शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नागपूर मनपा आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे पाण्यावर चर्चा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 22:48 IST

पुरेसा पाणीसाठा नसल्याने शहरात जलसंकटाची भीती निर्माण झाली आहे. याबाबत सध्याची स्थिती व उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु कौेटुंबिक कारणामुळे ऐनवेळी नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे शहराबाहेर असल्याने सभा स्थगित करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. पाण्यावरील विशेष सभा ७ डिसेंबर रोजी पुन्हा घेण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला.

ठळक मुद्देविशेष सभा स्थगित : ७ डिसेंबरला पुन्हा होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुरेसा पाणीसाठा नसल्याने शहरात जलसंकटाची भीती निर्माण झाली आहे. याबाबत सध्याची स्थिती व उपाययोजना यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. परंतु कौेटुंबिक कारणामुळे ऐनवेळी नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे शहराबाहेर असल्याने सभा स्थगित करण्याचा निर्णय सर्वसंमतीने घेण्यात आला. पाण्यावरील विशेष सभा ७ डिसेंबर रोजी पुन्हा घेण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला.शुक्रवारी विशेष सभा सुरू झाली, तेव्हा आयुक्तांच्या खुर्चीवर अपर आयुक्त राम जोशी बसले होते. यावर अपक्ष नगरसेविका आभा पांडे म्हणाल्या, पाण्याारख्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा बोलावण्यात आली. अशावेळी आयुक्त अभिजित बांगर, अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, पाणीपूरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप राजगिरे सभेत उपस्थित नाहीत. तेव्हा चर्चा करून फायदाच काय. आपसात चर्चा करून कुठलेही समाधान निघणार नाही. वरिष्ठ अधिकारी राहिले तर सूचनांवर अंमलबजावणी होऊ शकेल. सत्तापक्षाची प्रशासनावर पकड नसल्यानेच ही परिस्थिती ओढवल्याचा आरोपही पांडे यांनी केला.आभा पांडे यांच्या म्हणण्याचे विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनीही समर्थन केले.ते म्हणाले, चर्चेतून निघालेल्या निष्कर्षावर अंमलबजावणी व्हायला हवी. उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण व्हायला नको.अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेदरम्यान ज्या सूचना येतील त्यावर अंमल करणारे अधिकारी असल्यास फायदा होईल. त्यामुळे ही सभा स्थगित करण्यात यावी. सत्तापक्षानेही ही सूचना मान्य केली. सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले, भाजपाचे अनेक नगरसेवक पाणी संकटापासून वाचण्यासाठी उपाययोजना सुचविणार आहेत. वरिष्ठ अधिकारी नसल्याने अंमलबजावणी होऊ शकणार नाही. तेव्हा विशेष सभेची तारीख पुढे ढकलण्यात यावी. यामुळे विशेष सभेची तारीख सर्वसंमतीने पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यत आला.केवळ ३२ सदस्य होते उपस्थितविशेष सभेसाठी सकाळी ११ वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. सदस्यांची संख्या फारच कमी असल्याने सभा थोडी उशिरा सुरु करण्यात आली. तेव्हा केवळ ३२ नगरसेवक उपस्थित होते. सभागृहातील सदस्यांच्या संख्येबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहे. सभा स्थगित झाल्यानंतरही अनेक सदस्य नगरसेवक महाल येथील टाऊन हॉलवर सभेसाठी येत होते.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी