नागपूर : शहरातील जलसंपदेत महत्त्वाचे स्थान आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या सक्करदरा तलावाचे अस्तित्व आता संकटात आले आहे. तलाव आहे की डम्पिंग यार्ड, अशी या तलावाची अवस्था झाली आहे. आसपासच्या वस्त्यांमधून येणाऱ्या घरातील सिवेज आणि कचऱ्यामुळे रासायनिक प्रदूषण प्रचंड वाढले असून, जैवविविधताच धोक्यात आली आहे. नीरीने महापालिकेत सादर केलेल्या तलावाच्या अहवालानुसार तलावाच्या अस्तित्वाचेच संकट निर्माण झाले आहे.
एक तर तलावात पाणी उरलेले नाही. शुद्ध पाण्याऐवजी जवळच्या वस्तीतून येणारे सांडपाणी येथे साठलेले आहे. शिवाय नागरिकांनी फेकलेल्या कचऱ्यामुळे चारही बाजूचे किनारे कचऱ्याने भरलेले आहे. त्यामुळे तलाव नसून कचराघर असल्याची स्थिती आहे. सिवेजच्या पाण्यामुळे माेठ्या प्रमाणात जलकुंभी वनस्पती वाढल्या आहेत. शिवाय झुप्लॅन्कटन्स(प्रदूषित जीवाणू)चे प्रमाणही प्रचंड वाढल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे. त्यामुळे जलचार प्राण्यांची जैवविविधताच तलावातून नष्ट झाली आहे. तलाव शुद्धीकरणाचे प्रयत्न हाेतात पण सिवेज बंद झाल्याशिवाय त्याचा काही उपयाेग हाेणार नसल्याचे मत आहे. त्यामुळे हे भाेसलेकालीन ऐतिहासिक तलाव येत्या काही वर्षांत नाईक तलावासारखे नामशेष हाेण्याची भीती पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.
-वाढले प्रदूषित रासायनिक तत्त्व
नीरीच्या अहवालानुसार, तलावाच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणारे सारेच तत्त्व सक्करदरा तलावात वाढले आहेत.
- तलावाची केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) प्रमाणाबाहेर वाढली आहे. २०१९ ला ती १०९ मिलीग्रॅम/लिटर हाेती, जी आता १२५ वर गेली. बीओडी २०१९ मध्ये १६ मिग्रॅम/लिटर हाेते, जे यावर्षी पुन्हा वाढले आहे.
- गढूळपणा हा ५५ एनटीयूच्या पार झाला आहे.
- नायट्रेटचे प्रमाण ३.५ ते २२ मिग्रॅम/लिटरवर पाेहचले आहे. हीच अवस्था सल्फेटबाबत आहे. ते १७५ मिग्रॅ/लिटरच्या वर पाेहचले आहे.
- फाॅस्फरसचा स्तर प्रमाणाबाहेर वाढला आहे. आम्लपणा म्हणजे पीएच स्तर ८.२ च्याही पुढे आहे.
- तलावातील झुप्लॅन्कटन्स २०१९ मध्ये ५३५०/मीक्युब हाेते. म्हणजे प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक. यावर्षी पुन्हा त्यात वाढ झाली आहे.
- कचरा व प्रदूषणामुळे पाण्याचा रंगही हिरवा हाेत आहे.
- पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण नगण्य असल्याचे लक्षात येते. सामान्यपणे तलावाच्या पाण्यात हे प्रमाण कमीतकमी ४.५० ते ५ मिलीग्रॅम/लिटर असायला हवे. मात्र सक्करदरा तलावात ऑक्सिजनचे प्रमाण २.५० च्याही खाली जात आहे.
२०१९ मध्ये हा तलाव साफ करण्यात आला हाेता. मात्र पुन्हा स्थिती जैसे थे झाली आहे. जाेपर्यंत तलावात येणारे आसपासच्या वस्त्यामधील सिवेज बंद हाेणार नाही आणि लाेकांचे कचरा फेकणे बंद हाेणार नाही, ताेपर्यंत स्वच्छतेचा काही उपयाेग हाेणार नाही. महापालिकेने गंभीरपणे या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा आपण हा ऐतिहासिक वारसा गमावल्याशिवाय राहणार नाही.
- काैस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हिजिल संस्था
-