शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दुहेरी हत्याकांडामुळे जरीपटक्यात प्रचंड तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2016 02:13 IST

जरीपटक्यात रविवारी दुपारी झालेल्या निर्घृण दुहेरी हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये असंतोष धगधगत असतानाच

नागपूर : जरीपटक्यात रविवारी दुपारी झालेल्या निर्घृण दुहेरी हत्याकांडामुळे नागरिकांमध्ये असंतोष धगधगत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर जोरदार लाठीमार करून आगीत तेल टाकले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी हत्याकांडातील आरोपीच्या घरावर हल्ला चढवला. आरोपी आणि पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत रास्ता रोको, दगडफेक केली आणि पोलीस ठाण्यावर अंत्ययात्रा नेऊन रोष व्यक्त केला.जरीपटक्यातील समता नगरात राहाणारा गुंड प्रशांत अर्जुन चमके (वय ४०), त्याची पत्नी गीता चमके (वय ३१), झनक मुन्नालाल तोमस्कर (वय ४५), त्याचा मुलगा अंकुश (वय २२), झनकचा जावई आणि वंदना चमके (वय ३५) या सहा जणांनी शेजारच्या ईमरत राणा यांच्याशी क्षुल्लक कारणावरून वाद घातला. सांडपाण्याच्या नालीची सफाई का केली नाही, असे विचारत आरोपी प्रशांत चमके झनक आणि त्यांच्या साथीदारांनी रविवारी सकाळी ९ वाजता राणाच्या घरावर हल्ला चढवला. ईमरत राणाला चाकूने भोसकले आणि विटांनी ठेचले. तर त्यांची पत्नी सुनीता (वय ३०) यांना केस धरून फरफटत नेले. ते पाहून ईमरतचा भाऊ पुरणलाल राणा लहान भावाच्या मदतीला धावला. आरोपींनी त्याच्यावरही चाकूचे सपासप घाव घातले. त्यामुळे दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेने समतानगरात प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले.पोलिसांमुळेच निर्ढावला चमकेआरोपी चमके हा या भागात खुलेआम अवैध दारूची विक्री करायचा. विरोध करणाऱ्यांना मारहाण करायचा, धमक्या द्यायचा. जरीपटका पोलिसांना मोठा हप्ता मिळत असल्याने त्याला पोलीस अभय द्यायचे. त्याच्याविरोधात तक्रार आली तरी लक्ष देत नव्हते. परिणामी चमके कमालीचा निर्ढावला होता. अलीकडे चमकेसोबत तोमस्करचीही गुंडगिरी वाढली होती. या भागातील नागरिकांना खास करून महिला मुलींना त्याचा फारच त्रास होत होता. मात्र, पोलिसांकडे तक्रार करूनही फायदा नसल्याचे माहीत असल्याने नागरिक तोंड दाबून बुक्क्याचा मार खावा, तसा चमके आणि त्याच्या साथीदारांचा त्रास सहन करीत होते. पोलिसांच्या भूमिकेमुळेच चमके आणि त्याच्या साथीदारांची गुंडगिरी एवढी वाढली की त्यांनी एकाच कुटुंबातील दोन भावांना संपवून या दोन्ही भावांचे परिवार उद्ध्वस्त केले. त्यामुळे नागरिकांमधील असंतोषाचा भडका उडाला. एकीकडे मृताचे मोजके नातेवाईक आणि समतानगरातील काही नागरिक मेयोत मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले..मारेकऱ्यांना फाशी द्यासंतप्त नागरिकांनी दुपारी ३.३० च्या सुमारास इमरत आणि पूरणलाल या दोन भावांची अंत्ययात्रा काढून जरीपटका ठाण्यावर नेली. तेथे नागरिकांच्या भावनांचा भडका उडू शकतो, हे ध्यानात आल्यामुळे पोलिसांनी मोठा ताफा जरीपटका ठाण्यात बोलवून घेतला. शीघ्र कृती दलाचे जवान, आजूबाजूच्या ठाण्यातील पोलीस आणि एसीपी नीलेश राऊत यांच्यासह गुन्हे शाखेचाही ताफा जरीपटका ठाण्यासमोर पोहचला. त्यांनी ठाण्यात अंत्ययात्रा जाऊ नये म्हणून रस्ता अडवला. शोकसंतप्त नागरिकांनी अंत्ययात्रा थांबवून राणा बंधूंच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, अशी मागणी करतानाच पोलिसांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केली. समंजस नागरिकांनी पुढाकार घेऊन अंत्ययात्रा घाटावर नेली. तेथे राणा बंधूंवर अंत्यसंस्कार करण्यात आले.