शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

नकाशा न पुरविल्यामुळे विद्यार्थ्यांचे १० गुणांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:40 IST

मंगळवारी बारावीचा भूगोलाचा पेपर होता. यात १० गुणांच्या एका प्रश्नाचे उत्तर हे नकाशाचा वापर करून सोडविण्यास सांगितले होते. त्यासाठी बोर्डाकडून नकाशा पुरविण्यात येणार होता. पण विद्यार्थ्यांना पेपरच्या दरम्यान नकाशा पुरविण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे १० गुणांचे नुकसान झाले, अशी ओरड पालकांकडून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपालकांची ओरड : बोर्डाकडे केली तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी बारावीचा भूगोलाचा पेपर होता. यात १० गुणांच्या एका प्रश्नाचे उत्तर हे नकाशाचा वापर करून सोडविण्यास सांगितले होते. त्यासाठी बोर्डाकडून नकाशा पुरविण्यात येणार होता. पण विद्यार्थ्यांना पेपरच्या दरम्यान नकाशा पुरविण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे १० गुणांचे नुकसान झाले, अशी ओरड पालकांकडून करण्यात आली आहे.एलएडी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सई मकरंद कुळकर्णी हिला परीक्षेसाठी डॉ. आंबेडकर महाविद्यालय हे केंद्र मिळाले होते. पेपरमध्ये प्रश्न क्रमांक ६ सोडविताना नकाशाचा वापर करायचा होता. वर्गात जवळपास ४० विद्यार्थी पेपर सोडवित होते. विद्यार्थ्यांनी परीक्षकाला नकाशाची मागणी केली असता दोन ते तीन विद्यार्थ्यांना नकाशा पुरविण्यात आला. उर्वरीत विद्यार्थ्यांना ५ मिनिटात नकाशा पुरविण्यात येईल, असे सांगण्यात आले. काही वेळानंतर नकाशे संपले असे सांगून स्टेन्सिलचा वापर करून नकाशा काढा व प्रश्न सोडवा, असे सांगण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडविला त्या विद्यार्थ्यांचा नकाशा काढण्यातच वेळ गेला. सईच्या बाबतीतही असेच घडले. तिने घरी आल्यावर पालकांना ही बाब सांगितली. दुसऱ्या दिवशी पालक लेखी तक्रार घेऊन आंबेडकर महाविद्यालयातील परीक्षा प्रमुखांना भेटले. पण त्यांनी ही बाब मान्य केली नाही. पालकांनी नंतर एलएडी महाविद्यालयातील शिक्षकांशी संपर्क साधला. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य यांनी यासंदर्भात बोर्डाकडे तक्रार केली. भूगोल या विषयात विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने बोर्डाकडून कितपत कारवाई होईल, अशी भीती पालकांना आहे. मुलांचे १० गुणांचे नुकसान झाल्याने चिंता व्यक्त केली आहे.

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थी