शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

‘अमृत’ भारताला न लागाे विघटनाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:11 IST

नागपूर : आपण भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत साेहळा साजरा करताे आहाेत. पंचाहत्तरी गाठताना अनेक परिवर्तने देशाने पाहिली आहेत. अनेक प्रकारच्या ...

नागपूर : आपण भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत साेहळा साजरा करताे आहाेत. पंचाहत्तरी गाठताना अनेक परिवर्तने देशाने पाहिली आहेत. अनेक प्रकारच्या समस्या, साधी सुई न घडण्याइतके उद्याेगाचे मागासलेपण केव्हाचे मागे टाकून कधी महासत्तांशी स्पर्धा करायला लागलाे; पण जागतिक महासत्ता हाेण्याचे स्वप्न दाखविताना ‘उष:काल हाेता हाेता...’ ही भावना निर्माण हाेणाऱ्या स्वातंत्र्याेत्तर काळातील ज्येष्ठांची चिंता पुन्हा चिंतन करायला लावणारी आहे. देशाभिमान आटला का, धार्मिक उग्रवाद बळावला का, अशा कितीतरी शंका त्यांच्या मनात आहेत.

गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळावे, या भावनेने लोकं झपाटले होते. देशाप्रती बलिदानाची भावना तेव्हा लोकांमध्ये होती. स्वातंत्र्यानंतर शहिदांना न विसरता देश पुढे जावा, ही भावना लोकांमध्ये होती. आज त्या स्वातंत्र्याचे महत्त्व राहिले नाही. राजकारणात निव्वळ स्वार्थ दडला आहे. खरे देशप्रेम सीमेवर लढणाऱ्या सैनिकांत आहे. राजकारण्यांनी तर देशप्रेम खिशात टाकले आहे. त्यामुळे पुढची १०० वर्षे देशाचे स्वातंत्र्य टिकेल की नाही, अशी भीती आहे.

- गोविंदराव देशपांडे, ज्येष्ठ नागरिक ()

--------------------------------------------

‘भारत देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. रक्ताचे पाट वाहिले तेव्हा कुठे स्वातंत्र्याचा श्वास आमच्या नशिबी आला. आज सर्वच क्षेत्रात प्रगती पथावर आहे; पण सध्याची परिस्थिती पाहता गरिबी, बेरोजगारी, शासकीय संपत्तीचे खासगीकरणाने जनता त्रस्त आहे. त्यामुळे आधुनिक भारताचे स्वप्न उराशी बाळगलेल्या शहिदांचे बलिदान व्यर्थ तर जाणार नाही ना? अशी शंका निर्माण होते.

-रामगोविंद खोब्रागडे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल ()

------------------------------------------------------------

आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना मनात खंत आहे. धार्मिक ऐक्याच्या संवादाने चालणारा देश अचानक धर्माच्या नावाने विखंडित केला जात आहे. कामगार, कष्टकऱ्यांनी अनेक कठीण परिस्थितीचा सामना केला; पण सध्याच्या काळात त्यापेक्षा वाईट परिस्थिती भोगावी लागत आहे. खासगीकरण करून उपेक्षित वर्गाला पुन्हा शिक्षणापासून वंचित केले जात आहे. संस्थांचे खासगीकरण हाेत आहे. त्यामुळे हा देश पुन्हा पारतंत्र्यात जाणार, असे संकेत दिसत आहेत.

- हरीश धुरट, कामगार नेता. ()

------------------------------------------------------

गांधीजींनी स्वातंत्र्याच्या लढाईत भारतीयत्वाची भावना निर्माण केली. या भावनेने सारेच भारावले होते. आम्ही इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वातील वानर सेनेत काम करीत होतो. तहान-भूक, घरदार कशाचीच भ्रांत त्यावेळी नव्हती. फक्त देश स्वतंत्र व्हावा, हाच ध्यास होता; मात्र भारतीयत्वाची भावना आज राहिलेली नाही. पुन्हा आपण जाती, धर्मात वाटले जात आहोत. उग्रवाद वाढला आहे. आज जेवढे जास्त राजकीय पक्ष तेवढे लोक वाटले जात आहेत. आज देशाला समाजवादाची गरज आहे.

पं. केदारनाथ रामकृपाल पांडे, स्वातंत्र्यसंग्राम सेनानी ()

-----------------------------------------------------

स्वातंत्र्यानंतरच्या काळात उद्योगांसमोर अनेक संकटे उभी होती. नोकरशाहीत देश दबला होता; पण जागतिकीकरणानंतर सर्वांसाठी द्वारे खुली झाली. सरकारच्या अनेक योजना आहेत; पण योग्य वेळी त्याची अंमलबजावणी होण्याची गरज आहे. उद्योगांसमोर अजूनही अनेक संकटे आहेत. औद्योगिक क्षेत्रात भारताचे नाव जगात सर्वोच्च स्थानी न्यायचे असेल तर उद्योगांना चालना देण्याची गरज आहे.

अजित दिवाडकर, ज्येष्ठ उद्योजक ()

----------------------------------------------

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात देशाने बरेच कमावले. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आम्ही शाळेत शिकत होतो; मात्र आंदोलनाची जाण होती. आज देशाची प्रगती झाली. सर्वांना हक्क कळले. देश सार्वभौम होणार आहे. जगाच्या पातळीवर भारताचा डंका राहणार आहे.

- हुकूमचंद मिश्रिकोटकार, निवृत्त वित्त व लेखा अधिकारी ()