शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

खोदकामामुळे नागपुरात ६.८७ कोटींची वीज केबल खराब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 11:16 IST

शहरामध्ये ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मेट्रो रेल्वे प्रत्यक्षात येत आहे. सिमेंट रोड व उड्डाण पूल तयार होत आहेत. याचा सर्वांना आनंद आहे. परंतु, या कामामुळे वीज वितरण प्रणालीचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे१७८ ठिकाणी नुकसान विकास एजन्सीजनी दिली नाही भरपाई

कमल शर्मा।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरामध्ये ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. मेट्रो रेल्वे प्रत्यक्षात येत आहे. सिमेंट रोड व उड्डाण पूल तयार होत आहेत. याचा सर्वांना आनंद आहे. परंतु, या कामामुळे वीज वितरण प्रणालीचे मोठे नुकसान झाले आहे. मार्च-२०१७ पासून आतापर्यंत १७८ ठिकाणांवरील एकूण ६.८७ कोटी रुपयांचे वीज केबल खराब झाले आहेत. वीज वितरण फ्रेन्चायसीने भरपाईची मागणी केली असून विकास एजन्सीज त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.केबल खराब करण्याची सुरुवात १ एप्रिल रोजी भगवाननगरातून झाली. एल अ‍ॅन्ड टी कंपनीने स्मार्ट सिटी वर्क योजनेंतर्गत केलेल्या खोदकामात ३.६० लाख रुपयांचे वीज केबल पूर्णपणे खराब झाले. ३७६० ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झाला. त्यानंतर हे प्रकार सतत सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, महामेट्रो, ओसीडब्ल्यू, रिलायन्स आदींनी खोदकाम करताना विजेचे केबल खराब केले. २०१७ मध्ये ९७ ठिकाणी वीज केबलचे नुकसान झाले.२०१८ मध्येही परिस्थितीत सुधारणा झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने ५ जानेवारी रोजी नारा येथे खोदकाम करताना वीज केबल खराब केले. त्यामुळे २८ हजार ९९८ ग्राहकांचा वीज पुरवठा बंद झाला व ४ लाख ७३ हजार २५० रुपयांचे नुकसान झाले. १७ आॅगस्ट रोजी मेट्रो रेल्वेच्या कामादरम्यान लष्करीबाग येथे ३ लाख ६० हजार रुपयांचे केबल खराब करण्यात आले. त्यामुळे १० हजार ६२४ ग्राहकांची वीज बंद पडली. एसएनडीएलने या सर्व प्रकरणांची माहिती महावितरणला दिली आहे. विकास एजन्सीजना नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. परंतु, त्यावर कुणीच उत्तर दिलेले नाही. सध्या केबलची तात्पुरती दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. परिणामी, कोणत्याही क्षणी वीज पुरवठा बंद होऊ शकतो. तसेच, विजेचा प्रवाह पसरून प्राणहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खोदकाम करताना नकाशा पाहिला जात नाहीकुठेही खोदकाम करताना पाईप लाईन व विजेचे केबल कुठे आहे याची माहिती घेण्यासाठी नकाशे पाहणे आवश्यक आहे. काही ठिकाणी जुनी पाईप लाईन असल्यामुळे त्याचे नकाशे उपलब्ध नाहीत. परंतु, पाईप लाईन कुठून जात आहे याची माहिती उपलब्ध आहे. दोन्ही एजन्सीजनी आपसात समन्वय ठेवल्यास नुकसान टाळले जाऊ शकते. नियमानुसार मनपा व महावितरण कंपनीला खोदकामाची माहिती देणे अनिवार्य आहे. परंतु, विकास एजन्सीज हा नियम पाळत नाही. त्यामुळे नुकसान तर होतेच, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यताही बळावते.

खोदकामामुळे वीज केबल खराब होत असल्याची माहिती विकास एजन्सीजसह पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांना देण्यात आली आहे. कंपनीला भरपाईपेक्षा वीज केबलची जास्त चिंता आहे. खराब झालेले केबल दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. भविष्यात ब्रेकडाऊन होऊ शकतो. त्यावेळी खोदकाम करून नवीन केबल टाकावे लागतील.- सोनल खुराणा, बिझनेस हेड, एसएनडीएल.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा