शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज-दारूचा नाद, १४९ जणांनी स्वत:लाच केले ‘खल्लास’

By योगेश पांडे | Updated: December 14, 2023 00:09 IST

नागपूरकरांना जीवघेणा ‘स्ट्रेस’; वर्षभरात ७७१ आत्महत्या : राज्यात सर्वाधिक आत्महत्येचा दर उपराजधानीत.

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : मागील काही काळापासून जीवनशैलीमध्ये बदल होत असल्याने ताणतणावदेखील वाढताना दिसून येत आहेत. अनेकजण तणावाची पातळी सहन न करू शकल्याने जीव देण्याचे टोकाचे पाऊलदेखील उचलतात. नागपूर हे तसे दिलखुलास लोकांचे शहर मानले जाते. मात्र येथील नागरिकांमध्येदेखील ‘स्ट्रेस’ वाढत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे. राज्यात मागील वर्षी झालेल्या आत्महत्यांमध्ये नागपुरातील दर सर्वाधिक होता. वर्षभरातच शहरातील ७७१ नागरिकांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी समोर आली आहे. ही आकडेवारी समाजमनाच्या विचार प्रणालीवरच झणझणीत अंजन टाकणारी आहे.

‘एनसीआरबी’ने देशातील आत्महत्यांची आकडेवारी जारी केली आहे. त्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे. २०२२ साली नागपुरात ७७१ जणांनी आत्महत्या केली व आत्महत्यांचा दर राज्यात सर्वाधिक ३०.८ इतका होता. आत्महत्या करणाऱ्यांमध्ये १३३ महिलांचा समावेश होता. मुंबईत १ हजार ५०१ आत्महत्या झाल्या व ८.२१ इतका आत्महत्यांचा दर होता, तर पुण्यात १ हजार ३ आत्महत्या झाल्या व त्यांचा दर १९.९ इतका होता. नाशिकमधील आत्महत्यांचा दर १६.९ इतका होता. देशपातळीवर नागपूरचा आत्महत्यांमध्ये आठवा क्रमांक होता.

या आकडेवारीतील सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे एमडी व इतर ड्रग्जच्या विळख्यात मोठ्या प्रमाणावर तरुणाई फसत आहे. याच्या विळख्यात फसल्यावर जर ड्रग्ज मिळाले नाही तर हे तरुण अगदी टोकाचेदेखील पाऊल उचलायला मागेपुढे पाहत नाही. २०२२ मध्ये दारू किंवा ड्रग्जच्या नादी लागून तब्बल १४९ जणांनी आत्महत्या केली. एकूण आकडेवारीच्या तुलनेत ही टक्केवारी जवळपास २० टक्के इतकी आहे.

- दोन वर्षातील दर समानच

२०२१ मध्ये नागपुरात ७७७ नागरिकांनी आत्महत्या केली होती. त्या वर्षी कोरोनाचा फटका बसला होता व अनेकजण विविध तणावात आले होते. मात्र २०२२ मध्ये अशा प्रकारची कुठलीही स्थिती नव्हती. मात्र तेव्हाचा दरदेखील जवळपास सारखाच राहिला.

- प्रेमप्रकरणाचे वय धोक्याचे

प्रेमप्रकरणातून वर्षभरात ३५ जणांनी जीव दिला. यात २५ पुरुष, तर १० महिलांचा समावेश होता. अजाण वयात प्रेम झाल्यानंतर त्यातून निर्माण होणारे ताणतणाव किंवा प्रेमात अपयश आल्यानंतर अनेकांनी हे पाऊल उचलले.

- अर्ध्याहून अधिक आत्महत्या घरातील वादांतून

शहरातील अर्ध्याहून अधिक आत्महत्या या कुटुंबातील टोकाच्या वादांमधून झाल्याचे वास्तव आहे. ४३६ जणांनी घरातील भांडणातून जीव दिला. त्यात ३३५ पुरुष, तर १०१ महिलांचा समावेश होता. त्याखालोखाल आजारपणाला कंटाळून १०५ जणांनी आत्महत्येचे पाऊल उचलले. त्यात ९२ पुरुष व १३ महिलांचा समावेश होता. एक्स्ट्रा मॅरेटल अफेअरमुळे चारजणांनी आत्महत्या केली, तर घटस्फोटाच्या तणावातून ७ लोकांनी जीवन संपविले.

- कर्करोगाला कंटाळून ३३ जणांची आत्महत्या

विविध आजारपणाला कंटाळून शंभरहून अधिक जणांनी आत्महत्या केली. त्यातील ६ महिलांसह ३३ जण हे कर्करोगाने पीडित होते. एकीकडे लहान लहान मुले कर्करोगाशी झुंज देऊन त्यावर मात करत असताना व कर्करोगावर उपचार उपलब्ध असतानादेखील त्यांनी हे जीवघेणे पाऊल उचलले. अर्धांगवायूने ग्रस्त १३ जणांनी जीव दिला, तर मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या ५८ जणांनी जीवन संपविले.

- आत्महत्येची प्रमुख कारणे

कारणे - आत्महत्या पुरुष : आत्महत्या महिला : एकूणकर्ज - २ : १ : ३विवाहाचा तणाव : १४ : ८ : २२परीक्षेत अपयश : ४ : २ : ६कौटुंबिक समस्या : ३३५ : १०१ : ४३६आजारपण : ९२ : १३ : १०५ड्रग्ज-दारू : १४९ : ० : १४९जिवलगाचे निधन : २ : २ : ४प्रतिष्ठा : १ : ० : १आदर्श व्यक्तीचे निधन : १ : ० : १लव्ह अफेअर्स : २५ : १० : २५करिअरमधील समस्या : ७ : ० : ७मालमत्तेचा वाद : २ : ० : २

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी