शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
3
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
4
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
5
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
6
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
7
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
8
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
9
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
10
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
11
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
12
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
13
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
14
Payal Gaming: कोण आहे पायल गेमिंग? १.२० मिनटांचा MMS लीक झाल्यानंतर आली चर्चेत!
15
Video: BJP आमदाराच्या मुलाचा शाही विवाह सोहळा; तब्बल ७० लाखांच्या फटाक्यांची केली आतषबाजी
16
ओला-उबरला टक्कर! १ जानेवारीपासून 'भारत टॅक्सी' ॲप होणार लाँच; प्रवाशांना स्वस्त प्रवास आणि ड्रायव्हर्सची होणार जास्त कमाई
17
लग्नानंतर एका वर्षात शोभिता धुलिपाला देणार गुडन्यूज? सासरे नागार्जुन म्हणाले, "योग्य वेळ..."
18
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
19
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
20
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचे सौंदर्य हे शिक्षकांतच

By admin | Updated: September 6, 2014 03:05 IST

शिक्षणाचे खरे सौंदर्य हे शिक्षकांमध्येच दडले आहे. जुन्या दिवसांपेक्षा शिक्षकांना आता ‘अच्छे दिन’ आले आहेत, परंतु त्यांना जेवढा पगार मिळतो तितके ...

नागपूर : शिक्षणाचे खरे सौंदर्य हे शिक्षकांमध्येच दडले आहे. जुन्या दिवसांपेक्षा शिक्षकांना आता ‘अच्छे दिन’ आले आहेत, परंतु त्यांना जेवढा पगार मिळतो तितके खरेच कार्य करतो का याचा विचार शिक्षकांनी करण्याची गरज आहे. शिक्षणक्षेत्राची दुरवस्था टाळणे हे शिक्षकांच्याच हातात असल्याचे मत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे शुक्रवारी दीक्षांत सभागृहात शिक्षकदिनानिमित्त उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.शिक्षक कल्याण निधीअंतर्गत उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी विद्यापीठाच्या सात शिक्षकांची निवड करण्यात आली होती. विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. शुभा जोहरी, सांख्यिकीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. माणिक खापर्डे, धनवटे नॅशनल कॉलेजचे डॉ. रत्नाकर भेलकर, एम.पी.देव स्मृती धरमपेठ विज्ञान महाविद्यालयाचे डॉ.एन.एल.खोब्रागडे यांचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट संशोधक पुरस्कार विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अरुण जाधव यांना देण्यात आला. सामाजिक कार्यात भरीव काम करणाऱ्या शिक्षकांना देण्यात येणाऱ्या सामाजिक कार्य उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने शासकीय वसंतराव नाईक संस्थेचे डॉ. भाऊ दायदार यांना सन्मानित करण्यात आले. भंडारा येथील आर. एम. पटेल महाविद्यालयाच्या डॉ. जुल्फी शेख यांना उत्कृष्ट लेखक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर, अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले, प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, कुलसचिव डॉ. अशोक गोमाशे, डॉ. पुरण मेश्राम व आयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ. अर्चना नेरकर प्रामुख्याने उपस्थित होते.शिक्षणक्षेत्रात गेल्या काही काळापासून आमूलाग्र बदल झाले आहेत. विद्यापीठांमध्ये संशोधनाला जास्तीत जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता आहे. संशोधन प्रक्रियेला विद्यापीठाने चालना दिली पाहिजे व विद्यार्थ्यांना त्याकडे जाण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. सोबतच समाजात शिक्षकांचे स्थान आदराचे कसे राहील यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करायला हवेत, असे मत डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी व्यक्त केले.प्रास्ताविक डॉ. नेरकर यांनी केले. संचालन डॉ. कोमल ठाकरे तर आभार डॉ. मेश्राम यांनी मानले. (प्रतिनिधी)