शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

‘वायु’ चक्रीवादळाने मान्सून लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:30 IST

जून महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला आहे. तरीही मान्सूनचा पत्ता नाही. इतकेच नव्हे तर मान्सूनपूर्व पडणाऱ्या मुसळधार पावसाचीही प्रतीक्षा आहे. काही दिवसापूर्वी पावसाला सुरुवात झाली होती. परंतु ‘वायु’ चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला आहे. नागपूरकरांना मान्सूनच्या पावसासाठी किमान २५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

ठळक मुद्देउकाड्याने नागपूरकर त्रस्त 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जून महिन्याचा तिसरा आठवडा संपत आला आहे. तरीही मान्सूनचा पत्ता नाही. इतकेच नव्हे तर मान्सूनपूर्व पडणाऱ्या मुसळधार पावसाचीही प्रतीक्षा आहे. काही दिवसापूर्वी पावसाला सुरुवात झाली होती. परंतु ‘वायु’ चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर पडला आहे. नागपूरकरांना मान्सूनच्या पावसासाठी किमान २५ जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.नागपूरच्या आकाशात ढग दाटून येत होते. परंतु ‘वायु’ चक्रीवादळाने जोर पकडताच नागपूरसह विदर्भातील आकाशातून काळे ढग निघून गेले आहेत. शुक्रवारी पूर्व नागपूरसह शहरातील काही भागात जोरदार हवा आणि पावसाच्या काही सरी पडल्या. काही मिनिटाच्या या पावसामुळे उकाडा आणखी वाढला आहे. मागील काही दिवसांपासून नागपूरकर उकाड्यामुळे त्रस्त आहेत.नागपुरात १० जूनपर्यंत मान्सून पोहोचतो. परंतु यंदा दक्षिण भारतातच मान्सून आठ दिवस विलंबाने पोहोचला. त्यानंतर वायु चक्रीवादळाने मान्सूनच्या गतीला प्रभावित केले आहे. अशा परिस्थितीत नागपुरात जो मान्सून २० जून रोजी सक्रिय होणार होता. तो आणखी लांबला आहे. वायु चक्रीवादळामुळे ढगांची आर्द्रताही प्रभावित झाली आहे. त्यामुळे नागपुरात जून महिन्यातही पारा सरासरीपेक्षा जास्त आहे. शुक्रवारी दिवस आणि रात्रीचे तापमान सरासरीपेक्षा तीन डिग्री अधिक म्हणजे ४३ आणि ३०.५ डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आले आहे.संपूर्ण विदर्भच तापतोयसाधारणपणे जूनच्या मध्यात पाऊस होतो. परंतु सध्या पूर्ण विदर्भातच दुष्काळसदृश परिस्थिती आहे. सध्या विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिवस व रात्रीचे तापमान सरासरपेक्षा तीन ते पाच डिग्री सेल्सियसने अधिक आहे. यामुळे ही कडक उन त्रासदायक ठरत आहे. जून महिन्यात ४० डिग्रीपेक्षा कमी तापमान राहते. यंदा सर्व जिल्ह्यातील तापमान अधिक आहे. शुक्रवारी ४४.६ डिग्री तापमानासह चंद्रपूर सर्वाधिक उष्ण राहिले. याशिवाय ब्रह्मपुरी ४४.५ डिग्री सेल्सियस, गडचिरोली ४४.२, वर्धा ४३, अकोला ४२.२, अमरावती ४०.८, यवतमाळ ४०.५, वाशिम ४०, बुलडाणा ३९ डिग्री सेल्सियस कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर