शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

By योगेश पांडे | Updated: April 28, 2025 00:46 IST

लोकमतकडे ईडीच्या पत्राची प्रतदेखील असून यामुळे प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा व अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळ्याची आता ईडीकडूनदेखील दखल घेण्यात आली आहे. ईडीने या घोटाळ्याशी निगडीत माहिती पोलिसांकडून मागविली आहे. दरम्यान, या प्रकरणाची पाळेमुळे खणण्यासाठी एसआयटीदेखील गठीत करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे या घोटाळ्याशी निगडीत असलेल्यांना घाम फुटला आहे. अनेक मोठे अधिकाऱ्यांचे भांडे यात फुटू शकते. लोकमतकडे ईडीच्या पत्राची प्रतदेखील असून यामुळे प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलिस ठाण्याकडून तांत्रिक पद्धतीने तपासावर भर देण्यात येत आहे. उपसंचालक उल्हास नरड व वरिष्ठ लिपिक सूरज नाईक यांच्या चौकशीतून अनेक बाबी समोर आल्या होत्या. अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांच्या नावाने बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आले होते व अनेक वर्षांपासून पगाराची उचल सुरू होती. सायबर पोलिसांनी एनआयसी, महाआयटी सर्व्हरमधून मागितली माहिती मागितली असून आहे.

शालार्थ आयडी तयार करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या बाहेरील संगणकातून झाली असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासांतून समोर आले. या प्रकरणाची व्याप्ती शेकडो कोटींमध्ये जाण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन ईडीने पोलीस आयुक्त कार्यालयाकडून या प्रकरणाच्या गुन्ह्याची प्रत व इतर माहिती मागविली आहे. यात आरोपींचे बयाण, झालेल्या झडतींचे तपशील, आरोपींच्या बॅंक खात्यांचे तपशील, त्यांच्या मालमत्तांची माहिती तसेच रिमांड ऑर्डरबाबत सविस्तर माहितीचा समावेश आहे. ईडीचे सहायक संचालक एम.अशोक यांनी याबाबत पत्र लिहून ही माहिती मागविली आहे.

एसआयटीत राहणार उपायुक्त

दरम्यान, राज्य शासनाने या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यासाठी पावले उचलली आहेत. यात तपास अधिकारी, शिक्षण विभागातील दोन अधिकारी, पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी तसेच अशासकीय सदस्य यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

संचालकांना सुगावा लागला कसा नाही?

दरम्यान, शिक्षणतज्ज्ञ ॲड विजय गुप्ता यांनी या प्रकरणात शिक्षण विभागाच्या संचालकांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मागील अनेक वर्षांपासून पदभरती बंद आहे. तरीदेखील वेतनाचे बजेट वाढले. यात संचालकांना काहीच वावगे कसे वाटले नाही. अनेक कोटींची रक्कम बॅक डेटेड काढण्यात आली व तरीदेखील संचालकांना सुगावा कसा लागला नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणnagpurनागपूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र