शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मनपापुढे पुन्हा आर्थिक संकट! तिजोरी रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 23:21 IST

महापालिकेच्या तिजोरीत गेल्या आर्थिक वर्षात २०१७.७५ कोटींचा महसूल जमा झाला. प्रयत्न करूनही अपेक्षित महसूल जमा झालेला नाही. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पानुसार अपेक्षित महसूल व प्रत्यक्ष प्राप्त महसूल यात मोठी तूट निर्माण झाली आहे. प्राप्त महसुलाचा विचार करता, कंत्राटदारांची बिले थांबविली वा परत पाठविली जात आहेत. महापालिकेपुढे पुन्हा आर्थिक संकट निर्माण झाल्याने डिसेंबरपर्यंतची बिले देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे.

ठळक मुद्देकोट्यवधीची बिले परत : नवीन अथंसंकल्पात समायोजनाची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या तिजोरीत गेल्या आर्थिक वर्षात २०१७.७५ कोटींचा महसूल जमा झाला. प्रयत्न करूनही अपेक्षित महसूल जमा झालेला नाही. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पानुसार अपेक्षित महसूल व प्रत्यक्ष प्राप्त महसूल यात मोठी तूट निर्माण झाली आहे. प्राप्त महसुलाचा विचार करता, कंत्राटदारांची बिले थांबविली वा परत पाठविली जात आहेत. महापालिकेपुढे पुन्हा आर्थिक संकट निर्माण झाल्याने डिसेंबरपर्यंतची बिले देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे.आर्थिक स्थितीचा विचार करता जानेवारी ते मार्च २०१९ दरम्यानच्या बिलाची मोठी रक्कम नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात समायोजित केली जाणार आहे. आयुक्तांनी आपल्या अर्थसंकल्पात ज्या शीर्षकांचा उल्लेख केलेला आहे तीच बिले कंत्राटदारांना मिळत आहे. नवीन वर्षात जवळपास ५० कोटींच्या बिलांचे समायोजन केले जाणार आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी मार्च महिन्यातच बिलाचे समायोजन नवीन वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात आले होते. मात्र यावर्षी निवडणूक आचारसंहिता असल्याने महापालिकेला कोणत्याही प्रकारचे विशेष अनुदान वा अन्य शीर्षकांतर्गत मोठा निधी राज्य सरकारकडून मिळालेला नाही. त्यामुळे जानेवारी ते मार्चदरम्यानच्या बिलाचे समायोजन नवीन अर्थसंकल्पात क रण्याची तयारी सुरू आहे. डीपीसी निधीतील बिले जिल्हाधिकारी यांच्या परवानगीनंतर मिळण्याची शक्यता आहे. मात्र महापालिकेने केलेल्या विकास कामांचे बिल तूर्त मिळण्याची शक्यता नाही.लोकसभा निवडणुकीमुळे जिल्हा प्रशासनाने महापालिके कडून १५ कोटी विविध स्वरूपात जमा होणाऱ्या राज्य सरकारच्या टॅक्स स्वरूपात घेतले आहे. यामुळे महापालिका आर्थिक अडचणीत आहे.निवडणूक आचारसंहितेमुळे २३ पर्यंत कोणत्याही प्रकारची विकास कामे होणार नाहीत. मात्र काही महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. यामुळे मोजकाच कालावधी मिळणार असल्याने महापालिकेला २३ मेनंतर तातडीने विकास कामे मंजूर करावी लागतील.विशेष म्हणजे वर्ष २०१८-१९ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी २,९४६ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात मालमत्ता करापासून ५०९ कोटींचे उद्दिष्ट दिले होते. परंतु प्रत्यक्षात २२८ कोटींचा महसूल जमा झाला. नगर रचना विभाग तर वसुलीत सपशेल नापास ठरला. या विभागात वर्षानुवर्षे कर्मचारी व अधिकारी ठाण मांडून असल्याने शुल्क वसुलीवर परिणाम झाला आहे. तिजोरीत जमा होणारा महसूल विचारात घेता, महापालिका आयुक्तांनी सुधारित अर्थसंकल्पात कपात करून २,२७७ कोटींचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु प्रत्यक्ष उत्पन्न २०१७.१७ कोटींचाच महसूल जमा झाला. आयुक्तांनी दिलेले उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले आहे.विभागाला प्रश्न; बिल कसे देणारस्थायी समितीच्या मंजुरीने अनेक कामे करण्यात आलेली आहेत. मात्र आयुक्तांच्या अर्थसंकल्पात अनेक शीर्षकात कपात केली आहे. अशापरिस्थितीत स्थायी समितीच्या मंजुरीनुसार करण्यात आलेल्या कामांची बिले कशी द्यावी, असा प्रश्न वित्त विभागाला पडला आहे.दुसरीकडे जीएसटीमुळे त्रस्त असल्याने बिल नियमित देण्याची मागणी कंत्राटदारांनी केली आहे. ही बाब कंत्राटदारांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणली आहे. काढण्यात आलेल्या बिलासाठी नवीन अर्थसंकल्पात तरतूद करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfundsनिधी