शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बोंडअळीचा परिणाम : नागपूर जिल्ह्यात कापसाच्या पेऱ्यात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:41 IST

गेल्या वर्षी कापसाच्या पिकावर बोंडअळीचा झालेला परिणाम लक्षात घेता, यंदा कृषी विभागाने केलेल्या नियोजनात कापसाच्या क्षेत्रात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही घट किमान २ हजार हेक्टरपर्यंत असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाने जिल्ह्यासाठी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे.

ठळक मुद्दे५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर खरीपाचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या वर्षी कापसाच्या पिकावर बोंडअळीचा झालेला परिणाम लक्षात घेता, यंदा कृषी विभागाने केलेल्या नियोजनात कापसाच्या क्षेत्रात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही घट किमान २ हजार हेक्टरपर्यंत असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाने जिल्ह्यासाठी ५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर खरीपाचे नियोजन केले आहे.कृषी विभागाचा कापसाच्या लागवडीत घट झाल्याचा अंदाज असला तरी, सर्वाधिक क्षेत्र हे कापूस पिकाने व्यापले आहे. जिल्ह्यात २ लाख २५ हजार हेक्टर कापसाचे लागवडीचे क्षेत्र राहणार असल्याची कृषी विभागाची माहिती आहे. जिल्ह्यात खरीपाचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र ५ लाख ७ हजार ६०० हेक्टरवर आहे. यंदा खरीपासाठी ८६,२०४ क्विंटल बियाणे लागणार आहे. कापसाच्या खालोखाल सोयाबीन लागवडीचे क्षेत्र राहणार आहे. सोयाबीनचा पेरा १ लाख हेक्टरवर होणार आहे. भाताचा पेरा ९४,२०० हेक्टरवर राहणार आहे. तुरीची ६५ हजार हेक्टरवर लागवड करण्यात येणार आहे. संकरित ज्वारीची लागवड यंदाही गेल्या वर्षीप्रमाणे ८ हजार हेक्टर इतकी राहणार आहे. मका ५ हजार हेक्टर, तीळ ३०० हेक्टर, उडीद, मूंग प्रत्येकी १५०० हेक्टर, ऊस ५ हजार हेक्टर, एरंडी ३०० व इतर कडधान्य ३०० हेक्टर राहणार आहे. २६ हजार ५४२ क्विंटल बियाण्यांची मागणीविदर्भात कापसाचा पेरा सर्वाधिक असतो. जिल्ह्यात २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची पेरणी होणार आहे. त्यासाठी बीटी कापसाचे बियाणे ४५०० क्विंटल लागणार आहे. विभागाकडून यंदा महाबीजकडे २६ हजार ५४२ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे, सोबतच कृषी सेवा केंद्रातही मुबलक बियाणे उपलब्ध आहे. कृषी विभागाकडून मार्गदर्शनगेल्या वर्षीप्रमाणे यंदा कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून गावागावात सभेच्या माध्यमातून कृषी सहायक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत, सोबतच बियाण्यांचे सॅम्पलिंग काढणेही सुरू आहे. सध्या शेतकऱ्यांकडून नांगरणीचे काम सुरू आहे. चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, सोबतच घरचे व कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची प्रथम उगवणक्षमता तपासून पाहावी. बियाण्यांची बीज प्रक्रिया करावी. शेतकऱ्यांनी अनधिकृत बियाण्यांची खरेदी करू नये, जेथून बिल उपलब्ध होईल, तेथूनच बियाणे खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा कृषी कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :cottonकापूसnagpurनागपूर