शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
4
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
5
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
6
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
7
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
9
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
10
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
11
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
12
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
13
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
14
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
15
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
16
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
17
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
18
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
19
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
20
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार

प्रभावी सुविचार हे विद्यार्थ्यांसाठी ‘अ‍ॅन्टीव्हायरस’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:17 IST

तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान व शहाणपण यांचे एकत्रित बीजारोपण होणे अत्यावश्यक आहे. विविध ज्ञान, कौशल्य ग्रहण करत असताना विद्यार्थ्यांच्या डोक्यात नकोसे विचारदेखील शिरतात. प्रभावी सुविचार हे अशा नकोशा विचारांना मेंदूतून काढण्यासाठी ‘अ‍ॅन्टीव्हायरस’चे काम करतात. शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत ‘माफसू’चे (महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरीज् सायन्स युनिव्हर्सिटी) कुलगुरू डॉ.आशिष पातूरकर यांनी व्यक्त केले. शिक्षकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे गुरुवारी उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.

ठळक मुद्देआशिष पातूरकर : नागपूर विद्यापीठात उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान व शहाणपण यांचे एकत्रित बीजारोपण होणे अत्यावश्यक आहे. विविध ज्ञान, कौशल्य ग्रहण करत असताना विद्यार्थ्यांच्या डोक्यात नकोसे विचारदेखील शिरतात. प्रभावी सुविचार हे अशा नकोशा विचारांना मेंदूतून काढण्यासाठी ‘अ‍ॅन्टीव्हायरस’चे काम करतात. शिक्षकांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत ‘माफसू’चे (महाराष्ट्र अ‍ॅनिमल अ‍ॅन्ड फिशरीज् सायन्स युनिव्हर्सिटी) कुलगुरू डॉ.आशिष पातूरकर यांनी व्यक्त केले. शिक्षकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे गुरुवारी उत्कृष्ट शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.दीक्षांत सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे होते. सोबतच प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले व प्रभारी कुलसचिव डॉ.नीरज खटी, वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे हेदेखील उपस्थित होते. कार्यक्रमात डॉ.प्रकाश इटनकर व डॉ.चंद्रशेखर साखळे यांना उत्कृष्ट शिक्षक, डॉ. वासुदेव गुरनुले यांना उत्कृष्ट संशोधक तर डॉ.राजेंद्र नाईकवाडे यांना उत्कृष्ट लेखक हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. आजच्या काळात पुस्तकी धडे, कौशल्य हे तर आवश्यक आहेच. मात्र विद्यार्थ्यांच्या मनातील मानवी मूल्यांचे संवर्धन करण्याचे मोठे आव्हान शिक्षकांसमोर आहे. ज्ञान आणि शहाणपण यांचे एकत्र बीजारोपण होणे आवश्यक आहे, असे डॉ.आशिष पातूरकर म्हणाले. शिक्षण हा केवळ एक व्यवसाय नसून ते सदासर्वदा आचरण्याचे एक व्रत आहे. वेळेच्या बंधनात शिक्षकाला अडकवता येऊ शकत नाही. विद्येच्या माध्यमातून मिळविलेली प्रतिष्ठा ही शाश्वत असते. कोचिंग क्लासेसच्या मागे लागून पैसा मिळविणारा व्यक्ती खरा शिक्षक होऊ शकत नाही. त्यामुळे खऱ्या शिक्षकांनी नीतीमत्तेचा मार्ग धरून चालायला हवे. तसेच संत कबीर आणि डॉ, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा मार्ग सर्वांनी अनुसरायला हवा, असा सल्ला कुलगुरू डॉ.काणे यांनी दिला. डॉ.प्रमोद येवले यांनी प्रास्ताविक केले व कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विषद केली. डॉ.कोमल ठाकरे यांनी संचालन केले तर डॉ.नीरज खटी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध प्राधिकारिणी सदस्य, प्राचार्य, विद्यापीठाचे विभागप्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठTeacherशिक्षक