शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
3
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
4
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
5
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
6
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
7
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
8
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
9
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
10
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
11
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
12
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
13
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
14
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
15
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
16
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
17
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
18
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
19
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
Daily Top 2Weekly Top 5

वेळेवर उपचार न झाल्यामुळे नागपुरात रेल्वे प्रवाशाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:46 IST

रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना नागपुरात घडली.

ठळक मुद्देहेल्पलाईनवर मिळाली नाही मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना नागपुरात घडली. शरद जायसवाल (३५) असे मृत प्रवाशाचे नाव आहे.जायसवाल हे काही दिवसांपुर्वी प्रयागराज येथे आपल्या घरी गेले होते. तेथून ते मंगळवारी गंगाकावेरी एक्स्प्रेसने नागपुरात येत होते. एसी थ्री टायरमध्ये बी-१ कोचमध्ये प्रवास करीत असताना जबलपूरजवळ त्यांची प्रकृती खराब झाली. त्यांनी हेल्पलाईनवर मदतीसाठी संपर्क साधला. याशिवाय गाडीतील टीटीई आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना सांगितले. परंतु कुणीच त्यांची दखल घेतली नाही. यामुळे इटारसीत त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाही. दरम्यान त्यांची तब्येत आणखी खराब झाल्याची माहिती नागपुरातील त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांना एका प्रवाशाने दिली. ही गाडी रात्री १० वाजता नागपुरात पोहोचली असता जायसवाल काहीच हालचाल करीत नव्हते. त्यांचे मित्र त्वरित त्यांना खासगी रुग्णालयात घेऊन गेले. येथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. जायसवाल यांच्यावर इटारसी रेल्वेस्थानकावर उपचार केले असते तर त्यांचा जीव वाचला असता. परंतु रेल्वे हेल्पलाईन आणि संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे नातेवाईक कमलकांत यांनी केला आहे. याबाबत तक्रार घेण्यासही रेल्वे प्रशासनाने टाळाटाळ केली.सूचना मिळाल्यानंतर केली होती तपासणी‘जायसवाल यांची तब्येत खराब झाल्याची सूचना मिळाल्यानंतर इतर गाड्यांना सेक्शनमध्ये थांबवून गंगाकावेरी एक्स्प्रेसला सिग्नलवर न थांबविता थेट नागपुरात आणण्यात आले. ही गाडी नागपूरला पोहोचल्यानंतर रेल्वे डॉक्टरांनी जायसवाल यांची तपासणी केली होती. नागपुर विभागात आजपर्यंत सर्व डॉक्टर पाहण्यात येतात. घडलेली घटना दुर्दैवी आहे.’-एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीDeathमृत्यू