शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

बोंडअळीचा परिणाम : नागपूर जिल्ह्यात कापसाच्या पेऱ्यात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:41 IST

गेल्या वर्षी कापसाच्या पिकावर बोंडअळीचा झालेला परिणाम लक्षात घेता, यंदा कृषी विभागाने केलेल्या नियोजनात कापसाच्या क्षेत्रात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही घट किमान २ हजार हेक्टरपर्यंत असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाने जिल्ह्यासाठी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्दे५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर खरीपाचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या वर्षी कापसाच्या पिकावर बोंडअळीचा झालेला परिणाम लक्षात घेता, यंदा कृषी विभागाने केलेल्या नियोजनात कापसाच्या क्षेत्रात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही घट किमान २ हजार हेक्टरपर्यंत असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाने जिल्ह्यासाठी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे.कृषी विभागाचा कापसाच्या लागवडीत घट झाल्याचा अंदाज असला तरी, सर्वाधिक क्षेत्र हे कापूस पिकाने व्यापले आहे. जिल्ह्यात २ लाख २५ हजार हेक्टर कापसाचे लागवडीचे क्षेत्र राहणार असल्याची कृषी विभागाची माहिती आहे. जिल्ह्यात खरीपाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर आहे. यंदा खरीपासाठी ८६,२०४ क्विंटल बियाणे लागणार आहे. कापसाच्या खालोखाल सोयाबीन लागवडीचे क्षेत्र राहणार आहे. सोयाबीनचा पेरा १ लाख हेक्टरवर होणार आहे. भाताचा पेरा ९४,२०० हेक्टरवर राहणार आहे. तुरीची ६५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात येणार आहे. संकरित ज्वारीची लागवड यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे ८ हजार हेक्टर इतकी राहणार आहे. मका ५ हजार हेक्टर, तीळ ३०० हेक्टर, उडीद, मूंग प्रत्येकी १५०० हेक्टर, ऊस ५ हजार हेक्टर, एरंडी ३०० व इतर कडधान्य ३०० हेक्टर राहणार आहे. २६ हजार ५४२ क्विंटल बियाण्यांची मागणीविदर्भात कापसाचा पेरा सर्वाधिक असतो. जिल्ह्यात २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची पेरणी होणार आहे. त्यासाठी बीटी कापसाचे बियाणे ४५०० क्विंटल लागणार आहे. विभागाकडून यंदा महाबीजकडे २६ हजार ५४२ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे, सोबतच कृषी सेवा केंद्रातही मुबलक बियाणे उपलब्ध आहे. कृषी विभागाकडून मार्गदर्शनगेल्या वर्षीप्रमाणे यंदा कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावागावात सभेच्या माध्यमातून कृषी सहायक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत, सोबतच बियाण्यांचे सॅम्पलिंग काढणेही सुरू आहे. सध्या शेतकऱ्यांकडून नांगरणीचे काम सुरू आहे. चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, सोबतच घरचे व कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची प्रथम उगवणक्षमता तपासून पाहावी. बियाण्यांची बीज प्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी अनधिकृत बियाण्यांची खरेदी करू नये, जेथून बिल उपलब्ध होईल, तेथूनच बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा कृषी कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :cottonकापूसnagpurनागपूर