शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
4
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
5
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
6
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
7
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
8
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
9
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
10
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
11
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
12
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
13
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
14
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
15
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
16
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
17
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
18
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
19
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
20
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी

वर्तमान राजकारणामुळे देशात असुरक्षेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2022 22:04 IST

Nagpur News वर्तमान राजकारणामुळे देशात असुरक्षेचे वातावरण पसरले आहे, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी शुक्रवारी नागभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देराज्यघटनेला धोका नसल्याचे स्पष्ट केले

नागपूर : वर्तमान राजकारणामुळे देशात असुरक्षेचे वातावरण पसरले आहे, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी शुक्रवारी नागभूषण पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना व्यक्त केले. याप्रसंगी देशाचे माजी सॉलिसिटर जनरल ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हरीश साळवे उपस्थित होते.

देशातील सध्याची परिस्थती पाहता राज्यघटना धोक्यात असल्याची अनेकांची भावना झाली आहे. परंतु, हा समज चुकीचा आहे. देशाची न्यायव्यवस्था राज्यघटनेची रक्षक आहे. न्यायालये राज्यघटनेच्या संरक्षणासाठी दिवसरात्र कार्य करीत आहेत. देशामध्ये धाडसी न्यायमूर्ती व वकील मंडळी आहेत. परिणामी, देशाची राज्यघटना सुरक्षित आहे, असे न्या. बोबडे यांनी पुढे बोलताना सांगितले.

नागपुरातील नागभूषण अवॉर्ड फाउंडेशनच्या वतीने शुक्रवारी निवृत्त न्या. शरद बोबडे यांच्यासह स्वातंत्र संग्राम सैनिक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई चितळे व ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हरीश साळवे यांना अनुक्रमे २०२१, २०२० व २०१९ मधील नागभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

निवृत्त न्यायमूर्ती सिरपूरकर यांनीही देशाच्या राज्यघटनेला धोका नसल्याचे नमूद केले. सर्वोच्च न्यायालय कधीच देशाच्या राज्यघटनेत बदल करू देणार नाही. वर्तमान राज्यघटना कायम आहे व कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तिन्ही पुरस्कारर्थी आपापल्या बाबतीत श्रेष्ठ आहेत आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण जगात नागपूरचे नाव मोठे केले आहे, असेदेखील न्या. सिरपूरकर यांनी सांगितले.

देशाची राज्यघटना धोक्यात असल्याचा मुद्दा लीलाताई चितळे यांनी उपस्थित केला होता. त्यावर नंतर न्या. बोबडे व न्या. सिरपूरकर यांनी त्यांचे मत व्यक्त केले. समानता, न्याय व स्वातंत्र भारतीय राज्यघटनेचा पाया आहे. परंतु, सध्या या तिन्ही तत्त्वांना धोका निर्माण झाला आहे. करिता नागरिकांनी एकजूट होऊन राज्यघटनेचे संरक्षण करावे, असे आवाहन लीलाताई यांनी यावेळी केले.

हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे अध्यक्ष ॲड. अतुल पांडे, सचिव ॲड. अमोल जलतारे, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. कमल सतुजा, सचिव ॲड. नितीन देशमुख व इतर पदाधिकाऱ्यांनीही पुरस्कारर्थींचा सत्कार केला. फाउंडेशनचे अध्यक्ष व राज्यसभेचे माजी सदस्य अजय संचेती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. हा कार्यक्रम वर्धा रोडवरील हॉटेलमध्ये पार पडला. फाउंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष विलास काळे, उपाध्यक्ष झमीन अमीन, सचिव ॲड. निशांत गांधी व कोषाध्यक्ष सतीश गोयल व्यासपीठावर उपस्थित होते.

नागपूरसोबत भावनिक नाते - ॲड. साळवे

बालपण घालवल्यामुळे नागपूरसोबत भावनिक नाते आहे. नागपूरच्या रोडवर सायकलने फिरत होतो. त्यामुळे विविध परिसर ओळखीचे आहेत. जीवनातील अनेक संस्मरणीय क्षण नागपूरशी संबंधित आहेत. नागपूर घरासारखे आहे आणि हा पुरस्कार घरचा असल्यामुळे त्याला अधिक महत्त्व आहे, अशा भावना ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. हरीश साळवे यांनी व्यक्त केल्या. लहानपणी आईमुळे अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, ज्याचा वकिली व्यवसायात फायदा होतोय, असेही त्यांनी सांगितले.

नागपूरला जगात ओळख मिळवून दिली - देवेंद्र फडणवीस

हे पुरस्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान केले जाणार होते. परंतु, तातडीने गुजरातला जावे लागल्यामुळे ते कार्यक्रमात उपस्थित राहू शकले नाही. करिता, त्यांनी व्हिडीओ संदेश पाठवून तिन्ही पुरस्कारर्थींचे अभिनंदन केले. तिन्ही पुरस्कारर्थींनी नागपूरला संपूर्ण जगामध्ये ओळख मिळवून दिली. तिघेही श्रेष्ठ व नम्र स्वभावाचे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्यामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली, असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Socialसामाजिक