शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

लॉकडाऊन काळात नागपूरच्या इंदोरा बुद्ध विहारात लागले २० लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 20:51 IST

अनेकांनी यावर्षी ठरलेले मुहूर्ताचे लग्न रद्द केले किंवा पुढे ढकलले. काहींनी मात्र ठरलेली तारीख टाळण्याऐवजी असलेल्या परिस्थितीत अत्यल्प लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकवून घेतले. हो पण थाटामाटात लग्न करण्याचा मोह त्यांना टाळावा लागला. अशाच पद्धतीने शहरातील इंदोरा मोठा बुद्ध विहार येथे २० जोडप्याने आपले लग्नकार्य उरकून घेतले.

ठळक मुद्देफिजिकल डिस्टन्सिंगचे पालन : सर्व धर्मीयांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना महामारीमुळे लग्न समारंभावर यावर्षी खऱ्या अर्थाने विघ्न आणले. विषाणूचा सामूहिक प्रादुर्भाव होण्याची भीती पाहता लॉकडाऊन काळात लग्नसोहळ्यासारख्या सार्वजनिक समारोहवर बंदी घालण्यात आली आणि अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. परिस्थितीच तशी असल्याने पर्याय नव्हता. त्यामुळे अनेकांनी यावर्षी ठरलेले मुहूर्ताचे लग्न रद्द केले किंवा पुढे ढकलले. काहींनी मात्र ठरलेली तारीख टाळण्याऐवजी असलेल्या परिस्थितीत अत्यल्प लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकवून घेतले. हो पण थाटामाटात लग्न करण्याचा मोह त्यांना टाळावा लागला. अशाच पद्धतीने शहरातील इंदोरा मोठा बुद्ध विहार येथे २० जोडप्याने आपले लग्नकार्य उरकून घेतले.विहाराच्या व्यवस्थापकाने दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात कुणीही लग्नासाठी संपर्क साधला नाही. त्यानंतर मात्र लोकांनी लग्न करून घेण्याची विनंती केली. काहींनी साधेपणाने लग्न पार पाडून पूर्ण खर्च सामाजिक कार्यासाठी देण्याचा निर्णय याच विहारात घेतला. महापालिका प्रशासनाने १५-२० लोकांच्या उपस्थितीत लग्न कार्य करण्यासाठी परवानगी दिली होती. या अटींचे पालन करीत लोकांनी ठरलेले लग्नसोहळे पार पाडले.व्यवस्थापकाच्या माहितीनुसार विहारात आतापर्यंत २० जोडप्यानी लग्न केले. यावेळी विहार प्रशासनाने फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन केले. मास्क, सॅनिटायझरच्या वापरापासून सुरक्षित अंतर पाळण्याचे बंधन घालण्यात आले. सुरुवातीला १०-१५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात मनपाने ५० लोकांच्या उपस्थितीची संधी दिली असली तरी आम्ही ते टाळत असल्याचेही त्यांनी सांगितले. या २० जोडप्यामध्ये केवळ बौद्ध समाजाचा समावेश नसून अनेक धर्माच्या जोडप्यानी विहारात विवाह उरकून घेतला. हो पण विवाह बौद्ध पद्धतीनेच लावण्यात आले. यात नागपूर शहरच नाही तर जिल्ह्यातील आसपासच्या परिसरातील जोडप्यांचा समावेश होता. शिवाय एकदोन प्रेमीयुगलांचाही समावेश होता. याबाबतची सर्व माहिती मनपा प्रशासनाला देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :marriageलग्नnagpurनागपूर