शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

होमिओपॅथीमुळे दुर्धर आजार होत आहेत बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 21:38 IST

होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करते. त्याच्या वर्तणूक, वागणूक व व्यक्तिमत्त्वामधील सूक्ष्म बदल अनुभवून योग्य औषधांची निवड करते. यामुळे ही पॅथी आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे करते. हृदयविकाराचा झटका आलेल्या, ‘बायपास’ सांगितलेल्या, आठ वर्षांपासून वंध्यत्व असलेल्या, मानसिक आजार असलेल्या, अस्थमा असलेल्या रुग्णांसोबतच गंभीर त्वचारोग या सारख्या असंख्य रुग्णांना होमिओपॅथीद्वारे बरे करण्यात आले आहे, असा सूर होमिओपॅथी तज्ज्ञांनी काढला.

ठळक मुद्देहोमिओपॅथी तज्ज्ञांचा सूर : हृदयविकार, वंध्यत्व, त्वचारोग, अस्थमा, मानसिक आजारावर यशस्वी उपचारजागतिक होमिओपॅथी दिन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करते. त्याच्या वर्तणूक, वागणूक व व्यक्तिमत्त्वामधील सूक्ष्म बदल अनुभवून योग्य औषधांची निवड करते. यामुळे ही पॅथी आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे करते. हृदयविकाराचा झटका आलेल्या, ‘बायपास’ सांगितलेल्या, आठ वर्षांपासून वंध्यत्व असलेल्या, मानसिक आजार असलेल्या, अस्थमा असलेल्या रुग्णांसोबतच गंभीर त्वचारोग या सारख्या असंख्य रुग्णांना होमिओपॅथीद्वारे बरे करण्यात आले आहे, असा सूर होमिओपॅथी तज्ज्ञांनी काढला.१० एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर शहरातील होमिओपॅथी तज्ज्ञांनी एकत्र येऊन सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आॅरेंज सिटी होमिओपॅथी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनीष पाटील, डॉ. सोनल पंचभाई, डॉ. स्वप्निल घायवट, डॉ. कुणाल अंबाडे, डॉ. सचिन धमगाये, डॉ. स्मिता अडकिने, डॉ. यशस्वी सातपुते, डॉ. रूपाली कारवा व डॉ. खुशबू मुरारका आदी उपस्थित होते.डॉ. पाटील म्हणाले, होमिओपॅथीमध्ये आजाराचे मूळ शोधून त्यावर उपचार केला जातो. यामुळे आजार समूळ नष्ट होण्यास मदत होते. दुर्दैवाने लोक होमिओपॅथीकडे तेव्हाच जातात जेव्हा गंभीर समस्या आणखी जुनी झालेली असते. साहजिकच अशा प्रकरणांमध्ये उपचार करण्याला कालावधी जास्त लागतो आणि लोक होमिओपॅथी तेव्हा स्वीकारतात जेव्हा बाकी उपचार पद्धती अयशस्वी होते. असे असले तरी अनेक दुर्धर आजाराचे रुग्ण होमिओपॅथीने बरे झाले आहेत.‘बायपास’वर होमिओपॅथीयावेळी होमिओपॅथीमुळे बरे झालेल्या रुग्णांनी आपले अनुभव सांगितले, ५१ वर्षीय संजय गडपायले म्हणाले, अ‍ॅन्जिओग्राफीमध्ये ९९ टक्के ब्लॉकेज आढळून आले. यामुळे डॉक्टरांनी ‘बायपास’ करण्याचा सल्ला दिला. परंतु शस्त्रक्रिया करायची नव्हती म्हणून होमिओपॅथीचे उपचार घेतले आणि थोड्याच दिवसात बरे वाटू लागले. त्यानंतर केलेल्या रक्ताच्या तपासण्या सर्वसामान्य आल्या. ४००वर पोहचलेले कोलेस्ट्रॉलही सामान्य झाले, असेही त्यांनी सांगितले. सविता पाटील म्हणाल्या, अचानक हृदयविकाराचा झटका येऊन बेशुद्ध पडले. ईसीजी काढल्यावर त्यात हृदयविकाराचा झटका आल्याचे आढळून आले. होमिओपॅथी तज्ज्ञाने उपचार केला व काही तासात बरे वाटू लागले. तरीही डॉक्टरांनी देखभालीसाठी रात्रभर हॉस्पिटलमध्ये भरती ठेवून दुसऱ्या दिवशी सुटी दिली. ईसीजीपासून इतर सर्व तपासण्या सामान्य आहेत, असेही त्या म्हणाल्या.

वंध्यत्वावर होमिओपॅथी प्रभावशाली

मोना जोशी या महिलेने सांगितले, लग्नानंतर मूल न झाल्याने वंध्यत्वावर नागपुरातील स्त्री व प्रसूती रोगतज्ज्ञाकडून उपचार घेतले, शेवटी मुंबईतही उपचार घेतले. सलग आठ वर्षे उपचार घेऊनही वंध्यत्वाची समस्या कायम होती. शेवटचा पर्याय म्हणून होमिओपॅथीचे उपचार घेतले आणि महिन्याभरातच गर्भ राहिला. आज मुलगी पाच वर्षांची आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी अन्य रुग्णांनीही आपले अनुभव कथन केले. गंभीर रोगावर होमिओपॅथीशिवाय पर्याय नाही असे त्यांचे म्हणणे होते.

१९७८ पासून मनपा होमिओपॅथीचे दोनच क्लिनिकडॉ. मनीष पाटील म्हणाले, होमिओपॅथी मुळासकट आजार बरा करीत असली तरी महानगरपालिकेकडून ही पॅथी दुर्लक्षित झाली आहे. मनपाने १९७८ मध्ये दोन होमिओपॅथी क्लिनिक सुरू केले, परंतु आजही त्यांची संख्या दोनच आहे. त्या तुलनेत अ‍ॅलोपॅथी क्लिनिकची संख्या वाढली आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य