शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

पाच वर्षात देशात १३८ ठिकाणी भूकंप लहरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 23:43 IST

२०१५ पासून डिसेंबर २०१९ या काळात देशभरात विविध १३८ ठिकाणी भूकंपाचे धक्के नागरिकांनी अनुभवले आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देनेपाळ वगळता कुठेही जीवित व वित्तहानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१५ पासून डिसेंबर २०१९ या काळात देशभरात विविध १३८ ठिकाणी भूकंपाचे धक्के नागरिकांनी अनुभवले आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. सुदैवाने यातील कोणत्याच ठिकाणी जीवितहानी किंवा वित्त हानी झाली नाही.भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती भयावह चित्र निर्माण करणारी असते. भूगर्भातील हालचाली तशा नियमित घडणाऱ्या आहेत मात्र एखाद्या वेळी तीव्र स्वरूप धारण केले तर त्याचे भयकारी परिणाम मानव आणि सजीवांना सोसावे लागतात. १९९३ साली महाराष्ट्राच्या किल्लारी येथे आणि २००१ मध्ये गुजरातच्या भुज परिसरातील कटू आठवणी अजूनही ताज्या आहेत. किल्लारीत १०,००० तर भुजमध्ये २२००० नागरिकांचे बळी गेले तर लाखो लोक बेघर झाले. प्राण्यांचे मृत्यू तसेच आर्थिक व नैसर्गिक हानी झाली ती वेगळी. सुदैवाने त्यानंतर कुठलाही भूकंप हानिकारक ठरला नाही. मात्र २००४ साली सुमात्रा बेटावर आलेल्या भूकंपामुळे हिंदी महासागरात सुनामी निर्माण झाली आणि त्याचे मोठे परिणाम तटावरील नागरिकांनी भोगावे लागले. २०१५ मध्ये नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे या देशात जीवित आणि वित्त हानी झाली.आपल्या देशात हिमालय आणि पूर्वोत्तर राज्ये हे भूकंपाचे संवेदनशील पट्टे म्हणून ओळखले जातात. याशिवाय गुजरातचे कच्छ आणि भुज या प्रदेशाचा कमी संवेदनशील भागात समावेश होतो. जीएसआयच्या अहवालानुसार २०१५ पासून पाच वर्षात १३८ मोठ्या भूकंपाच्या नोंदी झाल्या. याशिवाय ४ पेक्षा कमी तीव्रता असलेल्या भूकंप लहरींही घडल्या पण तीव्रता परिणामकारक नव्हती. यातील बहुतेक हिमालय आणि पूर्वोत्तर राज्यातील आहेत. १३८ पैकी काहींची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये ६ ते ७ च्या जवळपास होती. ही तीव्रता तशी धोकादायक मानली जाते. पूर्वोत्तर राज्यात भूकंपाबाबत जागृती असल्याने त्याचे परिणाम जाणवले नसल्याचे भूवैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपIndiaभारत