शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

नागपूर मनपा आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे पाण्यावर चर्चा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 22:48 IST

पुरेसा पाणीसाठा नसल्याने शहरात जलसंकटाची भीती निर्माण झाली आहे. याबाबत सध्याची स्थिती व उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु कौेटुंबिक कारणामुळे ऐनवेळी नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे शहराबाहेर असल्याने सभा स्थगित करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. पाण्यावरील विशेष सभा ७ डिसेंबर रोजी पुन्हा घेण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला.

ठळक मुद्देविशेष सभा स्थगित : ७ डिसेंबरला पुन्हा होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुरेसा पाणीसाठा नसल्याने शहरात जलसंकटाची भीती निर्माण झाली आहे. याबाबत सध्याची स्थिती व उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु कौेटुंबिक कारणामुळे ऐनवेळी नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे शहराबाहेर असल्याने सभा स्थगित करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. पाण्यावरील विशेष सभा ७ डिसेंबर रोजी पुन्हा घेण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला.शुक्रवारी विशेष सभा सुरू झाली, तेव्हा आयुक्तांच्या खुर्चीवर अपर आयुक्त राम जोशी बसले होते. यावर अपक्ष नगरसेविका आभा पांडे म्हणाल्या, पाण्याारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा बोलावण्यात आली. अशावेळी आयुक्त अभिजित बांगर, अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, पाणीपूरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप राजगिरे सभेत उपस्थित नाहीत. तेव्हा चर्चा करून फायदाच काय. आपसात चर्चा करून कुठलेही समाधान निघणार नाही. वरिष्ठ अधिकारी राहिले तर सूचनांवर अंमलबजावणी होऊ शकेल. सत्तापक्षाची प्रशासनावर पकड नसल्यानेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोपही पांडे यांनी केला.आभा पांडे यांच्या म्हणण्याचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनीही समर्थन केले.ते म्हणाले, चर्चेतून निघालेल्या निष्कर्षावर अंमलबजावणी व्हायला हवी. उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण व्हायला नको.अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेदरम्यान ज्या सूचना येतील त्यावर अंमल करणारे अधिकारी असल्यास फायदा होईल. त्यामुळे ही सभा स्थगित करण्यात यावी. सत्तापक्षानेही ही सूचना मान्य केली. सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले, भाजपाचे अनेक नगरसेवक पाणी संकटापासून वाचण्यासाठी उपाययोजना सुचविणार आहेत. वरिष्ठ अधिकारी नसल्याने अंमलबजावणी होऊ शकणार नाही. तेव्हा विशेष सभेची तारीख पुढे ढकलण्यात यावी. यामुळे विशेष सभेची तारीख सर्वसंमतीने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यत आला.केवळ ३२ सदस्य होते उपस्थितविशेष सभेसाठी सकाळी ११ वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. सदस्यांची संख्या फारच कमी असल्याने सभा थोडी उशिरा सुरु करण्यात आली. तेव्हा केवळ ३२ नगरसेवक उपस्थित होते. सभागृहातील सदस्यांच्या संख्येबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. सभा स्थगित झाल्यानंतरही अनेक सदस्य नगरसेवक महाल येथील टाऊन हॉलवर सभेसाठी येत होते.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी