शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

धुक्यामुळे नागपूरच्या आकाशामध्ये विमानाच्या पाऊण तास घिरट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:17 IST

सोमवारी सकाळी १० च्या सुमारास धुक्यामुळे मुंबई-नागपूर इंडिगो विमानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करता आले नाही. हे विमान सुमारे पाऊण तास आकाशात घिरट्या घालत राहिले. त्यानंतरही लँडिंगची परवानगी मिळाली नाही. परिणामी, हे विमान रायपूरला रवाना करण्यात आले.

ठळक मुद्देमुंबई-नागपूर विमान : संतप्त प्रवाशांनी घातला गोंधळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी सकाळी १० च्या सुमारास धुक्यामुळे मुंबई-नागपूरइंडिगो विमानाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करता आले नाही. हे विमान सुमारे पाऊण तास आकाशात घिरट्या घालत राहिले. त्यानंतरही लँडिंगची परवानगी मिळाली नाही. परिणामी, हे विमान रायपूरला रवाना करण्यात आले.रायपूरकडे रवाना होण्यापूर्वी संबंधित एयर ट्राफिक कंट्रोलला लँडिंगची अनुमती मागण्यात आली. आकाशात पाऊण तास घिरट्या घातल्यामुळे विमानातील इंधन संपत आले होते. विमानात रायपूरमध्ये इंधन भरण्यात आले. त्यामुळे उड्डाणाला तीन तास विलंब झाला. परिणामी, प्रवाशांनी गोंधळ घातला. त्यांना समजावण्यासाठी इंडिगो कर्मचाऱ्यांना बरीच कसरत करावी लागली. काही प्रवाशांना नागपूरमधून मुंबईला जायचे होते. धुक्यामुळे नागपूर-बेंगळुरू विमान १ तास ३८ मिनिटे विलंबाने उडाले. नागपूर-हैदराबाद विमानाला ३३ मिनिटे तर, नागपूर-बेंगळुरू या दुसºया विमानाला ३० मिनिटे विलंब झाला. सायंकाळचे नागपूर-दिल्ली विमान २ तास ३५ मिनिटे थांबवावे लागले. हे विमान सायंकाळी ७.५० ऐवजी रात्री १०.२५ वाजता रवाना झाले.आगमनही विलंबानेइंडिगो एयरलाईन्सच्या काही विमानांचे आगमनही विलंबाने झाले. ६ई ७१३६ हैदराबाद-नागपूर विमान ४५ मिनिटे विलंबाने, म्हणजे सकाळी ७.५५ वाजता आले. ६ई ७१०२ हैदराबाद-नागपूर विमान ३० मिनिटे विलंबाने आले. ६ई ४२७ बँगळुरू-नागपूर विमानाला येथे येण्यास २२ मिनिटे विलंब झाला.६ई २०२ ला इंफालमधूनच विलंबसोमवारी सकाळी ७.२० वाजता नागपूर येथे येणारे ६ई २०२ पुणे-नागपूर विमान १.४५ मिनिटे विलंबाने आले. सूत्रांच्या माहितीनुसार, या विमानाला इंफाल येथूनच विलंब झाला. इंफालमधील वातावरण खराब असल्यामुळे विमानाला विलंब झाला.वातावरणावर नियंत्रण नाहीकाही दिवसांपासून इंडिगो एअरलाईन्सच्या विमानांना विलंब होत आहे. प्रवासी कुठेही वेळेवर पोहोचण्यासाठी विमानातून प्रवास करतात. हा उद्देश पूर्ण न झाल्यास प्रवाशांची निराशा होते. परंतु, वातावरणावर कुणाचेच नियंत्रण नाही. त्यामुळे वातावरण बिघडताच विमानसेवा प्रभावित झाली.

टॅग्स :Indigoइंडिगोnagpurनागपूर