शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

होमिओपॅथीमुळे दुर्धर आजार होत आहेत बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 21:38 IST

होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करते. त्याच्या वर्तणूक, वागणूक व व्यक्तिमत्त्वामधील सूक्ष्म बदल अनुभवून योग्य औषधांची निवड करते. यामुळे ही पॅथी आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे करते. हृदयविकाराचा झटका आलेल्या, ‘बायपास’ सांगितलेल्या, आठ वर्षांपासून वंध्यत्व असलेल्या, मानसिक आजार असलेल्या, अस्थमा असलेल्या रुग्णांसोबतच गंभीर त्वचारोग या सारख्या असंख्य रुग्णांना होमिओपॅथीद्वारे बरे करण्यात आले आहे, असा सूर होमिओपॅथी तज्ज्ञांनी काढला.

ठळक मुद्देहोमिओपॅथी तज्ज्ञांचा सूर : हृदयविकार, वंध्यत्व, त्वचारोग, अस्थमा, मानसिक आजारावर यशस्वी उपचारजागतिक होमिओपॅथी दिन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : होमिओपॅथी उपचारपद्धती मनोरचना व मनोकार्याशी जवळीक साधते. रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करते. त्याच्या वर्तणूक, वागणूक व व्यक्तिमत्त्वामधील सूक्ष्म बदल अनुभवून योग्य औषधांची निवड करते. यामुळे ही पॅथी आजाराला बरे करीत नाही तर आजारी रुग्णाला बरे करते. हृदयविकाराचा झटका आलेल्या, ‘बायपास’ सांगितलेल्या, आठ वर्षांपासून वंध्यत्व असलेल्या, मानसिक आजार असलेल्या, अस्थमा असलेल्या रुग्णांसोबतच गंभीर त्वचारोग या सारख्या असंख्य रुग्णांना होमिओपॅथीद्वारे बरे करण्यात आले आहे, असा सूर होमिओपॅथी तज्ज्ञांनी काढला.१० एप्रिल हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर शहरातील होमिओपॅथी तज्ज्ञांनी एकत्र येऊन सोमवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आॅरेंज सिटी होमिओपॅथी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मनीष पाटील, डॉ. सोनल पंचभाई, डॉ. स्वप्निल घायवट, डॉ. कुणाल अंबाडे, डॉ. सचिन धमगाये, डॉ. स्मिता अडकिने, डॉ. यशस्वी सातपुते, डॉ. रूपाली कारवा व डॉ. खुशबू मुरारका आदी उपस्थित होते.डॉ. पाटील म्हणाले, होमिओपॅथीमध्ये आजाराचे मूळ शोधून त्यावर उपचार केला जातो. यामुळे आजार समूळ नष्ट होण्यास मदत होते. दुर्दैवाने लोक होमिओपॅथीकडे तेव्हाच जातात जेव्हा गंभीर समस्या आणखी जुनी झालेली असते. साहजिकच अशा प्रकरणांमध्ये उपचार करण्याला कालावधी जास्त लागतो आणि लोक होमिओपॅथी तेव्हा स्वीकारतात जेव्हा बाकी उपचार पद्धती अयशस्वी होते. असे असले तरी अनेक दुर्धर आजाराचे रुग्ण होमिओपॅथीने बरे झाले आहेत.‘बायपास’वर होमिओपॅथीयावेळी होमिओपॅथीमुळे बरे झालेल्या रुग्णांनी आपले अनुभव सांगितले, ५१ वर्षीय संजय गडपायले म्हणाले, अ‍ॅन्जिओग्राफीमध्ये ९९ टक्के ब्लॉकेज आढळून आले. यामुळे डॉक्टरांनी ‘बायपास’ करण्याचा सल्ला दिला. परंतु शस्त्रक्रिया करायची नव्हती म्हणून होमिओपॅथीचे उपचार घेतले आणि थोड्याच दिवसात बरे वाटू लागले. त्यानंतर केलेल्या रक्ताच्या तपासण्या सर्वसामान्य आल्या. ४००वर पोहचलेले कोलेस्ट्रॉलही सामान्य झाले, असेही त्यांनी सांगितले. सविता पाटील म्हणाल्या, अचानक हृदयविकाराचा झटका येऊन बेशुद्ध पडले. ईसीजी काढल्यावर त्यात हृदयविकाराचा झटका आल्याचे आढळून आले. होमिओपॅथी तज्ज्ञाने उपचार केला व काही तासात बरे वाटू लागले. तरीही डॉक्टरांनी देखभालीसाठी रात्रभर हॉस्पिटलमध्ये भरती ठेवून दुसऱ्या दिवशी सुटी दिली. ईसीजीपासून इतर सर्व तपासण्या सामान्य आहेत, असेही त्या म्हणाल्या.

वंध्यत्वावर होमिओपॅथी प्रभावशाली

मोना जोशी या महिलेने सांगितले, लग्नानंतर मूल न झाल्याने वंध्यत्वावर नागपुरातील स्त्री व प्रसूती रोगतज्ज्ञाकडून उपचार घेतले, शेवटी मुंबईतही उपचार घेतले. सलग आठ वर्षे उपचार घेऊनही वंध्यत्वाची समस्या कायम होती. शेवटचा पर्याय म्हणून होमिओपॅथीचे उपचार घेतले आणि महिन्याभरातच गर्भ राहिला. आज मुलगी पाच वर्षांची आहे, असेही त्या म्हणाल्या. यावेळी अन्य रुग्णांनीही आपले अनुभव कथन केले. गंभीर रोगावर होमिओपॅथीशिवाय पर्याय नाही असे त्यांचे म्हणणे होते.

१९७८ पासून मनपा होमिओपॅथीचे दोनच क्लिनिकडॉ. मनीष पाटील म्हणाले, होमिओपॅथी मुळासकट आजार बरा करीत असली तरी महानगरपालिकेकडून ही पॅथी दुर्लक्षित झाली आहे. मनपाने १९७८ मध्ये दोन होमिओपॅथी क्लिनिक सुरू केले, परंतु आजही त्यांची संख्या दोनच आहे. त्या तुलनेत अ‍ॅलोपॅथी क्लिनिकची संख्या वाढली आहे. 

टॅग्स :doctorडॉक्टरHealthआरोग्य