शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जदार शेतकऱ्यांमुळे तरतेय ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 18:33 IST

पीक विम्याचा लाभच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविण्याकडे पाठ फिरविली आहे. नागपूर विभागात केवळ ४९०८ हजार शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष विमा काढला आहे. पण कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीने विमा काढावा लागत असल्याने, पीक विम्याचा आकडा फुगलेला दिसतो आहे. खऱ्या अर्थाने कर्जदार शेतकऱ्यांमुळे ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ राबविणाऱ्या खासगी विमा कंपन्या तरल्या आहेत.

ठळक मुद्देविभागात केवळ ४९०० शेतकऱ्यांनी काढला प्रत्यक्ष पीक विमा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पीक विम्याचा लाभच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरविण्याकडे पाठ फिरविली आहे. नागपूर विभागात केवळ ४९०८ हजार शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष विमा काढला आहे. पण कर्जदार शेतकऱ्यांना सक्तीने विमा काढावा लागत असल्याने, पीक विम्याचा आकडा फुगलेला दिसतो आहे. खऱ्या अर्थाने कर्जदार शेतकऱ्यांमुळे ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ राबविणाऱ्या खासगी विमा कंपन्या तरल्या आहेत.गेल्यावर्षी पीक विम्याच्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांची थट्टाच झाली होती. १०० ते ५०० रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला होता. नागपूर जिल्ह्यातील एका तालुक्यात केवळ एकाच शेतकऱ्याला पीक विम्याचा लाभ मिळाला होता. गेल्यावर्षी नागपूर विभागात अडीच लाख शेतकऱ्यांपैकी केवळ ५४ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. त्यामुळे पीक विमा योजना फसवी असल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत होती. पीक विम्यावर विश्वासच नसल्याने नागपूर विभागात यावर्षी केवळ ४९०० शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष विमा उतरविला. परंतु शेतीसाठी बँकेचे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा काढणे सक्तीचे केले आहे. त्याचा फायदा पीक विमा कंपन्यांना झाला आहे. नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यात कर्ज घेतलेल्या २,२२,७६२ शेतकऱ्यांना सक्तीने पीक विमा काढावा लागला आहे.

नागपूर विभागात कर्जदार शेतकऱ्यांनी काढलेला विमा

जिल्हा                  शेतकरी संख्यावर्धा                      ३६८१७नागपूर                 ४६,६१३भंडारा                 ६४,२११गोंदिया                ४१,६४७चंद्रपूर                 ४६,७४८गडचिरोली          २१,७६२ 

नागपूर विभागात बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी काढला विमा

जिल्हा               शेतकरी संख्यावर्धा                    ५०९नागपूर                १८६भंडारा                २१३गोंदिया               ९४चंद्रपूर                 ३२५२गडचिरोली          ६५४

शेतकरी वैयक्तिक विमा काढत नसेल तर, सहाजिकच आहे पीक विमा योजना ही फसवी आहे. तरी सरकार ही पॉलिसी राबवित आहे. कारण कंपन्यांना त्याच्यापासून फायदा मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना टार्गेट केले जात आहे. राम नेवले, शेतकरी नेते शेतकऱ्यांसाठी विमा खरोखरच लाईफलाईन आहे. परंतु त्यावर सरकारने नियंत्रण असायला हवे. सरकारने विम्याची जबाबदारी खाजगी कंपन्यांच्या हाती दिली आहे आणि कंपन्यांकडे झालेले नुकसान मोजण्याची कुठलीही यंत्रणा नाही. शिवाय नुकसानीनंतर अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या अहवालाकडेही दूर्लक्ष केले जात असल्याने नुकसान होऊनही हजारो शेतकरी विम्यापासून वंचित राहत आहे. आज शेतकऱ्यांचा पीक विम्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे वैयक्तिक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली आहे. कंपन्यांना टिकविण्यासाठी सरकार कर्जदार शेतकऱ्यांना पीक विम्याची सक्ती करीत आहे.  श्रीधर ठाकरे, शेतीतज्ञ

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी