शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
12
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
13
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
14
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
15
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

प्रभावी सुविचार हे विद्यार्थ्यांसाठी ‘अ‍ॅन्टीव्हायरस’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:17 IST

तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान व शहाणपण यांचे एकत्रित बीजारोपण होणे अत्यावश्यक आहे. विविध ज्ञान, कौशल्य ग्रहण करत असताना विद्यार्थ्यांच्या डोक्यात नकोसे विचारदेखील शिरतात. प्रभावी सुविचार हे अशा नकोशा विचारांना मेंदूतून काढण्यासाठी ‘अ‍ॅन्टीव्हायरस’चे काम करतात. शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत ‘माफसू’चे (महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरीज् सायन्स युनिव्हर्सिटी) कुलगुरू डॉ.आशिष पातूरकर यांनी व्यक्त केले. शिक्षकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे गुरुवारी उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देआशिष पातूरकर : नागपूर विद्यापीठात उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान व शहाणपण यांचे एकत्रित बीजारोपण होणे अत्यावश्यक आहे. विविध ज्ञान, कौशल्य ग्रहण करत असताना विद्यार्थ्यांच्या डोक्यात नकोसे विचारदेखील शिरतात. प्रभावी सुविचार हे अशा नकोशा विचारांना मेंदूतून काढण्यासाठी ‘अ‍ॅन्टीव्हायरस’चे काम करतात. शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत ‘माफसू’चे (महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरीज् सायन्स युनिव्हर्सिटी) कुलगुरू डॉ.आशिष पातूरकर यांनी व्यक्त केले. शिक्षकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे गुरुवारी उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे होते. सोबतच प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले व प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी, वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे हेदेखील उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ.प्रकाश इटनकर व डॉ.चंद्रशेखर साखळे यांना उत्कृष्ट शिक्षक, डॉ. वासुदेव गुरनुले यांना उत्कृष्ट संशोधक तर डॉ.राजेंद्र नाईकवाडे यांना उत्कृष्ट लेखक हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. आजच्या काळात पुस्तकी धडे, कौशल्य हे तर आवश्यक आहेच. मात्र विद्यार्थ्यांच्या मनातील मानवी मूल्यांचे संवर्धन करण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे. ज्ञान आणि शहाणपण यांचे एकत्र बीजारोपण होणे आवश्यक आहे, असे डॉ.आशिष पातूरकर म्हणाले. शिक्षण हा केवळ एक व्यवसाय नसून ते सदासर्वदा आचरण्याचे एक व्रत आहे. वेळेच्या बंधनात शिक्षकाला अडकवता येऊ शकत नाही. विद्येच्या माध्यमातून मिळविलेली प्रतिष्ठा ही शाश्वत असते. कोचिंग क्लासेसच्या मागे लागून पैसा मिळविणारा व्यक्ती खरा शिक्षक होऊ शकत नाही. त्यामुळे खऱ्या शिक्षकांनी नीतीमत्तेचा मार्ग धरून चालायला हवे. तसेच संत कबीर आणि डॉ, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा मार्ग सर्वांनी अनुसरायला हवा, असा सल्ला कुलगुरू डॉ.काणे यांनी दिला. डॉ.प्रमोद येवले यांनी प्रास्ताविक केले व कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली. डॉ.कोमल ठाकरे यांनी संचालन केले तर डॉ.नीरज खटी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध प्राधिकारिणी सदस्य, प्राचार्य, विद्यापीठाचे विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठTeacherशिक्षक