शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र विदर्भासाठी नाट्य कलावंतांचा पुढाकार

By admin | Updated: June 19, 2014 00:57 IST

वेगळ्या विदर्भासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोक चळवळ चालवितात. पण यात आता नाट्य कलावंतांनीही सहभाग घेतला आहे. यात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी नाट्य कलावंतांचा एक मेळावा २२ जून रोजी

जनमंचचे आयोजन : २२ जूनला नागपुरात मेळावा नागपूर : वेगळ्या विदर्भासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील लोक चळवळ चालवितात. पण यात आता नाट्य कलावंतांनीही सहभाग घेतला आहे. यात सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी नाट्य कलावंतांचा एक मेळावा २२ जून रोजी संघी भवन, काँग्रेसनगर येथे दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. यात संपूर्ण विदर्भातील नाट्य कलावंत एकत्रित येऊन वेगळ्या विदर्भाची मागणी करणार आहेत. जनमंच या सामाजिक संस्थेने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. वेगळ्या विदर्भाच्या मागणीशी कलावंतांचा काय संबंध, असा प्रश्न स्वाभाविकपणे लोकांच्या मनात येतो. पण विदर्भाच्या विकासासाठी सर्वांगीण विकास आवश्यक आहे. यात कला, कलावंत आणि कला क्षेत्राचा विकासही अपेक्षित आहे. संयुक्त महाराष्ट्रात हा विकास खुंटला आहे. कला ही समाजाच्या बाहेरची बाब नाही. सामाजिक भान जपल्याशिवाय लेखक, कलावंतही घडत नाही. त्यामुळेच कलेचा विकास साधण्यासाठी आणि सामाजिक भान जपण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. समाजातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक घडामोडींचा परिणाम कला आणि कलावंतांवर होत असतो. विदर्भाची संस्कृती वेगळी आहे. इथली बोलीभाषा, लोककला, कलांचे झाडीपट्टी महोत्सव हे सारे वेगळे आहे. वैदर्भीय कलेला, कलावंताला आणि लेखनाला, अभिनयाला मुंबईचे प्रमाणपत्र आवश्यक झाले आहे. मालवणी-कोकणी, पश्चिम महाराष्ट्राची प्रमाणभाषा विदर्भावर लादल्या जाते आहे. त्या तुलनेत वऱ्हाडी, झाडीबोली समृद्ध असूनही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. येथील शेतीकडे, विविध समाजाकडे आणि नाट्य महोत्सव व कलांकडे मुंबईत दुर्लक्ष केले जाते. येथील कलावंतांचा सत्कार होत नाही. झाडीपट्टीत आजपर्यंत एकही मुख्यमंत्री आलेला नाही. त्यामुळेच आता अन्याय सहन करणार नाही, अशी भूमिका कलावंतांनी घेतली आहे. कलावंतांनी आतापर्यंत क्रांतीच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. जनजागृतीसाठी पथनाट्ये, कविता, लेखन यांनीच महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यामुळेच वेगळ्या विदर्भासाठी आता कलावंतांनीही कंबर कसली आहे. सत्तेच्या राजकारणापलिकडे जाऊन विदर्भासाठी सांस्कृतिक चळवळ उभारण्याचा निर्णय आता कलावंतांनी घेतला आहे. या मेळाव्यात सर्व कलावंतांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दिग्दर्शक हरीश इथापे, श्याम पेठकर, देवेंद्र लुटे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)