शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

बुद्धाच्या धम्मामुळेच प्रगती शक्य  : ई.झेड. खोब्रागडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:02 IST

तथागत गौतम बुद्धांच्या धम्मामुळेच प्रगती शक्य आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आंबेडकरी समाज होय. बुद्धाचे विचार व धम्म अंगीकृत करून ते आपल्या जीवनात आचरणात आणल्यामुळेच या समाजाची ही प्रगती दिसून येते, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी केले.

ठळक मुद्देरमेश राठोड यांना पृथ्वीराज बनसोड सम्यक स्मृती पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तथागत गौतम बुद्धांच्या धम्मामुळेच प्रगती शक्य आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आंबेडकरी समाज होय. बुद्धाचे विचार व धम्म अंगीकृत करून ते आपल्या जीवनात आचरणात आणल्यामुळेच या समाजाची ही प्रगती दिसून येते, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे यांनी केले.प्रा. पृथ्वीराज बनसोड प्रतिष्ठानतर्फे सोमवारी लष्करीबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशन सभागृहात आयोजित प्रा. पृथ्वीराज बनसोड सम्यक स्मृती पुरस्कार अर्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. माजी आमदार उपेंद्र शेंडे अध्यक्षस्थानी होते. तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रकाश खरात विशेष अतिथी होते.‘चलो बुद्ध की ओर’ अभियानांतर्गत ओबीसी तथा विमुक्त भटक्या बांधवांना बुद्ध धम्माच्या वाटेवर आणणाºया प्रा. डॉ. रमेश राठोड यांना ई.झेड. खोब्रागडे यांच्या हस्ते यंदाचा प्रा. पृथ्वीराज बनसोड सम्यक स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. १० हजार रुपये रोख, स्मृती चिन्ह, शाल व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप होते.ई.झेड. खोब्रागडे म्हणाले, समाजात प्रामाणिकपणे काम करणारे अनेक हिरो असतात पण ते नेहमीच पडद्यामागे असतात. रमेश राठोड हा असाच एक हिरो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न साकार करण्याचे अतिशय महत्त्वाचे काम ते करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.डॉ. प्रकाश खरात यांनी आंबेडकरी चळवळीवर प्रकाश टाकला. या चळवळीला १०० वर्षे पूर्ण होत असून त्याचे मूल्यमापन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. उपेंद्र शेंडे यांनी आपल्या अध्यक्षी भाषणात प्रा. पृथ्वीराज बन्सोड यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.प्रास्ताविक भीमराव वैद्य यांनी केले. अ‍ॅ. महेंद्र बनसोड यांनी मानपत्राचे वाचन केले. संचालन प्रा. योगेश मुनेश्वर यांनी केले. कवी सूर्यभान शेंडे यांनी आभार मानले.‘चलो बुद्ध की ओर’ अभियानाला पुरस्काराची रक्कम प्रदानआपल्या सत्काराला उत्तर देताना प्रा. रमेश राठोड म्हणाले, बुद्धाचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग हा कोणत्याही धर्माला व देशाला प्रगतीपथावर नेणारा आहे. यावेळी त्यांना पुरस्कार स्वरूप मिळालेली १० हजार रुपयाची रक्कम त्यांनी ‘चलो बुद्ध की ओर’ या अभियानासाठी प्रदान केली.

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक