शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

सक्करदरा तलाव की डम्पिंग यार्ड?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:07 IST

नागपूर : शहरातील जलसंपदेत महत्त्वाचे स्थान आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या सक्करदरा तलावाचे अस्तित्व आता संकटात आले आहे. तलाव आहे ...

नागपूर : शहरातील जलसंपदेत महत्त्वाचे स्थान आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या सक्करदरा तलावाचे अस्तित्व आता संकटात आले आहे. तलाव आहे की डम्पिंग यार्ड, अशी या तलावाची अवस्था झाली आहे. आसपासच्या वस्त्यांमधून येणाऱ्या घरातील सिवेज आणि कचऱ्यामुळे रासायनिक प्रदूषण प्रचंड वाढले असून, जैवविविधताच धोक्यात आली आहे. नीरीने महापालिकेत सादर केलेल्या तलावाच्या अहवालानुसार तलावाच्या अस्तित्वाचेच संकट निर्माण झाले आहे.

एक तर तलावात पाणी उरलेले नाही. शुद्ध पाण्याऐवजी जवळच्या वस्तीतून येणारे सांडपाणी येथे साठलेले आहे. शिवाय नागरिकांनी फेकलेल्या कचऱ्यामुळे चारही बाजूचे किनारे कचऱ्याने भरलेले आहे. त्यामुळे तलाव नसून कचराघर असल्याची स्थिती आहे. सिवेजच्या पाण्यामुळे माेठ्या प्रमाणात जलकुंभी वनस्पती वाढल्या आहेत. शिवाय झुप्लॅन्कटन्स(प्रदूषित जीवाणू)चे प्रमाणही प्रचंड वाढल्याने पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे. त्यामुळे जलचार प्राण्यांची जैवविविधताच तलावातून नष्ट झाली आहे. तलाव शुद्धीकरणाचे प्रयत्न हाेतात पण सिवेज बंद झाल्याशिवाय त्याचा काही उपयाेग हाेणार नसल्याचे मत आहे. त्यामुळे हे भाेसलेकालीन ऐतिहासिक तलाव येत्या काही वर्षांत नाईक तलावासारखे नामशेष हाेण्याची भीती पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

-वाढले प्रदूषित रासायनिक तत्त्व

नीरीच्या अहवालानुसार, तलावाच्या प्रदूषणास कारणीभूत ठरणारे सारेच तत्त्व सक्करदरा तलावात वाढले आहेत.

- तलावाची केमिकल ऑक्सिजन डिमांड (सीओडी) प्रमाणाबाहेर वाढली आहे. २०१९ ला ती १०९ मिलीग्रॅम/लिटर हाेती, जी आता १२५ वर गेली. बीओडी २०१९ मध्ये १६ मिग्रॅम/लिटर हाेते, जे यावर्षी पुन्हा वाढले आहे.

- गढूळपणा हा ५५ एनटीयूच्या पार झाला आहे.

- नायट्रेटचे प्रमाण ३.५ ते २२ मिग्रॅम/लिटरवर पाेहचले आहे. हीच अवस्था सल्फेटबाबत आहे. ते १७५ मिग्रॅ/लिटरच्या वर पाेहचले आहे.

- फाॅस्फरसचा स्तर प्रमाणाबाहेर वाढला आहे. आम्लपणा म्हणजे पीएच स्तर ८.२ च्याही पुढे आहे.

- तलावातील झुप्लॅन्कटन्स २०१९ मध्ये ५३५०/मीक्युब हाेते. म्हणजे प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक. यावर्षी पुन्हा त्यात वाढ झाली आहे.

- कचरा व प्रदूषणामुळे पाण्याचा रंगही हिरवा हाेत आहे.

- पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण नगण्य असल्याचे लक्षात येते. सामान्यपणे तलावाच्या पाण्यात हे प्रमाण कमीतकमी ४.५० ते ५ मिलीग्रॅम/लिटर असायला हवे. मात्र सक्करदरा तलावात ऑक्सिजनचे प्रमाण २.५० च्याही खाली जात आहे.

२०१९ मध्ये हा तलाव साफ करण्यात आला हाेता. मात्र पुन्हा स्थिती जैसे थे झाली आहे. जाेपर्यंत तलावात येणारे आसपासच्या वस्त्यामधील सिवेज बंद हाेणार नाही आणि लाेकांचे कचरा फेकणे बंद हाेणार नाही, ताेपर्यंत स्वच्छतेचा काही उपयाेग हाेणार नाही. महापालिकेने गंभीरपणे या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा आपण हा ऐतिहासिक वारसा गमावल्याशिवाय राहणार नाही.

- काैस्तुभ चटर्जी, ग्रीन व्हिजिल संस्था

-