शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

नागपूर विभागातील १७०० गावात दुष्काळी परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 00:10 IST

नागपूर विभागातील १७१६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्याने, येथे दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११७९ गावांची पैसेवारी कमी आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाचा फटका : ६,४५२ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : एकीकडे पिकांचे चांगले उत्पादन झाल्याच्या सुरुवातीच्या अहवालावर परतीच्या पावसाने पाणी फेरले. पूर व अतिवृष्टीचा फटका पिकांना बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर झाला. नागपूर विभागातील १७१६ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आल्याने, येथे दुष्काळसदृश परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे.चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११७९ गावांची पैसेवारी कमी आहे.यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी सुरुवातीपासून चिंतित होता, नंतर मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे शेतकरी सुखावला होता. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता यंदा उत्पादन चांगले होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. नजरअंदाज आणि सुधारित पैसेवारीत नागपूर विभागातील सर्वच गावांची पीक परिस्थिती उत्तम दर्शविण्यात आली होती. परंतु ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. अतिवृष्टीही झाली. यामुळे पिकांना मोठा फटका बसला. शेतकऱ्यांचे हाती आलेले पीक गेले. यावर आता महसूल प्रशासनाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. नागपूर विभागात ८,४४२ गावांमध्ये खरीप पीक घेतल्या जाते. यातील १७६८ गावांची अंतिम पैसेवारी ही ५० पैशापेक्षा कमी दर्शविण्यात आली आहे, तर ६,४५२ गावांची पैसेवारी ही ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली आहे. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११७९ गावांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील ३४३ तर गडचिरोली जिल्ह्यातील १९४ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आहे. भंडारा, गोंदिया व चंद्रपूर येथील सर्वच गावाची पैसेवारी ५० पेक्षा जास्त दर्शविण्यात आली आहे.

टॅग्स :droughtदुष्काळVidarbhaविदर्भ