शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

‘ईडा पिडा... रोगराई... दुष्ट प्रवृत्ती आणि संकटांना घेऊन जा गे मारबत’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 10:36 IST

तब्बल १४२ वर्षांची परंपरा असलेली, विदर्भाची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेली मारबत-बडग्याची मिरवणूक दोन वर्षांनंतर शनिवारी उपराजधानी नागपुरात उत्साहात निघाली.

तब्बल १४२ वर्षांची परंपरा असलेली, विदर्भाची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभलेली मारबत-बडग्याची मिरवणूक दोन वर्षांनंतर शनिवारी उपराजधानी नागपुरात उत्साहात निघाली. ‘ईडा पिडा... रोगराई.... दृष्ट प्रवृत्ती आणि संकटांना घेऊन जा गे मारबत’ अशा घोषणा देत मारबत उत्सव साजरा झाला.

तेली समाजाच्या पिवळ्या मारबतीला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वही आहे, तर काळी मारबत ही पुतणा मावशीचे प्रतीक मानली जाते. स्वातंत्र्य लढ्यात या मारबतींच्या माध्यमातून देशभक्तीची बीजे रोवण्याचे काम होत होते. जागनाथ बुधवारी येथून निघणारी पिवळी मारबत आणि श्री देवस्थान पंचकमेटी इतवारी येथून निघणारी काळी मारबत यांचे मिलन नेहरू पुतळ्याजवळ झाले. या मिलनाचे विहंगम दृश्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी अख्खे नागपूर नेहरू पुतळ्याजवळ एकवटले होते.

बडग्यांची मिरवणूक, त्यावर विविध संदेश लिहिलेले फलक नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते. ढोल-ताशा आणि डीजेच्या दणदणाटात तरुणाई थिरकत होती. इतवारीपासून ते बडकस चौकापर्यंत चारही बाजूंनी लोकांची गर्दी दाटली होती. अनेक नागरिक आपल्या कुटुंबीयांसह आणि लहान बालगोपालांना सोबत घेऊन हा अनोखा उत्सव पाहण्यासाठी आले होते. 

बडग्यांनी ठेवले अनिष्ट प्रथा, महागाईवर बोटयंदा एकूण १२ बडगे काढण्यात आले. यात बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, पेट्रोल दरवाढ आणि राजकीय परिस्थितीवर बोट ठेवणाऱ्या बडग्यांचा समावेश होता.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक