शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

धुक्यामुळे नागपूरच्या आकाशामध्ये विमानाच्या पाऊण तास घिरट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:17 IST

सोमवारी सकाळी १० च्या सुमारास धुक्यामुळे मुंबई-नागपूर इंडिगो विमानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करता आले नाही. हे विमान सुमारे पाऊण तास आकाशात घिरट्या घालत राहिले. त्यानंतरही लँडिंगची परवानगी मिळाली नाही. परिणामी, हे विमान रायपूरला रवाना करण्यात आले.

ठळक मुद्देमुंबई-नागपूर विमान : संतप्त प्रवाशांनी घातला गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी सकाळी १० च्या सुमारास धुक्यामुळे मुंबई-नागपूरइंडिगो विमानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करता आले नाही. हे विमान सुमारे पाऊण तास आकाशात घिरट्या घालत राहिले. त्यानंतरही लँडिंगची परवानगी मिळाली नाही. परिणामी, हे विमान रायपूरला रवाना करण्यात आले.रायपूरकडे रवाना होण्यापूर्वी संबंधित एयर ट्राफिक कंट्रोलला लँडिंगची अनुमती मागण्यात आली. आकाशात पाऊण तास घिरट्या घातल्यामुळे विमानातील इंधन संपत आले होते. विमानात रायपूरमध्ये इंधन भरण्यात आले. त्यामुळे उड्डाणाला तीन तास विलंब झाला. परिणामी, प्रवाशांनी गोंधळ घातला. त्यांना समजावण्यासाठी इंडिगो कर्मचाऱ्यांना बरीच कसरत करावी लागली. काही प्रवाशांना नागपूरमधून मुंबईला जायचे होते. धुक्यामुळे नागपूर-बेंगळुरू विमान १ तास ३८ मिनिटे विलंबाने उडाले. नागपूर-हैदराबाद विमानाला ३३ मिनिटे तर, नागपूर-बेंगळुरू या दुसºया विमानाला ३० मिनिटे विलंब झाला. सायंकाळचे नागपूर-दिल्ली विमान २ तास ३५ मिनिटे थांबवावे लागले. हे विमान सायंकाळी ७.५० ऐवजी रात्री १०.२५ वाजता रवाना झाले.आगमनही विलंबानेइंडिगो एयरलाईन्सच्या काही विमानांचे आगमनही विलंबाने झाले. ६ई ७१३६ हैदराबाद-नागपूर विमान ४५ मिनिटे विलंबाने, म्हणजे सकाळी ७.५५ वाजता आले. ६ई ७१०२ हैदराबाद-नागपूर विमान ३० मिनिटे विलंबाने आले. ६ई ४२७ बँगळुरू-नागपूर विमानाला येथे येण्यास २२ मिनिटे विलंब झाला.६ई २०२ ला इंफालमधूनच विलंबसोमवारी सकाळी ७.२० वाजता नागपूर येथे येणारे ६ई २०२ पुणे-नागपूर विमान १.४५ मिनिटे विलंबाने आले. सूत्रांच्या माहितीनुसार, या विमानाला इंफाल येथूनच विलंब झाला. इंफालमधील वातावरण खराब असल्यामुळे विमानाला विलंब झाला.वातावरणावर नियंत्रण नाहीकाही दिवसांपासून इंडिगो एअरलाईन्सच्या विमानांना विलंब होत आहे. प्रवासी कुठेही वेळेवर पोहोचण्यासाठी विमानातून प्रवास करतात. हा उद्देश पूर्ण न झाल्यास प्रवाशांची निराशा होते. परंतु, वातावरणावर कुणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे वातावरण बिघडताच विमानसेवा प्रभावित झाली.

टॅग्स :Indigoइंडिगोnagpurनागपूर