच परिमंडळ एकच्या (दोनचाही अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या) उपायुक्त दीपाली मासिरकर यांचाही अडीच वर्षांचा सेवाकालावधी झाला आहे. त्यामुळे या चार अधिकाऱ्यांची बदली अपेक्षितच आहे. मात्र, अन्य पोलीस उपायुक्तांपैकी वाहतूक शाखेच्या स्मार्तना पाटील, विशेष शाखेसह परिमंडळ चारची जबाबदारी सांभाळणारे उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी, परिमंडळ दोनचे राकेश कलासागर, प्रशासन सांभाळणारे सुहास बावचे यांना येथे अजून एक वर्ष पूर्ण व्हायचेच आहे. परंतु त्यांनाही नागपुरातून बदली हवी आहे. त्यासाठी आवश्यक औपचारिकता संबंधितांकडून करण्यात आल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी) सिंधू जाणार दिल्लीला विशेष म्हणजे, बदलीची मागणी करणाऱ्या उपरोक्त अधिकाऱ्यांपैकी बहुतांश उपायुक्तांनी मुंबई-पुण्याला पहिली पसंती दिली आहे. बदलींच्या यादीत सर्वात पहिले आणि पक्के नाव पोलीस उपायुक्त ईशू सिंधू यांचे आहे. त्यांची दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात बदली पक्की झाली आहे. केवळ कागदोपत्री प्रक्रिया आणि कार्यमुक्तीची औपचारिकता बाकी आहे. उर्वरित अधिकाऱ्यांपैकी दीपाली मासिरकर यांची मुंबईला बदली होणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे. अभिनाश कुमार आणि रंजनकुमार शर्मा यांना मुंबई, पुणे किंवा चांगले जिल्हे मिळण्याची शक्यता आहे. नागपुरात यायला पोलीस अधिकारी तयार नसतात. त्यामुळे अन्य चार अधिकाऱ्यांच्या बदली अर्जावर पुढच्या टप्प्यात विचार केला जाणार असल्याची माहिती आहे. --- ---