शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

उत्सवावर डेंग्यू, स्वाईन फ्लूचे सावट

By admin | Updated: September 18, 2015 02:49 IST

गणेशोत्सवाला सुरुवात झाली असताना, शहरात स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचे रुग्ण दिसून येऊ लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आतापर्यंत २७ रुग्ण आढळलेनागपूर : गणेशोत्सवाला सुरुवात झाली असताना, शहरात स्वाईन फ्लू आणि डेंग्यूचे रुग्ण दिसून येऊ लागल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आॅगस्ट महिन्यात महापालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाला ३ हजार ६४९ घरांमध्ये डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. जानेवारी ते आतापर्यंत २७ रुग्ण आढळून आले आहेत, तर स्वाईन फ्लूची लागण झालेले ३३१ रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची धांदल उडाली आहे.शहरात १३०० सार्वजनिक मंडळांनी ठिकठिकाणी गणपतीची स्थापना केली आहे. या उत्सवानिमित्त भाविक एकत्र येत आहेत, काही ठिकाणी मोठी गर्दी उसळत आहे. यामुळे स्वाईन फ्लू पसरण्याची शक्यता अधिक आहे. याशिवाय आज झालेल्या पावसामुळे तसेच वातावरणातील बदलामुळे डेंग्यूही पसरण्याची भीती वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी ऐन गणेशोत्सवाच्या कालावधीतच या दोन्ही आजारांच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. असे असतानाही, या वर्षी महापालिका प्रशासनाने काय उपाययोजना केल्या याची माहिती अद्यापही सामोर आलेली नाही. धक्कादायक म्हणजे, कोणी अधिकारी या विषयी बोलायला तयार नाही. (प्रतिनिधी)गर्दीत जाणे टाळागर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. हस्तांदोलन टाळा. शक्य तोपर्यंत तोंडावर मास्क किंवा रु माल बांधावा. प्रत्येक दोन तासांनी साबणाने हात स्वच्छ धुवावेत. गर्भवती महिला, लहान मुले, मधुमेह व रक्तदाब असलेल्यांनी अधिक काळजी घ्यावी.डेंग्यूचे २७ रुग्ण पॉझिटिव्हडेंग्यूच्या रोगाने गेल्या वर्षी नागपुरात तब्बल ६०१ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. सप्टेंबर व आॅक्टोबर २०१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे ३८५ रुग्णांची नोंद झाली होती. तर या वर्षी जानेवारीमध्ये दोन, एप्रिलमध्ये एक, मेमध्ये दोन, जूनमध्ये एक, जुलैमध्ये नऊ तर आॅगस्ट महिन्यात १२ रुग्ण, असे एकूण आतापर्यंत २७ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही रुग्ण संख्या फार कमी आहे. परंतु गेल्या वर्षीच्या सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद आहे. यामुळे महापालिका प्रशासनासोबतच नागरिकांनीही खबरदारी घेणे आवश्यक झाले आहे. सहा महिन्यात स्वाईन फ्लूमुळे १२८ जणांचा मृत्यूनागपूर विभागात २०१० मध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांत अचानक वाढ होऊन मृत्यूची संख्या ५४ वर गेली होती. २०११ मध्ये मृत्यूची नोंदच झालेली नाही. परंतु नंतर ही संख्या वाढत गेली. २०१२ मध्ये ९, २०१३ मध्ये २८, २०१४मध्ये १० तर आॅगस्ट २०१५ पर्यंत मृत्यूची संख्या १२८ वर पोहचली. सप्टेंबर महिन्यात शहरात चार रुग्ण पॉझिटीव्ह आले असून एकाचा मृत्यू झाला आहे.