शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

नागपूर विभागातील १७०० गावात दुष्काळी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 00:10 IST

नागपूर विभागातील १७१६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्याने, येथे दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११७९ गावांची पैसेवारी कमी आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : ६,४५२ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एकीकडे पिकांचे चांगले उत्पादन झाल्याच्या सुरुवातीच्या अहवालावर परतीच्या पावसाने पाणी फेरले. पूर व अतिवृष्टीचा फटका पिकांना बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर झाला. नागपूर विभागातील १७१६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्याने, येथे दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११७९ गावांची पैसेवारी कमी आहे.यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुरुवातीपासून चिंतित होता, नंतर मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकरी सुखावला होता. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता यंदा उत्पादन चांगले होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. नजरअंदाज आणि सुधारित पैसेवारीत नागपूर विभागातील सर्वच गावांची पीक परिस्थिती उत्तम दर्शविण्यात आली होती. परंतु ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीही झाली. यामुळे पिकांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक गेले. यावर आता महसूल प्रशासनाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नागपूर विभागात ८,४४२ गावांमध्ये खरीप पीक घेतल्या जाते. यातील १७६८ गावांची अंतिम पैसेवारी ही ५० पैशापेक्षा कमी दर्शविण्यात आली आहे, तर ६,४५२ गावांची पैसेवारी ही ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११७९ गावांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील ३४३ तर गडचिरोली जिल्ह्यातील १९४ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आहे. भंडारा, गोंदिया व चंद्रपूर येथील सर्वच गावाची पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळVidarbhaविदर्भ