शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
3
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
4
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
5
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
6
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
7
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
8
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
9
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
10
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
11
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
12
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
13
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
14
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
15
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
16
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
17
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
18
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
19
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
20
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले

ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 00:25 IST

काही व्यक्तींच्या जीवनाची ओळख अशी असते की जणू ईश्वराने नेमक्या त्याच कामासाठी त्यांना पृथ्वीवर पाठविले असावे असे वाटते. भजनसम्राट म्हणून नावलौकिक असलेले पं. अनुप जलोटा यांच्याबाबतीत असेच म्हणावे लागेल. ईश्वरानेच स्वर देऊन त्यांना भजन गाण्यासाठीच पाठविले की काय, असा भास व्हावा असा त्यांचा अंदाज. भावविभोर करणारा आवाज, कधी थांबत तर कधी लांब होणारे त्यांच्या सुरांचे आलाप आणि ऐकणाऱ्या  श्रोत्यांना थेट ईश्वरभक्तीत जोडणारा त्यांचा स्वर. त्यांच्या सुरांच्या जादूमुळे भक्तिरसात तल्लीन झाल्याचा अनुभव शनिवारीही नागपूरकरांना आला.

ठळक मुद्देजलोटा यांच्या भक्तिरसात श्रोते तल्लीन : साई पादुका आगमन सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही व्यक्तींच्या जीवनाची ओळख अशी असते की जणू ईश्वराने नेमक्या त्याच कामासाठी त्यांना पृथ्वीवर पाठविले असावे असे वाटते. भजनसम्राट म्हणून नावलौकिक असलेले पं. अनुप जलोटा यांच्याबाबतीत असेच म्हणावे लागेल. ईश्वरानेच स्वर देऊन त्यांना भजन गाण्यासाठीच पाठविले की काय, असा भास व्हावा असा त्यांचा अंदाज. भावविभोर करणारा आवाज, कधी थांबत तर कधी लांब होणारे त्यांच्या सुरांचे आलाप आणि ऐकणाऱ्या  श्रोत्यांना थेट ईश्वरभक्तीत जोडणारा त्यांचा स्वर. त्यांच्या सुरांच्या जादूमुळे भक्तिरसात तल्लीन झाल्याचा अनुभव शनिवारीही नागपूरकरांना आला.श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी तसेच श्री सदगुरु  साई चॅरिटेबल ट्रस्ट, नागपूर, श्री साई समाधी शताब्दी महोत्सव समिती विदर्भ आणि साईभक्त साईसेवक परिवार विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने साईबाबा चर्म चरण पादुका आगमन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याअंतर्गत चिटणीस पार्कवर ‘गजर साईनामाचा’ हा तीन दिवसीय भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. या महोत्सवात शनिवारी भजन गायक पद््मश्री पं. अनुप जलोटा यांनी आपल्या सादरीकरणाने रंग भरले. श्रोत्यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. रात्री ८ वाजता त्यांचे आगमन झाले. त्यांनी येताच आधी साई पादुकांचे दर्शन घेतले व त्यानंतर मंच सांभाळला. आपल्या चिरपरिचित अंदाजात ‘है आँख वो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभुचरण मे वंदना किया करे...’ या शायरीने सुरुवात करीत त्यांनी ‘जय श्री वीर बाबा, जय श्री वीर साई...’ ने आलाप दिला. मात्र लगेच त्यांनी ‘ऐसी लागी लगन, मीरा हो गई मगन...’ गात श्रोत्यांना आपल्याशी जोडले. हे भजन म्हणजे अनुप जलोटा यांची ओळखच होय. त्यामुळे त्यांचे गाणे सुरू होताच श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना प्रतिसाद दिला. पुढे त्यांनी ‘बचपन के शिवम, कृष्ण दामोदरम, राम नारायणम...’ सादर केले. अनुप जलोटा यांच्या चित्रपट गायकीला ४० वर्षांपूर्वी ज्या ‘शिर्डी के साईबाबा’ चित्रपटातून सुरुवात झाली, त्यातील ‘साईनाथ तेरे हजारो हाथ...’ गायला सुरू करताच श्रोत्यांच्या भावनांना वाट मोकळी झाली व प्रत्येकजण त्यांच्यासोबत गाऊ लागले.भजनांची ही सुरेल मैफिलीचा उत्तरोत्तर रंग चढत गेला.अनुप जलोटा यांनी ‘राम नाम की लूट है, लूट सके तो लूट..., साईबाबा बोलो..., पायो जी मैने राम रतन धन पायो..., जहां जहां मै जाता साई, गीत तुम्हारे गाता..., इतना तु करना स्वामी, जब प्राण तनसे निकले...’ अशी एकाहून एक सरस भजने त्यांनी सादर केली. त्यांच्या गायनाची प्रत्येक शैली श्रोत्यांचा मनाचा ठाव घेणारी होती. त्यांना सहगायिका नीता शाजी अग्रवाल यांच्यासह तबल्यावर देवेंद्र भारती, गिटारव धीरेंद्र व व्हायोलिनवर एम. राशीद यांनी सुरेल साथसंगत केली. यादरम्यान पं. जलोटा यांची सरगम व राशीद यांच्या व्हायोलिनची जुगलबंदी श्रोत्यांना उत्साहित करून गेली.कार्यक्रमापूर्वी आयोजन समितीचे संयोजक पंकज महाजन यांनी अनुप जलोटा यांचे व इतर कलावंतांचे स्वागत केले. तत्पूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साईपादुकांचे दर्शन घेतले. यासोबतच आमदार कृष्णा खोपडे, माजी खासदार दत्ता मेघे, वीरबजरंगी सेवा संस्थानचे अध्यक्ष श्रीकांत आगलावे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, राजीव जयस्वाल, बंडू राऊत, साई चित्रकार सुनील शेगावकर उद्योजक प्रशांत शेंडे यांनी भेट दिली. आयोजनात प्रदीप साबळे, विवेक अवसरे, प्रमोद कोरमकर, राज कोरमकर, नरेंद्र धनविजय, पंकज झरबडे, मोहन चौहान, भूषण परसोडकर, आशिष चिरकुटे, अनुपम बल्की, अमोल बैस, अमित गोंडाणे, विजय भोयर, सचिन खवले, जिगनेश साबळे, भूपेन दाते, आशिष खिरेकर आदींचा सक्रिय सहभाग आहे.लाखो भाविकांनी घेतले दर्शनसाई पादुका आगमन सोहळा हा नागपूर व विदर्भातील साईभक्तांसाठी अविस्मरणीय क्षण ठरत आहे. २५ ला साईबाबांच्या चरण पादुकांचे आगमन झाले तेव्हापासून पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची गर्दी होत आहे. शनिवारी सकाळपासूनच भाविकांनी पादुका दर्शनासाठी चिटणीस पार्क वर रीघ लागली होती. साईनामाचा गजर करीत भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी पोहचत होते. ही गर्दी रात्री उशिरापर्यंत होती. दिवसभरात लाखो भाविकांनी साईपादुकांचे दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :saibabaसाईबाबाnagpurनागपूर