शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

द्वारकानाथ संझगिरी यांनी उलगडली लतादीदींची ‘अनकहीं दास्तान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 07:10 IST

'शब्दांना स्वरांची पालखी मिळाली तर अत्यानंद होतो आणि तेव्हा शब्द आणि स्वरांचे द्वंद्व संपलेले असते... ' अशा वाक्याने सुरुवात करत प्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी यांनी लतादीदींविषयीच्या अनेक बाबी उलगडून सांगितल्या.

ठळक मुद्देराम शेवाळकर जयंतीनिमित्त ‘याद-ए-लता’

नागपूर : शब्दांना स्वरांची पालखी मिळाली तर अत्यानंद होतो आणि तेव्हा शब्द आणि स्वरांचे द्वंद्व संपलेले असते... अशा वाक्याने सुरुवात करत प्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी यांनी लतादीदींविषयीच्या अनेक बाबी उलगडून सांगितल्या. शेवाळकर कुटुंबीयांच्या वतीने कीर्तनकेसरी भाऊसाहेब उपाख्य राम शेवाळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने बुधवारी शेवाळकर हाऊस येथे ‘याद-ए-लता’ हा ऑडिओ व्हिज्युअल बायोग्राफिक कार्यक्रम पार पडला.

द्वारकानाथ संझगिरी यांनी यावेळी वडील पं. दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून अवघ्या पाच-सहा वर्षाच्या हाती मिळालेला तंबोरा आणि संगीताचे धडे, एका भिकाऱ्याचे गायन ऐकून ओशाळलेले दीनानाथ, त्यांचे ‘माझेही एक-दोनच दिवस उरले’ हे वक्तव्य, त्यांचा मृत्यू आणि अंत्यसंस्काराला न आलेले कोणी, त्यानंतर लतादीदींचा सुरू झालेला प्रवास आदींवर प्रकाश टाकला. त्यांचे ‘पहिली मंगळागौर’ या मराठी चित्रपटातील पहिले गाणे, ‘आपके सेवा में’ या हिंदी चित्रपटातील पहिले गाणे कसे मिळाले, लंडन येथील अल्बर्ट हॉलमध्ये झालेला पहिली भारतीय गायिका म्हणून लतादीदींचा कार्यक्रम आणि तोपर्यंतच्या काळात प्रथमच हाऊसफुल झालेला इतिहास आदी इतिहासकालीन गोष्टी संझगिरी यांनी उलगडल्या.

यासोबतच गुलाम हैदर, खेमचंद प्रकाश, अनिल बिश्वास, सज्जाद हुसैन यांच्याबरोबरचे त्यांचे गुरू-शिष्याचे नाते आणि त्यांचे एकमेकांबाबतचे मत, यावरही संझगिरी व्यक्त झाले. ‘कल्पवृक्ष, कन्येसाठी लावूनिया बाबा गेला, याल का हो बाबा भेटायला’ हे गाणे गाताना लतादीदींच्या मनाची झालेली घालमेल आणि त्यांचे बेशुद्ध पडण्यासारख्या घटनाक्रमांना उजाळा देत लतादीदीच्या स्वरांवर झालेले संशोधन अशा एक ना अनेक बाबींची माहिती संझगिरी यांनी यावेळी दिली. तत्पूर्वी, गिरीश गांधी व आशुतोष शेवाळकर यांच्या हस्ते द्वारकानाथ संझगिरी यांचे स्वागत करण्यात आले. रेणुका देशकर यांनी संचालन केले. 

........

टॅग्स :Socialसामाजिक