शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

सोईंअभावी नागपूर विमा रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2018 11:09 PM

रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव, डॉक्टरांअभावी बंद पडत चाललेले वॉर्ड यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित झाल्याचे ताशेरे एस. पी. तिवारी यांनी ओढले. रुग्णालय चालविण्यास राज्य शासन सक्षम नसेल तर तसे सांगावे, राज्य कामगार विमा योजना व कुटुंब कल्याण (ईएसआयसी) हे रुग्णालय चालवायला घेईल, असेही ते म्हणाले.

ठळक मुद्देएस. पी. तिवारी यांनी केली पाहणी : रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, यंत्रांच्या अभावाकडे वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिक्त पदे, औषधांचा तुटवडा, यंत्रसामुग्रीचा अभाव, डॉक्टरांअभावी बंद पडत चाललेले वॉर्ड यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देणाऱ्या राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील रुग्णसेवा प्रभावित झाल्याचे ताशेरे एस. पी. तिवारी यांनी ओढले. रुग्णालय चालविण्यास राज्य शासन सक्षम नसेल तर तसे सांगावे, राज्य कामगार विमा योजना व कुटुंब कल्याण (ईएसआयसी) हे रुग्णालय चालवायला घेईल, असेही ते म्हणाले.‘ईएसआयसी’ महामंडळाचे सदस्य तिवारी यांनी शुक्रवारी सोमवारपेठेतील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी रुग्णालयाची अधोगती पाहून आश्चर्य व्यक्त केले. ‘लोकमत’शी बोलताना तिवारी म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांपासून रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यातच आली नाहीत. साधारण ३५ ते ४० टक्के पदे रिक्त आहेत. रुग्णालयात डॉक्टरांची संख्या फारच कमी आहे. औषधांचा तुटवडा आहे. यंत्रसामुग्रीचा अभाव आहे. राज्य शासनाचे सहकार्य नसल्यामुळेच या समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांमुळेच रुग्ण दाखल केले जात नाही. रुग्णांना खासगी इस्पितळांमध्ये पाठविले जाते. रुग्णालयात खाटांची संख्या १३० आहे परंतु ४० वर रुग्ण भरती नाहीत. कामगार रुग्णांच्या वेतनातून पैसे कापूनही त्यांना योग्य पद्धतीची आरोग्य सेवा मिळत नसेल तर त्यांचे संतापणे समजू शकतो. यावर वैद्यकीय अधीक्षकांचे येथील रुग्ण ‘अ‍ॅग्रेसिव्ह’ आहेत असे म्हणणे चुकीचे आहे.तिवारी म्हणाले, रुग्णालयाच्या समस्यांसाठी पुढील महिन्यात, जानेवारीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांच्याशी भेट घेणार आहे. रुग्णालयातील ज्या समस्या आहेत त्याचे निराकरण करण्यासाठी आम्ही काय करावे ते सांगावे, असा प्रस्तावही त्यांना देऊ. राज्य शासन रुग्णालय चालविण्यास सक्षम नसेल तर त्यांनी ‘ईएसआयसी’कडे रुग्णालयाचा कारभार सोपवावा, असेही ते म्हणाले. या भेटी दरम्यान संजय कटकमवार, अजय यादव, अमर मुखी यांच्यासह रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मोना देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी भावना चौधरी व वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते.बुटीबोरी रुग्णालयाचे काम प्रगतिपथावरबुटीबोरी येथे प्रस्तावित असलेल्या २०० खाटांचे कामगार रुग्णालयाचे काम प्रगतिपथावर आहे. बांधकामाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. गडचिरोली, भंडारा, यवतमाळ, वाशीम येथील कामगार रुग्णांनाही वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. रुग्णालयातील समस्यांच्या निराकरणासाठी रुग्णालयाला भेटी देत राहील, असेही तिवारी म्हणाले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलEmployeeकर्मचारी