शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकांमुळे भाजप-संघाला ‘राम’आठवला : मल्लिकार्जुन खर्गे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 21:05 IST

राममंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याने त्यावर बोलणे योग्य होणार नाही. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य करावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार चालवित आहेत. गेल्या साडेचार वर्षांच्या सत्ताकाळात त्यांना राममंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटला नाही. आता तीन महिन्यावर निवडणुका आल्याने मताचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपा व संघाला ‘राम’ आठवल्याची घणाघाती टीका लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी केली.

ठळक मुद्दे मसीही अधिकार संमेलनात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याची भावना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राममंदिराचा मुद्दा न्यायालयात असल्याने त्यावर बोलणे योग्य होणार नाही. न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य करावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा कारभार चालवित आहेत. गेल्या साडेचार वर्षांच्या सत्ताकाळात त्यांना राममंदिराचा मुद्दा महत्त्वाचा वाटला नाही. आता तीन महिन्यावर निवडणुका आल्याने मताचे ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपा व संघाला ‘राम’ आठवल्याची घणाघाती टीका लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी केली.ख्र्रिश्चन को-आॅर्डिनेशन कमिटी नागपूरतर्फे मेकोसाबाग येथील मैदानावर आयोजित मसीही अधिकार संमेलनात खर्गे बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, काँग्रेसचे सचिव आशिष दुवा, अखिल भारतीय अल्पसंख्य आघाडीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. अली थॉमस, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे, माजी खासदार गेव्ह आवारी, माजी मंत्री अनिस अहमद, आ. अशिष देशमुख, बबनराव तायवाडे, नितीन सरदार आदी उपस्थित होते.देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे. महात्मा गांधी यांना हा देश सर्वधर्मियांचा असल्याचे म्हटले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्व घटकांना न्याय दिला. देशाचा कारभार संविधानाच्या माध्यमातून चालावा. संविधानाचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांचीच आहे. संरक्षण करताना कुणाला काहीच मिळाले नाही तरी बलिदानाची तयारी ठेवा. ख्रिश्चन मिशनरीने देशाच्या सर्व भागात शिक्षण व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी शिक्षणाचा अधिकार दिला.परंतु आज केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात आरोग्य व शिक्षणासाठी तरतूद नाही. पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना न मिळता मोठ्या कंपन्यांनाचा होत आहे. भाजपाचा सबका साथ सबका विकासाचा नारा असला तरी मूठभर कार्पोरेट कंपन्याच्या भल्यासाठी केंद्र सरकार धोरणे राबवित असल्याचा आरोप खर्गे यांनी केला.केंद्र सरकारचा सर्वच क्षेत्रात हस्तक्षेप सुरू आहे. कुणी विरोध केला तर सीबीआय, आयकर व ईडीची चौकशी लावली जाते. यामुळे देशात भीतीचे वातावरण आहे. हिंदू धर्मात असे कुठेही म्हटलेले नाही की दुसऱ्या धर्मावर अन्याय करा. पण आज देशात धर्माच्या नावावर अत्याचार सुरू आहे. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी देशभरात फिरून याचा मुकाबला करीत आहेत. देशाचे संविधान सुरक्षित असेल तर देश सुरक्षित राहील. यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे खर्गे म्हणाले.अनिल थॉमस यांनी प्रास्ताविकातून मसीही समाज आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने अन्य समाजाप्रमाणे सुविधा मिळण्याची मागणी केली. नितीन सरदार यांनी संमेलनाची माहिती दिली. यावेळी धर्मगुरु पॉल दुपारे, अनंतराव घारड, माजी आमदार सेवक वाघाये, डॉ. अमोल देशमुख, अ‍ॅड. अभिजित वंजारी, सतीश मेहंदे, उमाकांत अग्निहोत्री, प्रा. विजय बारसे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रज्ञा बडवाईक, यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला राज्यभरातून ख्रिश्चन बांधव आले होते. 

२०१९ देशात व राज्यात काँग्रेसचीच सत्ता -अशोक चव्हाणदेशातील परिस्थिती विचारात घेता अल्पसंख्यक समुदायात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संविधानाच्या रक्षणासाठी या विरोधात संघटित होऊन मुकाबला करावा लागेल. काँग्रेस तुमच्या पाठिशी आहे. २०१९ च्या निवडणुकीत देशात व राज्यात काँग्रेसचीच सत्ता येईल, असा ठाम विश्वास प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.भगवान येशू ख्रिस्तांनी बंधूभावाचा संदेश दिला. ख्रिश्चन समाज या देशाचा अविभाज्य घटक आहे. सामाजिक सलोखा व देशाच्या विकासात या समाजाचाही वाटा आहे. मदर तेरेसा यांचे नाव जगाला माहीत आहे. त्यांनी धर्मनिरपेक्षा भावनेतून समाजाची सेवा केली. नागपुरात काँग्रेसचे दिवंगत नेते एन.पी.के.साळवे यांचे शिक्षण क्षेत्रात योगदान आहे.स्वातंत्र्य लढ्यातही या समाजाचे योगदान आहे. असे असूनही भाजपाचे नेते गोपाल शेट्टी म्हणतात ख्रिश्चन समाजाचे योगदान नाही. हे त्यांचे अज्ञान असल्याचे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण