शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

मान्सून रुसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

By admin | Updated: June 24, 2014 00:49 IST

जून महिना संपत आला तरी सक्रिय होऊनही मान्सून न बरसल्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. १ ते २३ जून दरम्यान सरासरी १४७.३३ मि.मी. पाऊस पडायला हवा होता.

निम्मा पाऊसही नाही : पुढच्या काळात शक्यताही कमीनागपूर : जून महिना संपत आला तरी सक्रिय होऊनही मान्सून न बरसल्याने विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. १ ते २३ जून दरम्यान सरासरी १४७.३३ मि.मी. पाऊस पडायला हवा होता. प्रत्यक्षात ६४.११ मि.मी. पाऊस झाला. पावसाची ही तूट ५६.६१ टक्के आहे.यंदा मान्सून उशिरा येणार व पाऊसही कमी पडणार असा अंदाज हवामान खात्याने जून महिन्यापूर्वीच वर्तविला होता. मान्सून उशिरा दाखल झाला खरा पण तो दाखल झाल्यावरही बरसत नसल्याने चिंता निर्माण झाली आहे. एरवी ७ जूनला मान्सून विदर्भात दाखल होतो. गेल्या वर्षी तो वेळेत दाखल झाला होता. आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात अतिवृष्टी झाली होती. यंदा जून महिना संपत आला तरी विदर्भ कोरडाच आहे. खरीप हंगामासाठी शेत जमिनीची तयारी करून बसलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात यामुळे आता आसव येण्याची वेळ आली आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या मान्सून कुठेच सक्रिय नाही. देशाच्या ईशान्य भागात थोडा पाऊस पडत असला तरी इतर भागात मात्र स्थिती कोरडीच आहे. मध्य भारतात आणि पर्यायाने विदर्भात पाऊस येण्यासाठी बंगालच्या खाडीत अनुकूल परिस्थिती नाही आणि ती नजीकच्या काळात निर्माण होण्याचीही शक्यता नाही. त्यामुळे पुढचा काळ शेतकरी आणि सर्वसामान्यांच्यादृष्टीने कठीण राहणार आहे. नागपूर विभागात सर्वसाधारणपणे १ ते २३ जून या दरम्यान १४७.३३ मि.मी. पाऊस पडतो. यावेळी या काळात फक्त ६४.४१ मि.मी. म्हणजे सरासरीच्या ५६.६१ टक्के कमी पाऊस झाला आहे. नागपूर जिल्ह्यात १३९.७९ मि.मी. पैकी ६९.६४ (सरासरीच्या ५० टक्के), वर्धा जिल्ह्यात १३७.७३ मि.मी.च्या तुलनेत ६०.६६ मि.मी. (सरासरीच्या ४४ टक्के), भंडारा जिल्ह्यात १४८.४३ मि.मी.च्या तुलनेत ५४.२९ मि.मी.(सरासरीच्या ३७ टक्के), गोंदिया जिल्ह्यात १४८.४३ मि.मी.च्या तुलनेत ८९.६३ मि.मी.(सरासरीच्या ५६ टक्के), चंद्रपूर जिल्ह्यात १४३ मि.मी.च्या तुलनेत ४७.०१ मि.मी. (सरासरीच्या ३३ टक्के) आणि गडचिरोली जिल्ह्यात १५६ मि.मी.च्या तुलनेत ६३,४३ मि.मी. (सरासरीच्या ४१ टक्के) पाऊस झाला आहे.(प्रतिनिधी)