शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
3
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
4
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
5
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
6
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
7
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
8
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
9
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
10
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
11
दत्त जयंती २०२५: गुरुचरित्र वाचण्यावर स्त्रियांना बंदी का? सद्गुरू टेंबे स्वामींनी दिले आहे स्पष्टीकरण!
12
Mumbai: अनैतिक संबंधातून बाळाचा जन्म, डॉक्टरांकडून ५ लाखांत विकण्याचा प्रयत्न, ५ जणांवर गुन्हा दाखल
13
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
14
नवी मुंबईत शिवरायांचा पुतळा पुन्हा झाकला; नुकतेच अमित ठाकरेंनी आंदोलन करत केले होते अनावरण
15
श्रीमंतीचा दिखावा, ६ गर्लफ्रेंड पटवल्या, कायम जंगलात राहायचा; अखेर पोलिसांनी 'त्याला' अटक केली
16
शेअर बाजारातील 'जॅकपॉट' स्टॉक्स : १० महिन्यांत ₹१०००० चे झाले ₹५ लाख; पैशांचा वर्षाव करताहेत ‘हे’ ४ स्टॅाक
17
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
18
Mumbai: मुंबईत कांदा स्वस्त होणार की महागणार? पावसामुळे मोठे नुकसान; उत्पादनाचा अंदाज येईना
19
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
20
Mumbai: शाळेच्या कॅन्टीनमधील समोसा खाल्ल्याने २० विद्यार्थ्यांना विषबाधा, तेलात कापूर पडल्याची माहिती
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणापुढे संकट कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 11:04 IST

आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे कोरोनामुळे निर्माण झालेले संकट कायमच आहे. या विद्यार्थ्यांसाठी अनलॉक लर्निंगची पद्धत सुचविली असली तरी सद्यपरिस्थिती लक्षात घेता ही पद्धतच ‘फेल’ ठरण्याचा धोका आहे.

ठळक मुद्देअनलॉक लर्निंग सुविधांअभावी ‘फेल’ दुर्गम गावांमध्ये कसे पोहचणार शिक्षण?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या संक्रमणामुळे शाळा कधी सुरू करायच्या, यावर विचारमंथन सुरू आहे. शहरी शाळांमध्ये ऑनलाईन लर्निंग सुरू झाले आहे. खासगी आणि जिल्हा परिषदांच्या शाळांनीही यात पुढाकार घेतला आहे. मात्र आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे कोरोनामुळे निर्माण झालेले संकट कायमच आहे. या विद्यार्थ्यांसाठी अनलॉक लर्निंगची पद्धत सुचविली असली तरी सद्यपरिस्थिती लक्षात घेता ही पद्धतच ‘फेल’ ठरण्याचा धोका आहे.

दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये आदिवासी विभागाच्या आश्रमशाळांचे मोठे योगदान आहे. राज्यातील हजारो विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेतात. एकट्या नागपूर विभागाचा विचार केला तरी या विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये ९२ हजार विद्यार्र्थी शिकत आहेत. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनलॉक लर्निंग प्रकल्प हाती घेण्याचे ठरले होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गावी जाऊन शिकवायचे, ही संकल्पना होती. मात्र पावसाळ्यात अनेक गावांपर्यंत बसेस पोहचत नाही; अशा गावांमध्ये शिक्षकांनी रोज जाऊन शिकविणे कसे शक्य होईल, याचा विचारच यात झालेला नाही. वस्ती, तांडे, पोड, पाड्यावर राहणाऱ्या आदिवासी गावांची लोकसंख्या फारच कमी असते. अशा गावांमध्ये शिकणारे विद्यार्थीही बोटावर मोजण्याइतपत असतात. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांनी पोहचायचे कसे, हा अडचणीचा मुद्दा आहे. प्रत्यक्षात आदिवासी शाळांसाठी अनलॉक लर्निंग राबविताना या बाबींचा विचार झाला नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसणे, गावापर्यंत इंटरनेट सुविधा नसणे, दळणवळणासाठी योग्य रस्ते नसणे या येथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील मुख्य अडचणी आहेत. वसतिगृह आणि शाळा कधी सुरू होणार याचा अद्यापही पत्ता नसल्याने आज तरी या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे.नामांकितचेही शिक्षण सुविधांमुळे अडलेशहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळा प्रवेशाची योजना आहे. राज्यात २५ हजार तर नागपूर विभागात सुमारे १० हजार विद्यार्थी यातून शिक्षण घेतात. या शाळा शहरात असून त्यात शिकणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांकडे इंटरनेट, अँड्रॉईड मोबाईलसारख्या सुविधा आहेत. या शाळांनी आपल्या व्द्यिार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू केले असले तरी आदिवासी भागात राहणाऱ्या बहुतेक विद्यार्थ्यांकडे अशा सुविधा नाहीत. त्यामुळे अभ्यासक्रम सुरू होऊनही हे विद्यार्थी मात्र अन्य व्द्यिार्थ्यांच्या तुलनेत मागे पडत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात सत्र सुरू झाल्यावर या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम शाळा भरून काढणार का, हा सुद्धा प्रश्नच आहे.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र