शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ड्रग्ज-दारूचा नाद, १४९ जणांनी स्वत:लाच केले ‘खल्लास’

By योगेश पांडे | Updated: December 14, 2023 00:09 IST

नागपूरकरांना जीवघेणा ‘स्ट्रेस’; वर्षभरात ७७१ आत्महत्या : राज्यात सर्वाधिक आत्महत्येचा दर उपराजधानीत.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मागील काही काळापासून जीवनशैलीमध्ये बदल होत असल्याने ताणतणावदेखील वाढताना दिसून येत आहेत. अनेकजण तणावाची पातळी सहन न करू शकल्याने जीव देण्याचे टोकाचे पाऊलदेखील उचलतात. नागपूर हे तसे दिलखुलास लोकांचे शहर मानले जाते. मात्र येथील नागरिकांमध्येदेखील ‘स्ट्रेस’ वाढत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. राज्यात मागील वर्षी झालेल्या आत्महत्यांमध्ये नागपुरातील दर सर्वाधिक होता. वर्षभरातच शहरातील ७७१ नागरिकांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी समाजमनाच्या विचार प्रणालीवरच झणझणीत अंजन टाकणारी आहे.

‘एनसीआरबी’ने देशातील आत्महत्यांची आकडेवारी जारी केली आहे. त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. २०२२ साली नागपुरात ७७१ जणांनी आत्महत्या केली व आत्महत्यांचा दर राज्यात सर्वाधिक ३०.८ इतका होता. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये १३३ महिलांचा समावेश होता. मुंबईत १ हजार ५०१ आत्महत्या झाल्या व ८.२१ इतका आत्महत्यांचा दर होता, तर पुण्यात १ हजार ३ आत्महत्या झाल्या व त्यांचा दर १९.९ इतका होता. नाशिकमधील आत्महत्यांचा दर १६.९ इतका होता. देशपातळीवर नागपूरचा आत्महत्यांमध्ये आठवा क्रमांक होता.

या आकडेवारीतील सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे एमडी व इतर ड्रग्जच्या विळख्यात मोठ्या प्रमाणावर तरुणाई फसत आहे. याच्या विळख्यात फसल्यावर जर ड्रग्ज मिळाले नाही तर हे तरुण अगदी टोकाचेदेखील पाऊल उचलायला मागेपुढे पाहत नाही. २०२२ मध्ये दारू किंवा ड्रग्जच्या नादी लागून तब्बल १४९ जणांनी आत्महत्या केली. एकूण आकडेवारीच्या तुलनेत ही टक्केवारी जवळपास २० टक्के इतकी आहे.

- दोन वर्षातील दर समानच

२०२१ मध्ये नागपुरात ७७७ नागरिकांनी आत्महत्या केली होती. त्या वर्षी कोरोनाचा फटका बसला होता व अनेकजण विविध तणावात आले होते. मात्र २०२२ मध्ये अशा प्रकारची कुठलीही स्थिती नव्हती. मात्र तेव्हाचा दरदेखील जवळपास सारखाच राहिला.

- प्रेमप्रकरणाचे वय धोक्याचे

प्रेमप्रकरणातून वर्षभरात ३५ जणांनी जीव दिला. यात २५ पुरुष, तर १० महिलांचा समावेश होता. अजाण वयात प्रेम झाल्यानंतर त्यातून निर्माण होणारे ताणतणाव किंवा प्रेमात अपयश आल्यानंतर अनेकांनी हे पाऊल उचलले.

- अर्ध्याहून अधिक आत्महत्या घरातील वादांतून

शहरातील अर्ध्याहून अधिक आत्महत्या या कुटुंबातील टोकाच्या वादांमधून झाल्याचे वास्तव आहे. ४३६ जणांनी घरातील भांडणातून जीव दिला. त्यात ३३५ पुरुष, तर १०१ महिलांचा समावेश होता. त्याखालोखाल आजारपणाला कंटाळून १०५ जणांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. त्यात ९२ पुरुष व १३ महिलांचा समावेश होता. एक्स्ट्रा मॅरेटल अफेअरमुळे चारजणांनी आत्महत्या केली, तर घटस्फोटाच्या तणावातून ७ लोकांनी जीवन संपविले.

- कर्करोगाला कंटाळून ३३ जणांची आत्महत्या

विविध आजारपणाला कंटाळून शंभरहून अधिक जणांनी आत्महत्या केली. त्यातील ६ महिलांसह ३३ जण हे कर्करोगाने पीडित होते. एकीकडे लहान लहान मुले कर्करोगाशी झुंज देऊन त्यावर मात करत असताना व कर्करोगावर उपचार उपलब्ध असतानादेखील त्यांनी हे जीवघेणे पाऊल उचलले. अर्धांगवायूने ग्रस्त १३ जणांनी जीव दिला, तर मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या ५८ जणांनी जीवन संपविले.

- आत्महत्येची प्रमुख कारणे

कारणे - आत्महत्या पुरुष : आत्महत्या महिला : एकूणकर्ज - २ : १ : ३विवाहाचा तणाव : १४ : ८ : २२परीक्षेत अपयश : ४ : २ : ६कौटुंबिक समस्या : ३३५ : १०१ : ४३६आजारपण : ९२ : १३ : १०५ड्रग्ज-दारू : १४९ : ० : १४९जिवलगाचे निधन : २ : २ : ४प्रतिष्ठा : १ : ० : १आदर्श व्यक्तीचे निधन : १ : ० : १लव्ह अफेअर्स : २५ : १० : २५करिअरमधील समस्या : ७ : ० : ७मालमत्तेचा वाद : २ : ० : २

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी