शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

स्वतंत्र विदर्भासाठी नाट्य कलावंतांचा पुढाकार

By admin | Updated: June 19, 2014 00:57 IST

वेगळ्या विदर्भासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोक चळवळ चालवितात. पण यात आता नाट्य कलावंतांनीही सहभाग घेतला आहे. यात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी नाट्य कलावंतांचा एक मेळावा २२ जून रोजी

जनमंचचे आयोजन : २२ जूनला नागपुरात मेळावा नागपूर : वेगळ्या विदर्भासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोक चळवळ चालवितात. पण यात आता नाट्य कलावंतांनीही सहभाग घेतला आहे. यात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी नाट्य कलावंतांचा एक मेळावा २२ जून रोजी संघी भवन, काँग्रेसनगर येथे दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. यात संपूर्ण विदर्भातील नाट्य कलावंत एकत्रित येऊन वेगळ्या विदर्भाची मागणी करणार आहेत. जनमंच या सामाजिक संस्थेने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीशी कलावंतांचा काय संबंध, असा प्रश्न स्वाभाविकपणे लोकांच्या मनात येतो. पण विदर्भाच्या विकासासाठी सर्वांगीण विकास आवश्यक आहे. यात कला, कलावंत आणि कला क्षेत्राचा विकासही अपेक्षित आहे. संयुक्त महाराष्ट्रात हा विकास खुंटला आहे. कला ही समाजाच्या बाहेरची बाब नाही. सामाजिक भान जपल्याशिवाय लेखक, कलावंतही घडत नाही. त्यामुळेच कलेचा विकास साधण्यासाठी आणि सामाजिक भान जपण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक घडामोडींचा परिणाम कला आणि कलावंतांवर होत असतो. विदर्भाची संस्कृती वेगळी आहे. इथली बोलीभाषा, लोककला, कलांचे झाडीपट्टी महोत्सव हे सारे वेगळे आहे. वैदर्भीय कलेला, कलावंताला आणि लेखनाला, अभिनयाला मुंबईचे प्रमाणपत्र आवश्यक झाले आहे. मालवणी-कोकणी, पश्चिम महाराष्ट्राची प्रमाणभाषा विदर्भावर लादल्या जाते आहे. त्या तुलनेत वऱ्हाडी, झाडीबोली समृद्ध असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. येथील शेतीकडे, विविध समाजाकडे आणि नाट्य महोत्सव व कलांकडे मुंबईत दुर्लक्ष केले जाते. येथील कलावंतांचा सत्कार होत नाही. झाडीपट्टीत आजपर्यंत एकही मुख्यमंत्री आलेला नाही. त्यामुळेच आता अन्याय सहन करणार नाही, अशी भूमिका कलावंतांनी घेतली आहे. कलावंतांनी आतापर्यंत क्रांतीच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. जनजागृतीसाठी पथनाट्ये, कविता, लेखन यांनीच महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यामुळेच वेगळ्या विदर्भासाठी आता कलावंतांनीही कंबर कसली आहे. सत्तेच्या राजकारणापलिकडे जाऊन विदर्भासाठी सांस्कृतिक चळवळ उभारण्याचा निर्णय आता कलावंतांनी घेतला आहे. या मेळाव्यात सर्व कलावंतांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दिग्दर्शक हरीश इथापे, श्याम पेठकर, देवेंद्र लुटे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)