शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
3
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
4
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
5
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
6
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
7
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
8
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
9
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
10
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
11
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
12
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
13
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
14
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
15
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
16
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
17
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
18
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
19
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
20
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
Daily Top 2Weekly Top 5

जलजन्य आजारामुळे राज्यात ४९ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 13:41 IST

२०१५ सालापासून साडेतीन वर्षांत पावसाळ्याच्या काळात डोके वर काढणाऱ्या जलजन्य आजारांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्देसाडेतीन वर्षांची आकडेवारीसर्वच आजारांवर नियंत्रणाचा दावा कशाच्या आधारावर?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१५ सालापासून साडेतीन वर्षांत पावसाळ्याच्या काळात डोके वर काढणाऱ्या जलजन्य आजारांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. मात्र तरीदेखील या आजारांवर नियंत्रण आणल्याचा दावा आरोग्य सेवा संचालनालयातर्फे करण्यात आला आहे. २०१५ पासून साडेतीन वर्षांत कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, काविळ, विषमज्वर यासारख्या आजारांमुळे राज्यात ४९ बळी गेले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत आरोग्य सेवा संचालनालयाकडे विचारणा केली होती. २०१५ ते जुलै २०१८ या कालावधीत कॉलरा, गॅस्ट्रो, अतिसार, काविळ, विषमज्वर यासारख्या आजारांची किती जणांना लागण झाली, या आजारांमुळे किती रुग्णांचा मृत्यू झाला, आजारांवर नियंत्रणासाठी किती औषधांची खरेदी झाली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार साडेतीन वर्षांच्या कालावधीत राज्यात २१ हजार १४० नागरिकांना जलजन्य आजारांची लागण झाली. यातील ४९ जणांचा मृत्यू झाला. २०१५ मध्ये लागण झालेल्यांची संख्या ५ हजार १७५ इतकी होती. २०१६ मध्ये हा आकडा ६ हजार १२ वर पोहोचला तर तर २०१७ मध्ये ८ हजार ५४९ जणांना लागण झाली. २०१८ मध्ये जुलै महिन्यापर्यंत १ हजार ४०४ जणांना हे आजार झाले आहेत.२०१५ पासून दरवर्षी सातत्याने संख्या वाढल्याचे दिसून आले. तर २०१८ मधील पावसाळ््यातील आकडेवारी देण्यात आलेली नाही. अशा स्थितीत सर्वच आजारांवर नियंत्रण आल्याचा आरोग्य सेवा संचालनालयाचा दावा विरोधाभासी असल्याचे दिसून येत आहे.

‘गॅस्ट्रो’चा ज्वर ठरतोय धोकादायक२०१५ सालापासून ‘कॉलरा’, अतिसार, विषमज्वर यांची लागण झालेल्या रुग्णांची संख्या घटली आहे. मात्र ‘गॅस्ट्रो’ हा सर्वाधिक धोकादायक ठरतो आहे. साडेतीन वर्षांत ९ हजार ८२२ नागरिकांना याची लागण झाली व २६ नागरिकांचा बळी गेला. ९ हजार ४० नागरिकांना अतिसाराची लागण झाली व १० जणांचा जीव गेला.

टॅग्स :Healthआरोग्य