शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
3
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
4
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
5
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
6
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
7
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
8
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
9
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
10
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
11
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
12
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
13
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
14
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
15
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
16
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
17
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
18
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
19
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
20
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप

गृहमंत्रालयाइतकेच महत्त्व शिक्षण खात्याला हवे : आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 19:43 IST

गृहमंत्रालयाइतकेच महत्त्व शिक्षण खात्याला मिळायला हवे, असे प्रतिपादन करत शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाच चिमटा काढला.

ठळक मुद्देविद्यापीठ, महाविद्यालयांत मिळते ५० वर्षांपुर्वीचे शिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सद्यस्थितीत उद्योगक्षेत्राला यापुढील १० वर्षांचे ज्ञान अपेक्षित आहे, परंतु महाविद्यालयांत मात्र ५० वर्ष जुन्या तंत्रज्ञानाचे धडे दिले जात आहेत. अशा स्थितीत विद्यार्थी रोजगारापासून वंचित राहतात. त्यामुळे देशाच्या व राज्याच्या शिक्षणप्रणालीत आमूलाग्र बदल आवश्यक आहे. सरकारने अभ्यासक्रम बनविताना प्राधान्य ठरवायला हवा. विद्यार्थी हितांवर जास्त भर द्यायला हवा. तसेच गृहमंत्रालयाइतकेच महत्त्व शिक्षण खात्याला मिळायला हवे, असे प्रतिपादन करत शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाच चिमटा काढला. जनआशीर्वाद यात्रा नागपुरात आली असताना मंगळवारी दुपारी त्यांनी प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमाअंतर्गत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. राज्यातील प्रत्येकच विद्यापीठामध्ये काही ना काही त्रुटी आहेत. मी सरकारविरोधात बोलत नाही. परंतु जिथे नेटवर्क नाही तेथे ‘ऑनलाईन’ प्रवेशप्रक्रिया राबविली जाते. सरकारने सारासार विचार करुन प्राधान्य ठरविण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम वेगवेगळा असतो व विविध पातळ्यांवर एकच विषय शिकवल्या जातो. संपूर्ण देशात एकच अभ्यासक्रम लागू झाला पाहिजे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले. 
शेतकऱ्यांच्या मुलांना शेती का करायची नाही ?शहरी भागातील लोक निसर्गापासून दूर चाललेत. तर शेतकऱ्यांच्या मुलांना शेती करायची नाही, असे चित्र दिसून येत आहे. शेतीतून बाहेर पडण्याचा नवीन पिढी विचार करत आहे. त्यांना असे पाऊल का उचलावे वाटत आहे, यावर मंथन झाले पाहिजे. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी सरकारने पुढाकार घ्यायलाच हवा, असे एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले. पिकविमा योजनेत मोठा घोटाळा झाला व तो शिवसेनेने बाहेर काढला. आमच्या मुळे १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रुपयांचा निधी मिळाला. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही नेहमीच आवाज उठवू, असे त्यांनी सांगितले.प्रत्येकाला ‘मिलिटरी ट्रेनिंग’ नकोमहाविद्यालयीन जीवनात प्रत्येकाला ‘मिलिटरी ट्रेनिंग’ का नाही, असा प्रश्न एका विद्यार्थिनीने विचारला. अशा प्रकारचे प्रशिक्षण आवश्यक आहे. मात्र काही देशविघातक तत्त्व याचा दुरुपयोग करू शकतात. त्यामुळे सरसकट ‘मिलिटरी ट्रेनिंग’ची गरज नाही. विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे निश्चित दिले गेले पाहिजे, असेदेखील आदित्य ठाकरे म्हणाले.आरक्षण आवश्यक पण सर्वांना समान संधी मिळावीआजच्या तरुणांनी जात, पात , धर्म याच्याहून पुढे जात विचार केला पाहिजे. वंचित घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण आवश्यक आहेच. परंतु सर्वानाच समान संधी मिळाली पाहिजे यावरदेखील लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन आदित्य ठाकरे यांनी केले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेStudentविद्यार्थी