शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

‘नौटंकी’वरून विधानपरिषदेत गोंधळाचा ‘ड्रामा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 17:36 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर : विधानपरिषदेत हिवाळी अधिवेशनातील पहिलाच दिवस गोंधळाचा ठरला. कर्जमाफी, बोंडअळीच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत ‘नौटंकी’ करत असल्याचा आरोप केला. याला सत्ताधाऱ्यांनीदेखील आक्रमक स्वरूपात प्रत्युत्तर दिले. गोंधळामुळे अगोदर चारवेळा व नंतर दिवसभरासाठी सभापतींनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.कामकाजाच्या पहिल्या दिवशी अगोदरपासूनच विरोधक आक्रमक होते. दिवसाच्या कामकाजाला सुरुवात होताच ...

ठळक मुद्देकर्जमाफी, बोंडअळीवरून विरोधक आक्रमककोट्यवधी रुपये कुठल्या बँकेत गेले ?

आॅनलाईन लोकमतनागपूर : विधानपरिषदेत हिवाळी अधिवेशनातील पहिलाच दिवस गोंधळाचा ठरला. कर्जमाफी, बोंडअळीच्या मुद्यावरून विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत ‘नौटंकी’ करत असल्याचा आरोप केला. याला सत्ताधाऱ्यांनीदेखील आक्रमक स्वरूपात प्रत्युत्तर दिले. गोंधळामुळे अगोदर चारवेळा व नंतर दिवसभरासाठी सभापतींनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.कामकाजाच्या पहिल्या दिवशी अगोदरपासूनच विरोधक आक्रमक होते. दिवसाच्या कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी २८९ अन्वये स्थनग प्रस्ताव मांडला. सभापतींनी स्थगन प्रस्ताव स्वीकारायला नकार दिला. मात्र मुंडे यांना या विषयावर बोलण्याची संधी दिली. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. कर्जमाफीच्या घोषणेला सहा महिने होऊनही शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफी मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी पिंप्रीबुटी गावातील ज्या शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केला त्यालादेखील कर्जमाफी मिळालेली नाही. मग कोट्यवधी रुपये कोणत्या बँकेकडे गेले असा प्रश्न उपस्थित करत मुंडे यांनी मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या बाबतीत ‘नौटंकी’ करत असल्याचा आरोप केला.कापूस, बोंडअळीमुळे मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. पंचनामे होत नाहीत, पंचनामा करणारे अधिकारीही कुठे दिसले नाहीत असे मुंडे म्हणाले. शेतकऱ्यांनी नावे टाकून दिलेल्या ‘बोंडअळी’ने खराब झालेल्या कापसाची बोंडे त्यांनी सभागृहात सादर केली.सत्ताधारी आक्रमकमहसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘नौटंकी’ या शब्दावर आक्षेप घेतल्याने सभागृहात गोंधळ उडाला. विरोधकांच्या राजकारणाची पातळी खालावली आहे, असा आरोप पाटील यांनी केला. त्यामुळे विरोधक संतप्त झाले. या गोंधळात सभागृहाचे कामकाज चार वेळेला तहकुब करावे लागले. सदर शब्द तपासून घेऊ असे आश्वासन सभापतींनी दिले. मात्र विरोधकांनी चर्चेसाठी आक्रमक पवित्रा घेतल्याने अखेर सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.चर्चेच्या वेळी उत्तर देऊ : मुख्यमंत्रीकर्जमाफीच्या मागणीवरून विरोधक आक्रमक झाले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची तयारी दाखविली. मात्र गोंधळ सुरूच होता. आमच्यावर आरोप लागले तर उत्तर द्यायचे नाही का, असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी चर्चेच्या वेळी विस्तृत उत्तर देऊ असे स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांनीदेखील शासन चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले. परंतु तरीदेखील गदारोळ कायमच होता.

टॅग्स :nagpurनागपूर