शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

सुशिक्षित माताच घडवतील सुसंस्कारीत देश : कांचन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 01:06 IST

धंतोलीस्थित अहिल्यादेवी मंदिरात बुधवारी ईद मिलन समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना संस्कार भारतीच्या प्रदेशअध्यक्षा कांचन गडकरी यांनी मातृशक्तीचे महत्त्व विषद केले. मुस्लीम समाज मागास आहे व त्यातील महिलांची स्थिती हलाखीची आहे. मुस्लिम महिलांजवळ कौशल्य आहे पण त्याला शिक्षणाची जोड मिळणे आवश्यक आहे. घरातील आई सुशिक्षित, सुसंस्कारीत असली तर ते कुटुंब, समाज व देशही प्रगती करतो व सुसंघटित होतो, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअहिल्यादेवी मंदिरात ईद मिलन समारोह

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : धंतोलीस्थित अहिल्यादेवी मंदिरात बुधवारी ईद मिलन समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना संस्कार भारतीच्या प्रदेशअध्यक्षा कांचन गडकरी यांनी मातृशक्तीचे महत्त्व विषद केले. मुस्लीम समाज मागास आहे व त्यातील महिलांची स्थिती हलाखीची आहे. मुस्लिम महिलांजवळ कौशल्य आहे पण त्याला शिक्षणाची जोड मिळणे आवश्यक आहे. घरातील आई सुशिक्षित, सुसंस्कारीत असली तर ते कुटुंब, समाज व देशही प्रगती करतो व सुसंघटित होतो, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.सर्व पंथ सद्भाव समन्वय समितीच्यावतीने ईद मिलन समारोहाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रसेविका समितीच्या माजी संचालिका प्रमिलाताई मेढे, मुकुंद कुळकर्णी, विचारवंत अ‍ॅड. मुजाहिद खान, माजिद पारेख, भदंत मित्यानंद, डॉ. अभिरुची जैन-पळसापुरे, शिक्षणतज्ज्ञ प्रा. जफर अहमद खान, म्युर मेमोरियल हॉस्पिटलचे विलास शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रमिलाताई मेढे म्हणाल्या, भारत हे माझे घर आहे, माझे कुटुंब आहे, हे मार्गदर्शक तत्त्व मनात रुजले की या देशासाठी प्राणही देण्यास आपण तयार होतो. ईश्वरानेच आम्हाला या देशात एकत्र निर्माण केले, त्यामुळे आमचे नाते आहे. या भारताचा द्वेष करणाऱ्या शत्रूंनी आपले सर्व धर्मीय ऐक्य तोडण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे. मात्र आपण एकत्र राहिलो तर कुणी आम्हाला तडा देऊ शकत नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.जफर अहमद म्हणाले, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात विशिष्ट धर्माचे नाही तर सर्वधर्मियांचे योगदान राहिले आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर मुस्लिम समाज मागास राहिला आहे. मुस्लिम समाजाने विशिष्ट राजकीय पक्षाविषयी अंतर ठेवले होते. मात्र गेल्या पाच वर्षात अल्पसंख्याकांच्या विकासनिधीमध्ये वाढ झाली आहे. मुस्लिम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व तरुणांच्या रोजगाराच्या अनेक गोष्टी या सरकारने केल्या आहेत. त्यामुळे मुस्लिमांनी जो समाजाच्या प्रगतीसाठी काम करेल त्यांच्यासोबत यावे, असे आवाहन केले. अ‍ॅड. मुजाहिद यांनी, हा देश विशिष्ट धर्माचा नाही तर सर्वांचा असून या सर्व धर्मियांच्या प्रगतीची, संरक्षणाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, असे मनोगत मांडले. माजिद पारेख म्हणाले, कुराण आम्हाला सर्व धर्मियांचा आदर करायला शिकविते. अल्लाहने आपल्याला सामाजिक प्राणी म्हणून पृथ्वीवर पाठविले आहे. त्यामुळे या देशात शांतता नांदेल, भेदभाव नष्ट होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. वसुधैवकुटुंबकमची संकल्पना कुराणमध्येही सांगितली आहे. त्यामुळे या देशात बंधुभाव टिकविणे आपली जबाबदारी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. इतर मान्यवरांनीही आपले मनोगत मांडले. प्रास्ताविक शाम देशमुख यांनी केले. संचालन व आभार लीना गहाने यांनी मानले.

टॅग्स :Ramzan Eidरमजान ईदnagpurनागपूर