शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

पूर्व विदर्भात सेना लोकसभेच्या चार जागा जिंकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 21:59 IST

शिवसेनेतर्फे परत एकदा भाजपावर प्रहार करण्यात आला आहे. सहकारी पक्षांचा सन्मान ठेवण्यात येत नसल्याचा आरोप शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांना लावला आहे. यापुढे भाजपासोबत युती करून कुठलीही निवडणूक लढण्यात येणार नाही. तसेच पूर्व विदर्भातील लोकसभेच्या चार जागा सेना निश्चित जिंकणार, असा दावा त्यांनी केला. नागपुरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.

ठळक मुद्देगजानन कीर्तीकर यांचा दावा : सेना स्वबळावर लढणार निवडणुका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसेनेतर्फे परत एकदा भाजपावर प्रहार करण्यात आला आहे. सहकारी पक्षांचा सन्मान ठेवण्यात येत नसल्याचा आरोप शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांना लावला आहे. यापुढे भाजपासोबत युती करून कुठलीही निवडणूक लढण्यात येणार नाही. तसेच पूर्व विदर्भातील लोकसभेच्या चार जागा सेना निश्चित जिंकणार, असा दावा त्यांनी केला. नागपुरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.वर्धमाननगर येथे झालेल्या या मेळाव्याला खा.आनंद अडसूळ, खा.कृपाल तुमाने, माजी आमदार अशोक शिंदे, नरेंद्र भोंडेकर व जिल्हाप्रमुख माजी खासदार प्रकाश जाधव उपस्थित होते. विदर्भाला भाजपाचा बालेकिल्ला बनविण्यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. आता मात्र शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवून स्वत:ची ताकद वाढवेल. मागील विधानसभा निवडणूकांत मिळालेल्या मतांची संख्या लक्षात घेतली तर शिवसेना पूर्व विदर्भातील चार लोकसभा जागा निश्चित जिंकू शकते. यात रामटेकसमवेत वर्धा, भंडारा, चंद्रपूर यांचा समावेश आहे, असे कीर्तीकर म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरदेखील टीका केली. गडकरी रस्ते तर बनवत आहेत, मात्र दुसरीकडे मंदिर तुटत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये रोष आहे. शिवसेना गडकरींच्या विरोधातदेखील दमदार उमेदवार उतरवेल, असे ते म्हणाले. पश्चिम विदर्भातून शिवसेना लोकसभेच्या ३ व विधानसभेच्या २० जागा जिंकेल असे प्रतिपादन अडसूळ यांनी केले.तत्पूर्वी, मेळाव्यादरम्यान बोलताना कीर्तीकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधत शिवसैनिकांनी जनतेच्या समस्यांसंदर्भात आंदोलन करण्याचे निर्देश दिले. यावेळी शेखर सावरबांधे, किशोर कुमेरिया, बंडू तळवेकर, चिंटू महाराज यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.शहराची नवीन कार्यकारिणी दहा दिवसातनव्वदीच्या दशकात नागपूर विभागात जास्त सक्रियता होती. आता पक्षातील गटबाजीला दूर करून जुन्या लोकांना जोडण्यात येईल. तसेच प्रकाश जाधव यांच्यासारख्या संघटकाची आवश्यकता असल्यामुळे त्याना शहराच्या राजकारणात आणल्या गेले. दहा दिवसाच्या आत शहराची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात येईल, असे कीर्तीकर यांनी स्पष्ट केले.सेना भवनातून थेट ‘वॉच’विदर्भाच्या बाहेरील लोकांना संपर्क प्रमुख बनविण्याच्या मुद्यावर विचारणा केली असता राजकीय रणनीतींतर्गत त्यांना नागपूरला पाठविण्यात आले असल्याचे कीर्तीकर यांनी सांगितले. मुंबईतील शिवसेना भवनातून कामकाजावर नजर ठेवण्यात येत आहे. ‘बूथ’पातळीवर काम सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात पक्षसंघटनेला मजबूत करण्यात येत आहे. ४ ते ७ सप्टेंबरदरम्यान ‘बूथ’स्तरीय संमेलन आयोजित करण्याचीदेखील त्यांनी घोषणा केली.पंतप्रधानांवर केली टीकायावेळी गजानन कीर्तीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदी सहकारी पक्षांचा सन्मान करत नाहीत. त्यामुळेच शिवसेनेचे खासदार मोदींसोबत बोलत नाहीत. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा युतीसंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वबळावरच निवडणुका लढण्याचे ठरविले असल्याची माहिती त्यांनी दिली. 

 

टॅग्स :Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकरShiv Senaशिवसेना