शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यात क्षारयुक्त पाण्यामुळे घरोघरी रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 11:15 IST

भिवापूर तालुक्यात बोअरवेल्समधील क्षारयुक्त पाणी प्यायल्याने नागरिकांना चार दिवसांतच हगवण, ओकारी, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शहरात सध्या घरोघरी या आजाराचे रुग्ण बघावयास मिळत आहेत.

ठळक मुद्देपोटाचे आजार वाढले बोअरवेल्समधील पाण्याचा उपसा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भिवापूर तालुक्यात बोअरवेल्समधील क्षारयुक्त पाणी प्यायल्याने नागरिकांना चार दिवसांतच हगवण, ओकारी, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शहरात सध्या घरोघरी या आजाराचे रुग्ण बघावयास मिळत आहेत.भिवापूर व परिसरातील भूगर्भात मुबलक जलसाठा आहे. मात्र, त्या पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार असल्याने ते पिण्यायोग्य नाही. शहराला ११ योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात असून, या सर्वच योजनांची दयनीय अवस्था आहे. मोखाळा, चिखली व मरूनदी या तीन प्रमुख्य पाणीपुरवठा योजनांपैकी मोखाळा योजना लोकप्रतिनिधीच्या ढिसाळ धोरणाची बळी ठरली. उर्वरित दोन योजना कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शहराला वर्षभर कृत्रिम पाणीटंचाईची झळ सोसावी लागते.ही समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाने शहरातील विविध भागात एकूण ११० बोअरवेल्स तयार करण्यात केल्या असून, यातील ८५ बोअरवेल्समधील पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी न करता ते नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले. परिणामी, अवघ्या चार दिवसांत नागरिकांनी या बोअरवेल्समधील क्षारयुक्त पाणी प्यायल्याने हगवण, उलटी आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाला. या आजाराचे घरोघरी रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनाने या बोअरवेल्समधील पाणीपुरवठा बंद केला आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले.सध्या शहरातील माळीपुरा, धर्मापूर, आझाद चौक, कुंभारपुरा, धर्मापूर या भागात हगवण, उलट्या व पोटदुखीचे रुग्ण अधिक असल्याचे दिसून येते. यात लहान मुले आणि वयोवृद्धांची संख्या अधिक आहे. परिणामी, प्रशासनाचा पाणीटंचाईवर मात करण्याचा हाही प्रयत्न फसला आहे.

लाखो लिटर पाण्याची नासाडीरुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्या बोअरवेल्समधील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे प्रशासनाच्या व नागरिकांच्या लक्षात आले. यावर उपाय म्हणून प्रशासनाने त्या बोअरवेल्समधील पाण्याचा उपसा करायला सुरुवात केली. त्यासाठी बोअरवेल्समधील मोटरपंप ४८ तासांपासून सुरू आहे. परिणामी, बोअरवेल्समधील पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होत असून, लाखो लिटर पाणी वाहून वाया जात आहे. मात्र, क्षारयुक्त पाणी शुद्ध करण्याचा हा उपाय नाही, असे जाणकारांनी सांगितले.

कायमस्वरूपी तोडगा काढाभिवापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सर्वच योजनांचे बारा जले आहेत. काही योजना कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. उन्हाळा तोंडावर असतानाच शहराला पाणीटंचाई जाणवू लागली. ही समस्या फार जुनी आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी समस्या सोडविण्याऐवजी आरोप प्रत्यारोप करण्यात धन्यता मानत आहेत. त्यामुळे या पाणीसमस्येवर आतातरी कायमस्वरूपी तोडगा काढा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पाणीसमस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्षशहराला होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे प्रभाग क्रमांक - १६ मध्ये ‘टायफाईड’ व ‘किडनी स्टोन’चे रुग्ण वाढले आहेत. याबाबत नागरिकांनी ६ आॅक्टोबर, १६ व १८ नोव्हेंबर २०१७ रोजी नगरपंचायत प्रशासनाकडे लेखी तक्रारी दिल्या. दोन वर्षांपासून या गंभीर समस्येकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नगरसेविका वंदना जांभुळकर यांनी करीत नगरपंचायत प्रशासनाला नुकतेच निवेदन दिले. या निवेदनासोबत त्यांनी लोकमतमध्ये पाणीटंचाईबाबत २४ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रकाशित वृत्तही जोडले.

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Healthआरोग्य