शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वेळेवर उपचार न झाल्यामुळे नागपुरात रेल्वे प्रवाशाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:46 IST

रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना नागपुरात घडली.

ठळक मुद्देहेल्पलाईनवर मिळाली नाही मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेल्वेच्या बेजबाबदारपणामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना नागपुरात घडली. शरद जायसवाल (३५) असे मृत प्रवाशाचे नाव आहे.जायसवाल हे काही दिवसांपुर्वी प्रयागराज येथे आपल्या घरी गेले होते. तेथून ते मंगळवारी गंगाकावेरी एक्स्प्रेसने नागपुरात येत होते. एसी थ्री टायरमध्ये बी-१ कोचमध्ये प्रवास करीत असताना जबलपूरजवळ त्यांची प्रकृती खराब झाली. त्यांनी हेल्पलाईनवर मदतीसाठी संपर्क साधला. याशिवाय गाडीतील टीटीई आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना सांगितले. परंतु कुणीच त्यांची दखल घेतली नाही. यामुळे इटारसीत त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाही. दरम्यान त्यांची तब्येत आणखी खराब झाल्याची माहिती नागपुरातील त्यांचे मित्र आणि कुटुंबीयांना एका प्रवाशाने दिली. ही गाडी रात्री १० वाजता नागपुरात पोहोचली असता जायसवाल काहीच हालचाल करीत नव्हते. त्यांचे मित्र त्वरित त्यांना खासगी रुग्णालयात घेऊन गेले. येथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. जायसवाल यांच्यावर इटारसी रेल्वेस्थानकावर उपचार केले असते तर त्यांचा जीव वाचला असता. परंतु रेल्वे हेल्पलाईन आणि संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांचे नातेवाईक कमलकांत यांनी केला आहे. याबाबत तक्रार घेण्यासही रेल्वे प्रशासनाने टाळाटाळ केली.सूचना मिळाल्यानंतर केली होती तपासणी‘जायसवाल यांची तब्येत खराब झाल्याची सूचना मिळाल्यानंतर इतर गाड्यांना सेक्शनमध्ये थांबवून गंगाकावेरी एक्स्प्रेसला सिग्नलवर न थांबविता थेट नागपुरात आणण्यात आले. ही गाडी नागपूरला पोहोचल्यानंतर रेल्वे डॉक्टरांनी जायसवाल यांची तपासणी केली होती. नागपुर विभागात आजपर्यंत सर्व डॉक्टर पाहण्यात येतात. घडलेली घटना दुर्दैवी आहे.’-एस. जी. राव, सहायक वाणिज्य व्यवस्थापक, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीDeathमृत्यू