शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

पंतप्रधानांच्या योजनेमुळे ‘एमएसएमई’ला विस्ताराची संधी : मान्यवरांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 22:46 IST

देशाच्या आर्थिक विकासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची महत्त्वाची भूमिका आहे. या उद्योगांना अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘५९ मिनिटात कर्ज’ ही योजना उद्योजकांसाठी एक सुवर्णसंधीच आहे. याशिवाय नवीन योजनांद्वारे तरुण-तरुणींना उद्योजक बनण्याची संधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे. केंद्राचे हे पाऊल प्रशंसनीय असून त्यामुळे ‘एमएसएमई’ला विस्ताराची संधी असल्याचा सूर मान्यवरांनी काढला.

ठळक मुद्देउद्योजकांना एक कोटीपर्यंत कर्ज, नागपुरात १०० कोटींचे कर्जवाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या आर्थिक विकासात सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची महत्त्वाची भूमिका आहे. या उद्योगांना अधिक सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ‘५९ मिनिटात कर्ज’ ही योजना उद्योजकांसाठी एक सुवर्णसंधीच आहे. याशिवाय नवीन योजनांद्वारे तरुण-तरुणींना उद्योजक बनण्याची संधी केंद्र सरकारने उपलब्ध करून दिली आहे. केंद्राचे हे पाऊल प्रशंसनीय असून त्यामुळे ‘एमएसएमई’ला विस्ताराची संधी असल्याचा सूर मान्यवरांनी काढला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी १०० दिवसांचा सपोर्ट आणि आऊटरिच प्रोग्राम दाखल केला आहे. प्रोग्रामची उद्योजकांना माहिती देऊन तो अधिक सक्षम व्हावा, या उद्देशपूर्तीच्या शृंखलेंतर्गत विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए), एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन (एमआयए), बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशन (बीएमए) आणि डिक्की यांच्या संयुक्त समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी सिव्हिल लाईन्स येथील उद्योग भवनातील व्हीआयएच्या सभागृहात उद्योजकांची कार्यशाळा घेण्यात आली. व्यासपीठावर व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, व्हीआयएच्या फूड प्रोसेसिंग फोरमचे अध्यक्ष अरुण खोब्रागडे, उद्योग सहसंचालक अशोक धर्माधिकारी, डिक्कीच्या पश्चिम भारताचे अध्यक्ष निश्चय शेळके, विदर्भाचे अध्यक्ष गोपाल वासनिक, सीए समीर बाकरे उपस्थित होते.उद्योगांना विस्तारासाठी नागपुरात १०० कोटींचे कर्ज वितरणउद्घाटनप्रसंगी अतुल पांडे म्हणाले, योजनेंतर्गत पात्र उद्योजकांना उद्योगाच्या विस्तारासाठी इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) आणि पाच राष्ट्रीयकृत बँकांकडून एक कोटींपर्यंत कर्ज केवळ ५९ मिनिटात केवळ ९ टक्के व्याजदराने मिळणार आहे. याकरिता तारण ठेवावे लागणार नाही. कर्ज ऑनलाईन अर्ज करून मिळणार आहे. आतापर्यंत नागपुरात १०० कोटींचे कर्ज वितरण झाले आहे. पंतप्रधानांचा ‘एमएसएमई’च्या विकासासाठी राबविण्यात येणारा कार्यक्रम प्रशंसनीय आहे. त्यामुळे उद्योजकांच्या आर्थिक अडचणी दूर होणार आहेत.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानnagpurनागपूर