शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
3
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
4
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
5
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
6
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
7
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
8
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
9
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
10
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
11
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
12
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
13
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
14
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
15
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
16
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
17
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
18
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
19
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
20
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या

पूर्व विदर्भात सेना लोकसभेच्या चार जागा जिंकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 21:59 IST

शिवसेनेतर्फे परत एकदा भाजपावर प्रहार करण्यात आला आहे. सहकारी पक्षांचा सन्मान ठेवण्यात येत नसल्याचा आरोप शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांना लावला आहे. यापुढे भाजपासोबत युती करून कुठलीही निवडणूक लढण्यात येणार नाही. तसेच पूर्व विदर्भातील लोकसभेच्या चार जागा सेना निश्चित जिंकणार, असा दावा त्यांनी केला. नागपुरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.

ठळक मुद्देगजानन कीर्तीकर यांचा दावा : सेना स्वबळावर लढणार निवडणुका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिवसेनेतर्फे परत एकदा भाजपावर प्रहार करण्यात आला आहे. सहकारी पक्षांचा सन्मान ठेवण्यात येत नसल्याचा आरोप शिवसेनेचे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांना लावला आहे. यापुढे भाजपासोबत युती करून कुठलीही निवडणूक लढण्यात येणार नाही. तसेच पूर्व विदर्भातील लोकसभेच्या चार जागा सेना निश्चित जिंकणार, असा दावा त्यांनी केला. नागपुरात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.वर्धमाननगर येथे झालेल्या या मेळाव्याला खा.आनंद अडसूळ, खा.कृपाल तुमाने, माजी आमदार अशोक शिंदे, नरेंद्र भोंडेकर व जिल्हाप्रमुख माजी खासदार प्रकाश जाधव उपस्थित होते. विदर्भाला भाजपाचा बालेकिल्ला बनविण्यात शिवसेनेचे मोठे योगदान आहे. आता मात्र शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवून स्वत:ची ताकद वाढवेल. मागील विधानसभा निवडणूकांत मिळालेल्या मतांची संख्या लक्षात घेतली तर शिवसेना पूर्व विदर्भातील चार लोकसभा जागा निश्चित जिंकू शकते. यात रामटेकसमवेत वर्धा, भंडारा, चंद्रपूर यांचा समावेश आहे, असे कीर्तीकर म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरदेखील टीका केली. गडकरी रस्ते तर बनवत आहेत, मात्र दुसरीकडे मंदिर तुटत आहेत. त्यामुळे जनतेमध्ये रोष आहे. शिवसेना गडकरींच्या विरोधातदेखील दमदार उमेदवार उतरवेल, असे ते म्हणाले. पश्चिम विदर्भातून शिवसेना लोकसभेच्या ३ व विधानसभेच्या २० जागा जिंकेल असे प्रतिपादन अडसूळ यांनी केले.तत्पूर्वी, मेळाव्यादरम्यान बोलताना कीर्तीकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधत शिवसैनिकांनी जनतेच्या समस्यांसंदर्भात आंदोलन करण्याचे निर्देश दिले. यावेळी शेखर सावरबांधे, किशोर कुमेरिया, बंडू तळवेकर, चिंटू महाराज यांच्यासह पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.शहराची नवीन कार्यकारिणी दहा दिवसातनव्वदीच्या दशकात नागपूर विभागात जास्त सक्रियता होती. आता पक्षातील गटबाजीला दूर करून जुन्या लोकांना जोडण्यात येईल. तसेच प्रकाश जाधव यांच्यासारख्या संघटकाची आवश्यकता असल्यामुळे त्याना शहराच्या राजकारणात आणल्या गेले. दहा दिवसाच्या आत शहराची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात येईल, असे कीर्तीकर यांनी स्पष्ट केले.सेना भवनातून थेट ‘वॉच’विदर्भाच्या बाहेरील लोकांना संपर्क प्रमुख बनविण्याच्या मुद्यावर विचारणा केली असता राजकीय रणनीतींतर्गत त्यांना नागपूरला पाठविण्यात आले असल्याचे कीर्तीकर यांनी सांगितले. मुंबईतील शिवसेना भवनातून कामकाजावर नजर ठेवण्यात येत आहे. ‘बूथ’पातळीवर काम सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यात पक्षसंघटनेला मजबूत करण्यात येत आहे. ४ ते ७ सप्टेंबरदरम्यान ‘बूथ’स्तरीय संमेलन आयोजित करण्याचीदेखील त्यांनी घोषणा केली.पंतप्रधानांवर केली टीकायावेळी गजानन कीर्तीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदी सहकारी पक्षांचा सन्मान करत नाहीत. त्यामुळेच शिवसेनेचे खासदार मोदींसोबत बोलत नाहीत. भाजपाचे अध्यक्ष अमित शहा युतीसंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी स्वबळावरच निवडणुका लढण्याचे ठरविले असल्याची माहिती त्यांनी दिली. 

 

टॅग्स :Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकरShiv Senaशिवसेना