शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

नागपुरात  आठ विमाने उशिरा पोहोचली, चक्रीवादळामुळे कोलकाताची उड्डाणे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:36 AM

. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठ विमाने उशिरा पोहोचली. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले.

ठळक मुद्देगो एअरच्या विमानाला तीन तास विलंब

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : देशाच्या अन्य शहरांमधून नागपुरात विविध कंपन्यांच्या विमानांच्या लेटलतिफीचा क्रम सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत धुके असल्याने अनेक विमाने नागपुरात उशिरा आली होती. शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आठ विमाने उशिरा पोहोचली. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत राहावे लागले.याशिवाय बंगालच्या उपमहासागरात ‘बुलबुल’ चक्रीवादळामुळे कोलकाता विमानतळावरील सर्व विमानांचे उड्डाण शनिवारी सायंकाळी ६ ते सकाळी ६ पर्यंत रद्द करण्यात आले आहे. त्याचा फटका प्रवाशांना बसला. नागपुरातून कोलकाताला जाणारे इंडिगोचे विमान आणि कोलकाताहून नागपुरात येणारी दोन विमाने रद्द करण्यात आली आहेत.गो एअरचे जी८२८३ पुणे-नागपूर विमान सकाळी ८.५५ ऐवजी तब्बल ३ तास उशिरा ११.५५ वाजता आणि एअर इंडियाचे एआय६२९ मुंबई- नागपूर विमान रात्री ८.३५ मिनिटांऐवजी दोन तास उशिरा पोहोचले. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. एअर इंडियाच्या काऊंटरवर विचारपूस केली असता, काहीही उत्तर मिळाले नाही.इंडिगोच्या ६ई५६३ चेन्नई-नागपूर विमान १ तास ५ मिनिटे उशिरा दुपारी १ ऐवजी २.०५ वाजता, इंडिगोचे मुंबई-नागपूर विमान ३५ मिनिटे विलंबाने दुपारी १.४० वाजता, इंडिगोचेच ६ई४०३ मुंबई-नागपूर विमान ३३ मिनिटे उशिरा सायंकाळी ६.०३ वाजता, गो एअरचे दिल्ली-नागपूर विमान ३२ मिनिटे विलंबाने रात्री ९.२७ वाजता, इंडिगोचे ६ई५३७७ मुंबई-नागपूर विमान ३० मिनिटे उशिराने रात्री १०.१५ वाजता आणि गो एअरचे जी८ ७१२ बेंगळुरू-नागपूर विमान ३० मिनिटे उशिरा मध्यरात्रीनंतर आले. याशिवाय गो एअरचे जी८१४१ नागपूर-मुंबई विमान दुपारी ३ तास उशिरा विलंबाने मुंबईला पोहोचल्याची माहिती आहे.

टॅग्स :IndigoइंडिगोDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर