शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणापुढे संकट कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 11:04 IST

आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे कोरोनामुळे निर्माण झालेले संकट कायमच आहे. या विद्यार्थ्यांसाठी अनलॉक लर्निंगची पद्धत सुचविली असली तरी सद्यपरिस्थिती लक्षात घेता ही पद्धतच ‘फेल’ ठरण्याचा धोका आहे.

ठळक मुद्देअनलॉक लर्निंग सुविधांअभावी ‘फेल’ दुर्गम गावांमध्ये कसे पोहचणार शिक्षण?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संक्रमणामुळे शाळा कधी सुरू करायच्या, यावर विचारमंथन सुरू आहे. शहरी शाळांमध्ये ऑनलाईन लर्निंग सुरू झाले आहे. खासगी आणि जिल्हा परिषदांच्या शाळांनीही यात पुढाकार घेतला आहे. मात्र आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे कोरोनामुळे निर्माण झालेले संकट कायमच आहे. या विद्यार्थ्यांसाठी अनलॉक लर्निंगची पद्धत सुचविली असली तरी सद्यपरिस्थिती लक्षात घेता ही पद्धतच ‘फेल’ ठरण्याचा धोका आहे.

दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांचे मोठे योगदान आहे. राज्यातील हजारो विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेतात. एकट्या नागपूर विभागाचा विचार केला तरी या विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये ९२ हजार विद्यार्र्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनलॉक लर्निंग प्रकल्प हाती घेण्याचे ठरले होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गावी जाऊन शिकवायचे, ही संकल्पना होती. मात्र पावसाळ्यात अनेक गावांपर्यंत बसेस पोहचत नाही; अशा गावांमध्ये शिक्षकांनी रोज जाऊन शिकविणे कसे शक्य होईल, याचा विचारच यात झालेला नाही. वस्ती, तांडे, पोड, पाड्यावर राहणाऱ्या आदिवासी गावांची लोकसंख्या फारच कमी असते. अशा गावांमध्ये शिकणारे विद्यार्थीही बोटावर मोजण्याइतपत असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांनी पोहचायचे कसे, हा अडचणीचा मुद्दा आहे. प्रत्यक्षात आदिवासी शाळांसाठी अनलॉक लर्निंग राबविताना या बाबींचा विचार झाला नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे, गावापर्यंत इंटरनेट सुविधा नसणे, दळणवळणासाठी योग्य रस्ते नसणे या येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील मुख्य अडचणी आहेत. वसतिगृह आणि शाळा कधी सुरू होणार याचा अद्यापही पत्ता नसल्याने आज तरी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे.नामांकितचेही शिक्षण सुविधांमुळे अडलेशहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळा प्रवेशाची योजना आहे. राज्यात २५ हजार तर नागपूर विभागात सुमारे १० हजार विद्यार्थी यातून शिक्षण घेतात. या शाळा शहरात असून त्यात शिकणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांकडे इंटरनेट, अँड्रॉईड मोबाईलसारख्या सुविधा आहेत. या शाळांनी आपल्या व्द्यिार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू केले असले तरी आदिवासी भागात राहणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांकडे अशा सुविधा नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम सुरू होऊनही हे विद्यार्थी मात्र अन्य व्द्यिार्थ्यांच्या तुलनेत मागे पडत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात सत्र सुरू झाल्यावर या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शाळा भरून काढणार का, हा सुद्धा प्रश्नच आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र