शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

द्वारकानाथ संझगिरी यांनी उलगडली लतादीदींची ‘अनकहीं दास्तान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 07:10 IST

'शब्दांना स्वरांची पालखी मिळाली तर अत्यानंद होतो आणि तेव्हा शब्द आणि स्वरांचे द्वंद्व संपलेले असते... ' अशा वाक्याने सुरुवात करत प्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी यांनी लतादीदींविषयीच्या अनेक बाबी उलगडून सांगितल्या.

ठळक मुद्देराम शेवाळकर जयंतीनिमित्त ‘याद-ए-लता’

नागपूर : शब्दांना स्वरांची पालखी मिळाली तर अत्यानंद होतो आणि तेव्हा शब्द आणि स्वरांचे द्वंद्व संपलेले असते... अशा वाक्याने सुरुवात करत प्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी यांनी लतादीदींविषयीच्या अनेक बाबी उलगडून सांगितल्या. शेवाळकर कुटुंबीयांच्या वतीने कीर्तनकेसरी भाऊसाहेब उपाख्य राम शेवाळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने बुधवारी शेवाळकर हाऊस येथे ‘याद-ए-लता’ हा ऑडिओ व्हिज्युअल बायोग्राफिक कार्यक्रम पार पडला.

द्वारकानाथ संझगिरी यांनी यावेळी वडील पं. दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून अवघ्या पाच-सहा वर्षाच्या हाती मिळालेला तंबोरा आणि संगीताचे धडे, एका भिकाऱ्याचे गायन ऐकून ओशाळलेले दीनानाथ, त्यांचे ‘माझेही एक-दोनच दिवस उरले’ हे वक्तव्य, त्यांचा मृत्यू आणि अंत्यसंस्काराला न आलेले कोणी, त्यानंतर लतादीदींचा सुरू झालेला प्रवास आदींवर प्रकाश टाकला. त्यांचे ‘पहिली मंगळागौर’ या मराठी चित्रपटातील पहिले गाणे, ‘आपके सेवा में’ या हिंदी चित्रपटातील पहिले गाणे कसे मिळाले, लंडन येथील अल्बर्ट हॉलमध्ये झालेला पहिली भारतीय गायिका म्हणून लतादीदींचा कार्यक्रम आणि तोपर्यंतच्या काळात प्रथमच हाऊसफुल झालेला इतिहास आदी इतिहासकालीन गोष्टी संझगिरी यांनी उलगडल्या.

यासोबतच गुलाम हैदर, खेमचंद प्रकाश, अनिल बिश्वास, सज्जाद हुसैन यांच्याबरोबरचे त्यांचे गुरू-शिष्याचे नाते आणि त्यांचे एकमेकांबाबतचे मत, यावरही संझगिरी व्यक्त झाले. ‘कल्पवृक्ष, कन्येसाठी लावूनिया बाबा गेला, याल का हो बाबा भेटायला’ हे गाणे गाताना लतादीदींच्या मनाची झालेली घालमेल आणि त्यांचे बेशुद्ध पडण्यासारख्या घटनाक्रमांना उजाळा देत लतादीदीच्या स्वरांवर झालेले संशोधन अशा एक ना अनेक बाबींची माहिती संझगिरी यांनी यावेळी दिली. तत्पूर्वी, गिरीश गांधी व आशुतोष शेवाळकर यांच्या हस्ते द्वारकानाथ संझगिरी यांचे स्वागत करण्यात आले. रेणुका देशकर यांनी संचालन केले. 

........

टॅग्स :Socialसामाजिक