शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोमुळे नागपूरवासीयांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 21:49 IST

नोकरीवर जाण्यासाठी प्रवासाला लागणारा वेळ, गर्दी, प्रवासाचा खर्च, अपघाताचा धोका, महिलांची सुरक्षा आणि प्रदूषण, या साऱ्या  समस्या मेट्रोमुळे दूर होतील.

ठळक मुद्देमहाराष्ट्र  मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांचा विश्वास‘महा-मेट्रो : कल, आज और कल’ वर चर्चा

आॅनलाईन लोकमतनागपूर : नोकरीवर जाण्यासाठी प्रवासाला लागणारा वेळ, गर्दी, प्रवासाचा खर्च, अपघाताचा धोका, महिलांची सुरक्षा आणि प्रदूषण, या साऱ्या  समस्या मेट्रोमुळे दूर होतील. स्वस्त प्रवासभाडे, सर्व स्तराची कनेक्टीव्हिटी, मेट्रो स्टेशनपर्यंत पोहचण्यासाठी फीडर सुविधा आणि जागतिक स्तराच्या सुविधांमुळे गरीबच नाही तर श्रीमंतही मेट्रोचा पर्याय निवडतील. मेट्रोमुळे नागपूरकरांच्या ‘लाईफस्टाईल’मध्ये आमूलाग्र परिवर्तन होईल, असा विश्वास महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केला.उन्नती फाऊंडेशन आणि छात्र जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महा-मेट्रो : कल, आज और कल’ या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी खासदार अजय संचेती, आमदार गिरीश व्यास, माजी मंत्री अनिस अहमद, वेदचे माजी अध्यक्ष विलास काळे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. ब्रिजेश दीक्षित यांनी सुरुवातीला मेट्रोची वर्तमान प्रगती आणि भविष्यातील सुविधांची माहिती दिली. शहराच्या आतमध्ये मेट्रोचे काम करणे एक आव्हान ठरले आहे. नागरिकांना या कामामुळे त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे शक्य तेवढ्या वेगाने व लवकर काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी रात्रंदिवस काम केले जात असून, २७ महिन्यात ५० टक्के काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. निर्धारित पाच वर्षांत आम्ही काम पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी दिला.कनेक्टीव्हिटी हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग आहे. यासाठी नागपूरच्या चारही भागाला असलेले औद्योगिक क्षेत्र निवासी क्षेत्राला जोडण्यात आला आहे. शिवाय रेल्वेस्टेशन, सर्व बसस्थानके, शासकीय कार्यालये आणि शैक्षणिक संस्था मेट्रोशी जोडण्यात येत आहेत. या संपूर्ण डिझाईनसाठी भारतातील आयटी तज्ज्ञांची मदत घेतली आहे. हे डिझाईन पेपरवर मॅन्युअली करण्याऐवजी संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असल्याने प्रकल्प वेळेवर पूर्ण होईल आणि पैसाही वाचेल, असा विश्वास त्यांनी दिला. मात्र यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जा राखला जाईल. प्रकल्पाची सौर ऊर्जा प्रणाली यातील महत्त्वाचा भाग आहे. मेट्रोचे ६५ टक्के काम सौर ऊर्जेवर चालेल. त्यासाठी प्रत्येक स्टेशनची निर्मिती करतानाच सोलर पॅनल बसविले जाणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्युत खर्च वाचणार असून, त्याचा उपयोग इतर सोयीसुविधांसाठी होईल. प्रत्येक स्टेशनपासून ५०० मीटरचा परिसर मेट्रो स्वत:च विकसित करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Metroमेट्रो