शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात देशात १३८ ठिकाणी भूकंप लहरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 23:43 IST

२०१५ पासून डिसेंबर २०१९ या काळात देशभरात विविध १३८ ठिकाणी भूकंपाचे धक्के नागरिकांनी अनुभवले आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देनेपाळ वगळता कुठेही जीवित व वित्तहानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१५ पासून डिसेंबर २०१९ या काळात देशभरात विविध १३८ ठिकाणी भूकंपाचे धक्के नागरिकांनी अनुभवले आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. सुदैवाने यातील कोणत्याच ठिकाणी जीवितहानी किंवा वित्त हानी झाली नाही.भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती भयावह चित्र निर्माण करणारी असते. भूगर्भातील हालचाली तशा नियमित घडणाऱ्या आहेत मात्र एखाद्या वेळी तीव्र स्वरूप धारण केले तर त्याचे भयकारी परिणाम मानव आणि सजीवांना सोसावे लागतात. १९९३ साली महाराष्ट्राच्या किल्लारी येथे आणि २००१ मध्ये गुजरातच्या भुज परिसरातील कटू आठवणी अजूनही ताज्या आहेत. किल्लारीत १०,००० तर भुजमध्ये २२००० नागरिकांचे बळी गेले तर लाखो लोक बेघर झाले. प्राण्यांचे मृत्यू तसेच आर्थिक व नैसर्गिक हानी झाली ती वेगळी. सुदैवाने त्यानंतर कुठलाही भूकंप हानिकारक ठरला नाही. मात्र २००४ साली सुमात्रा बेटावर आलेल्या भूकंपामुळे हिंदी महासागरात सुनामी निर्माण झाली आणि त्याचे मोठे परिणाम तटावरील नागरिकांनी भोगावे लागले. २०१५ मध्ये नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे या देशात जीवित आणि वित्त हानी झाली.आपल्या देशात हिमालय आणि पूर्वोत्तर राज्ये हे भूकंपाचे संवेदनशील पट्टे म्हणून ओळखले जातात. याशिवाय गुजरातचे कच्छ आणि भुज या प्रदेशाचा कमी संवेदनशील भागात समावेश होतो. जीएसआयच्या अहवालानुसार २०१५ पासून पाच वर्षात १३८ मोठ्या भूकंपाच्या नोंदी झाल्या. याशिवाय ४ पेक्षा कमी तीव्रता असलेल्या भूकंप लहरींही घडल्या पण तीव्रता परिणामकारक नव्हती. यातील बहुतेक हिमालय आणि पूर्वोत्तर राज्यातील आहेत. १३८ पैकी काहींची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये ६ ते ७ च्या जवळपास होती. ही तीव्रता तशी धोकादायक मानली जाते. पूर्वोत्तर राज्यात भूकंपाबाबत जागृती असल्याने त्याचे परिणाम जाणवले नसल्याचे भूवैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपIndiaभारत