शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादीचे देशव्यापी पुनरावलोकन का गरजेचे? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
3
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
5
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
6
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
7
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
8
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
9
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
10
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
11
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
12
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
13
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
14
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
15
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
16
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
17
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
18
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
19
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
20
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर

निवडणुकांमुळे भाजप-संघाला ‘राम’आठवला : मल्लिकार्जुन खर्गे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 21:05 IST

राममंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याने त्यावर बोलणे योग्य होणार नाही. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य करावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार चालवित आहेत. गेल्या साडेचार वर्षांच्या सत्ताकाळात त्यांना राममंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटला नाही. आता तीन महिन्यावर निवडणुका आल्याने मताचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपा व संघाला ‘राम’ आठवल्याची घणाघाती टीका लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी केली.

ठळक मुद्दे मसीही अधिकार संमेलनात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याची भावना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राममंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याने त्यावर बोलणे योग्य होणार नाही. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य करावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार चालवित आहेत. गेल्या साडेचार वर्षांच्या सत्ताकाळात त्यांना राममंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटला नाही. आता तीन महिन्यावर निवडणुका आल्याने मताचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपा व संघाला ‘राम’ आठवल्याची घणाघाती टीका लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी केली.ख्र्रिश्चन को-आॅर्डिनेशन कमिटी नागपूरतर्फे मेकोसाबाग येथील मैदानावर आयोजित मसीही अधिकार संमेलनात खर्गे बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, काँग्रेसचे सचिव आशिष दुवा, अखिल भारतीय अल्पसंख्य आघाडीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अली थॉमस, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री अनिस अहमद, आ. अशिष देशमुख, बबनराव तायवाडे, नितीन सरदार आदी उपस्थित होते.देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. महात्मा गांधी यांना हा देश सर्वधर्मियांचा असल्याचे म्हटले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय दिला. देशाचा कारभार संविधानाच्या माध्यमातून चालावा. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांचीच आहे. संरक्षण करताना कुणाला काहीच मिळाले नाही तरी बलिदानाची तयारी ठेवा. ख्रिश्चन मिशनरीने देशाच्या सर्व भागात शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी शिक्षणाचा अधिकार दिला.परंतु आज केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आरोग्य व शिक्षणासाठी तरतूद नाही. पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना न मिळता मोठ्या कंपन्यांनाचा होत आहे. भाजपाचा सबका साथ सबका विकासाचा नारा असला तरी मूठभर कार्पोरेट कंपन्याच्या भल्यासाठी केंद्र सरकार धोरणे राबवित असल्याचा आरोप खर्गे यांनी केला.केंद्र सरकारचा सर्वच क्षेत्रात हस्तक्षेप सुरू आहे. कुणी विरोध केला तर सीबीआय, आयकर व ईडीची चौकशी लावली जाते. यामुळे देशात भीतीचे वातावरण आहे. हिंदू धर्मात असे कुठेही म्हटलेले नाही की दुसऱ्या धर्मावर अन्याय करा. पण आज देशात धर्माच्या नावावर अत्याचार सुरू आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी देशभरात फिरून याचा मुकाबला करीत आहेत. देशाचे संविधान सुरक्षित असेल तर देश सुरक्षित राहील. यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे खर्गे म्हणाले.अनिल थॉमस यांनी प्रास्ताविकातून मसीही समाज आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने अन्य समाजाप्रमाणे सुविधा मिळण्याची मागणी केली. नितीन सरदार यांनी संमेलनाची माहिती दिली. यावेळी धर्मगुरु पॉल दुपारे, अनंतराव घारड, माजी आमदार सेवक वाघाये, डॉ. अमोल देशमुख, अ‍ॅड. अभिजित वंजारी, सतीश मेहंदे, उमाकांत अग्निहोत्री, प्रा. विजय बारसे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला राज्यभरातून ख्रिश्चन बांधव आले होते. 

२०१९ देशात व राज्यात काँग्रेसचीच सत्ता -अशोक चव्हाणदेशातील परिस्थिती विचारात घेता अल्पसंख्यक समुदायात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संविधानाच्या रक्षणासाठी या विरोधात संघटित होऊन मुकाबला करावा लागेल. काँग्रेस तुमच्या पाठिशी आहे. २०१९ च्या निवडणुकीत देशात व राज्यात काँग्रेसचीच सत्ता येईल, असा ठाम विश्वास प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.भगवान येशू ख्रिस्तांनी बंधूभावाचा संदेश दिला. ख्रिश्चन समाज या देशाचा अविभाज्य घटक आहे. सामाजिक सलोखा व देशाच्या विकासात या समाजाचाही वाटा आहे. मदर तेरेसा यांचे नाव जगाला माहीत आहे. त्यांनी धर्मनिरपेक्षा भावनेतून समाजाची सेवा केली. नागपुरात काँग्रेसचे दिवंगत नेते एन.पी.के.साळवे यांचे शिक्षण क्षेत्रात योगदान आहे.स्वातंत्र्य लढ्यातही या समाजाचे योगदान आहे. असे असूनही भाजपाचे नेते गोपाल शेट्टी म्हणतात ख्रिश्चन समाजाचे योगदान नाही. हे त्यांचे अज्ञान असल्याचे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण