शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

पाच वर्षात देशात १३८ ठिकाणी भूकंप लहरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 23:43 IST

२०१५ पासून डिसेंबर २०१९ या काळात देशभरात विविध १३८ ठिकाणी भूकंपाचे धक्के नागरिकांनी अनुभवले आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्देनेपाळ वगळता कुठेही जीवित व वित्तहानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१५ पासून डिसेंबर २०१९ या काळात देशभरात विविध १३८ ठिकाणी भूकंपाचे धक्के नागरिकांनी अनुभवले आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे. सुदैवाने यातील कोणत्याच ठिकाणी जीवितहानी किंवा वित्त हानी झाली नाही.भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती भयावह चित्र निर्माण करणारी असते. भूगर्भातील हालचाली तशा नियमित घडणाऱ्या आहेत मात्र एखाद्या वेळी तीव्र स्वरूप धारण केले तर त्याचे भयकारी परिणाम मानव आणि सजीवांना सोसावे लागतात. १९९३ साली महाराष्ट्राच्या किल्लारी येथे आणि २००१ मध्ये गुजरातच्या भुज परिसरातील कटू आठवणी अजूनही ताज्या आहेत. किल्लारीत १०,००० तर भुजमध्ये २२००० नागरिकांचे बळी गेले तर लाखो लोक बेघर झाले. प्राण्यांचे मृत्यू तसेच आर्थिक व नैसर्गिक हानी झाली ती वेगळी. सुदैवाने त्यानंतर कुठलाही भूकंप हानिकारक ठरला नाही. मात्र २००४ साली सुमात्रा बेटावर आलेल्या भूकंपामुळे हिंदी महासागरात सुनामी निर्माण झाली आणि त्याचे मोठे परिणाम तटावरील नागरिकांनी भोगावे लागले. २०१५ मध्ये नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे या देशात जीवित आणि वित्त हानी झाली.आपल्या देशात हिमालय आणि पूर्वोत्तर राज्ये हे भूकंपाचे संवेदनशील पट्टे म्हणून ओळखले जातात. याशिवाय गुजरातचे कच्छ आणि भुज या प्रदेशाचा कमी संवेदनशील भागात समावेश होतो. जीएसआयच्या अहवालानुसार २०१५ पासून पाच वर्षात १३८ मोठ्या भूकंपाच्या नोंदी झाल्या. याशिवाय ४ पेक्षा कमी तीव्रता असलेल्या भूकंप लहरींही घडल्या पण तीव्रता परिणामकारक नव्हती. यातील बहुतेक हिमालय आणि पूर्वोत्तर राज्यातील आहेत. १३८ पैकी काहींची तीव्रता रिश्टर स्केलमध्ये ६ ते ७ च्या जवळपास होती. ही तीव्रता तशी धोकादायक मानली जाते. पूर्वोत्तर राज्यात भूकंपाबाबत जागृती असल्याने त्याचे परिणाम जाणवले नसल्याचे भूवैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपIndiaभारत