शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नागपूर जिल्ह्यात क्षारयुक्त पाण्यामुळे घरोघरी रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 11:15 IST

भिवापूर तालुक्यात बोअरवेल्समधील क्षारयुक्त पाणी प्यायल्याने नागरिकांना चार दिवसांतच हगवण, ओकारी, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शहरात सध्या घरोघरी या आजाराचे रुग्ण बघावयास मिळत आहेत.

ठळक मुद्देपोटाचे आजार वाढले बोअरवेल्समधील पाण्याचा उपसा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भिवापूर तालुक्यात बोअरवेल्समधील क्षारयुक्त पाणी प्यायल्याने नागरिकांना चार दिवसांतच हगवण, ओकारी, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शहरात सध्या घरोघरी या आजाराचे रुग्ण बघावयास मिळत आहेत.भिवापूर व परिसरातील भूगर्भात मुबलक जलसाठा आहे. मात्र, त्या पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार असल्याने ते पिण्यायोग्य नाही. शहराला ११ योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, या सर्वच योजनांची दयनीय अवस्था आहे. मोखाळा, चिखली व मरूनदी या तीन प्रमुख्य पाणीपुरवठा योजनांपैकी मोखाळा योजना लोकप्रतिनिधीच्या ढिसाळ धोरणाची बळी ठरली. उर्वरित दोन योजना कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शहराला वर्षभर कृत्रिम पाणीटंचाईची झळ सोसावी लागते.ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने शहरातील विविध भागात एकूण ११० बोअरवेल्स तयार करण्यात केल्या असून, यातील ८५ बोअरवेल्समधील पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी न करता ते नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. परिणामी, अवघ्या चार दिवसांत नागरिकांनी या बोअरवेल्समधील क्षारयुक्त पाणी प्यायल्याने हगवण, उलटी आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. या आजाराचे घरोघरी रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने या बोअरवेल्समधील पाणीपुरवठा बंद केला आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले.सध्या शहरातील माळीपुरा, धर्मापूर, आझाद चौक, कुंभारपुरा, धर्मापूर या भागात हगवण, उलट्या व पोटदुखीचे रुग्ण अधिक असल्याचे दिसून येते. यात लहान मुले आणि वयोवृद्धांची संख्या अधिक आहे. परिणामी, प्रशासनाचा पाणीटंचाईवर मात करण्याचा हाही प्रयत्न फसला आहे.

लाखो लिटर पाण्याची नासाडीरुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्या बोअरवेल्समधील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे प्रशासनाच्या व नागरिकांच्या लक्षात आले. यावर उपाय म्हणून प्रशासनाने त्या बोअरवेल्समधील पाण्याचा उपसा करायला सुरुवात केली. त्यासाठी बोअरवेल्समधील मोटरपंप ४८ तासांपासून सुरू आहे. परिणामी, बोअरवेल्समधील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असून, लाखो लिटर पाणी वाहून वाया जात आहे. मात्र, क्षारयुक्त पाणी शुद्ध करण्याचा हा उपाय नाही, असे जाणकारांनी सांगितले.

कायमस्वरूपी तोडगा काढाभिवापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच योजनांचे बारा जले आहेत. काही योजना कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. उन्हाळा तोंडावर असतानाच शहराला पाणीटंचाई जाणवू लागली. ही समस्या फार जुनी आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी समस्या सोडविण्याऐवजी आरोप प्रत्यारोप करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे या पाणीसमस्येवर आतातरी कायमस्वरूपी तोडगा काढा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पाणीसमस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्षशहराला होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे प्रभाग क्रमांक - १६ मध्ये ‘टायफाईड’ व ‘किडनी स्टोन’चे रुग्ण वाढले आहेत. याबाबत नागरिकांनी ६ आॅक्टोबर, १६ व १८ नोव्हेंबर २०१७ रोजी नगरपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रारी दिल्या. दोन वर्षांपासून या गंभीर समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नगरसेविका वंदना जांभुळकर यांनी करीत नगरपंचायत प्रशासनाला नुकतेच निवेदन दिले. या निवेदनासोबत त्यांनी लोकमतमध्ये पाणीटंचाईबाबत २४ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रकाशित वृत्तही जोडले.

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Healthआरोग्य