शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

महामानवाच्या वस्तूंना पुन्हा वाळवी लागण्याचा धोका; रासायनिक प्रक्रियेनंतरही ४०० वर वस्तू कुलूपबंदच

By आनंद डेकाटे | Updated: October 21, 2023 13:51 IST

शांतिवन चिचोलीतील संग्रहालय अर्धवटच

आनंद डेकाटे

नागपूर : देशाच्या संविधानाचा मसुदा ज्या टाइपरायटरवर सर्वप्रथम तयार करण्यात आला होता, त्या टाइपरायटरसह महामानव डॉ. आंबेडकर यांच्या दैनंदिन वापरातील अनेक ऐतिहासिक वस्तूंना पुन्हा एकदा वाळवी लागण्याचा धोका निर्माण आहे. तसे पाहता या वस्तू आणखी १०० वर्षे टिकून राहाव्यात, यासाठी या ऐतिहासिक वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आलेली आहे. मात्र तीन वर्षे लोटूनही या वस्तू कुलूपबंदच आहेत. त्या संग्रहालयात योग्य पद्धतीने ठेवल्या गेल्या नाहीत, तर त्यांना पुन्हा वाळवी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी कळमेश्वर रोडवर चिचोली या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील बौद्ध प्रशिक्षण केंद्र साकारण्याचा निर्णय घेतला. १९५७ मध्ये गोपिकाबाई बाजीराव ठाकरे या महिलेने त्यांना येथे ११ एकर जागा दान दिली. या जागेवर गोडबोले यांनी ‘शांतिवन’ उभारले. या परिसरातच त्यांनी एक छोटेखानी संग्रहालय उभारले. त्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण समारंभांत वापरलेले कपडे, कोट, घरगुती कपडे, हॅट, छत्री, पेन, कंदील आदींसह दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंसह देशाच्या संविधानाचा मसुदा ज्या टाइपरायटरवर सर्वप्रथम तयार करण्यात आला होता, तो टाइपरायटर आदी अनेक ऐतिहासिक वस्तू आणि दस्तऐवज शांतिवन चिचोली येथील संग्रहालयात ठेवल्या आहेत.

मागील काही वर्षांपासून देशाचा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला होता. कपड्यांना वाळवी लागणे सुरू झाले होते. तेव्हा शांतिवन चिचोली येथील भारतीय बौद्ध परिषदेने या वस्तूंचे जतन करण्यासाठी शासनाकडे मागणी केली. शासनाने ही मागणी मान्य करीत या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करून त्यांचे जतन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टीज, लखनऊ’ या केंद्र सरकारच्या संस्थेतर्फे या ऐतिहासिक वस्तूंवर नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयातील प्रयोगशाळेत रासायनिक प्रक्रिया पार पाडण्यात आली. या प्रक्रियेनंतर या वस्तू तब्बल १०० वर्षे टिकून राहणार होत्या. याला आता तीन वर्षे झाली आहेत; परंतु शांतिवन चिचोलीतील मुख्य संग्रहालयाची इमारत अजूनही अपूर्णच आहे. त्यामुळे या वस्तू संग्रहालयात न ठेवता कुलूपबंदच आहेत. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया झाली असली तरी मोकळ्या हवामानात या वस्तू असल्याने त्या नष्ट होण्याची भीती आहे.

संग्रहालयाची भव्य इमारत उभी

शांतिवन चिचोलीसाठी सरकारने ४० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. परंतु, अंतर्गत कामे रखडली आहेत. महामानवाच्या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्या वस्तू कुलूपबंदच आहेत. या वस्तू लवकर संग्रहालयात स्थानांतरित झाल्या नाहीत तर त्या नष्ट होण्याचा धोका नाकारता येत नाही.

- संजय पाटील, कार्यवाह, भारतीय बौद्ध परिषद

टॅग्स :SocialसामाजिकnagpurनागपूरDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर