शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

By योगेश पांडे | Updated: April 28, 2025 00:46 IST

लोकमतकडे ईडीच्या पत्राची प्रतदेखील असून यामुळे प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: संपूर्ण राज्याला हादरविणाऱ्या शिक्षण विभागातील शालार्थ आयडी घोटाळा व अपात्र मुख्याध्यापक भरती घोटाळ्याची आता ईडीकडूनदेखील दखल घेण्यात आली आहे. ईडीने या घोटाळ्याशी निगडीत माहिती पोलिसांकडून मागविली आहे. दरम्यान, या प्रकरणाची पाळेमुळे खणण्यासाठी एसआयटीदेखील गठीत करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे या घोटाळ्याशी निगडीत असलेल्यांना घाम फुटला आहे. अनेक मोठे अधिकाऱ्यांचे भांडे यात फुटू शकते. लोकमतकडे ईडीच्या पत्राची प्रतदेखील असून यामुळे प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर पोलिस ठाण्याकडून तांत्रिक पद्धतीने तपासावर भर देण्यात येत आहे. उपसंचालक उल्हास नरड व वरिष्ठ लिपिक सूरज नाईक यांच्या चौकशीतून अनेक बाबी समोर आल्या होत्या. अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांच्या नावाने बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आले होते व अनेक वर्षांपासून पगाराची उचल सुरू होती. सायबर पोलिसांनी एनआयसी, महाआयटी सर्व्हरमधून मागितली माहिती मागितली असून आहे.

शालार्थ आयडी तयार करण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या बाहेरील संगणकातून झाली असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासांतून समोर आले. या प्रकरणाची व्याप्ती शेकडो कोटींमध्ये जाण्याची शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन ईडीने पोलीस आयुक्त कार्यालयाकडून या प्रकरणाच्या गुन्ह्याची प्रत व इतर माहिती मागविली आहे. यात आरोपींचे बयाण, झालेल्या झडतींचे तपशील, आरोपींच्या बॅंक खात्यांचे तपशील, त्यांच्या मालमत्तांची माहिती तसेच रिमांड ऑर्डरबाबत सविस्तर माहितीचा समावेश आहे. ईडीचे सहायक संचालक एम.अशोक यांनी याबाबत पत्र लिहून ही माहिती मागविली आहे.

एसआयटीत राहणार उपायुक्त

दरम्यान, राज्य शासनाने या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यासाठी पावले उचलली आहेत. यात तपास अधिकारी, शिक्षण विभागातील दोन अधिकारी, पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी तसेच अशासकीय सदस्य यांचा समावेश असण्याची शक्यता आहे.

संचालकांना सुगावा लागला कसा नाही?

दरम्यान, शिक्षणतज्ज्ञ ॲड विजय गुप्ता यांनी या प्रकरणात शिक्षण विभागाच्या संचालकांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मागील अनेक वर्षांपासून पदभरती बंद आहे. तरीदेखील वेतनाचे बजेट वाढले. यात संचालकांना काहीच वावगे कसे वाटले नाही. अनेक कोटींची रक्कम बॅक डेटेड काढण्यात आली व तरीदेखील संचालकांना सुगावा कसा लागला नाही, असा सवाल त्यांनी केला आहे.

टॅग्स :Educationशिक्षणnagpurनागपूरEducation Sectorशिक्षण क्षेत्र