शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

महामानवाच्या वस्तूंना पुन्हा वाळवी लागण्याचा धोका; रासायनिक प्रक्रियेनंतरही ४०० वर वस्तू कुलूपबंदच

By आनंद डेकाटे | Updated: October 21, 2023 13:51 IST

शांतिवन चिचोलीतील संग्रहालय अर्धवटच

आनंद डेकाटे

नागपूर : देशाच्या संविधानाचा मसुदा ज्या टाइपरायटरवर सर्वप्रथम तयार करण्यात आला होता, त्या टाइपरायटरसह महामानव डॉ. आंबेडकर यांच्या दैनंदिन वापरातील अनेक ऐतिहासिक वस्तूंना पुन्हा एकदा वाळवी लागण्याचा धोका निर्माण आहे. तसे पाहता या वस्तू आणखी १०० वर्षे टिकून राहाव्यात, यासाठी या ऐतिहासिक वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करण्यात आलेली आहे. मात्र तीन वर्षे लोटूनही या वस्तू कुलूपबंदच आहेत. त्या संग्रहालयात योग्य पद्धतीने ठेवल्या गेल्या नाहीत, तर त्यांना पुन्हा वाळवी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी धम्मसेनानी वामनराव गोडबोले यांनी कळमेश्वर रोडवर चिचोली या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील बौद्ध प्रशिक्षण केंद्र साकारण्याचा निर्णय घेतला. १९५७ मध्ये गोपिकाबाई बाजीराव ठाकरे या महिलेने त्यांना येथे ११ एकर जागा दान दिली. या जागेवर गोडबोले यांनी ‘शांतिवन’ उभारले. या परिसरातच त्यांनी एक छोटेखानी संग्रहालय उभारले. त्यात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक महत्त्वपूर्ण समारंभांत वापरलेले कपडे, कोट, घरगुती कपडे, हॅट, छत्री, पेन, कंदील आदींसह दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंसह देशाच्या संविधानाचा मसुदा ज्या टाइपरायटरवर सर्वप्रथम तयार करण्यात आला होता, तो टाइपरायटर आदी अनेक ऐतिहासिक वस्तू आणि दस्तऐवज शांतिवन चिचोली येथील संग्रहालयात ठेवल्या आहेत.

मागील काही वर्षांपासून देशाचा हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला होता. कपड्यांना वाळवी लागणे सुरू झाले होते. तेव्हा शांतिवन चिचोली येथील भारतीय बौद्ध परिषदेने या वस्तूंचे जतन करण्यासाठी शासनाकडे मागणी केली. शासनाने ही मागणी मान्य करीत या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया करून त्यांचे जतन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ‘नॅशनल रिसर्च लॅबोरेटरी फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ कल्चरल प्रॉपर्टीज, लखनऊ’ या केंद्र सरकारच्या संस्थेतर्फे या ऐतिहासिक वस्तूंवर नागपुरातील मध्यवर्ती संग्रहालयातील प्रयोगशाळेत रासायनिक प्रक्रिया पार पाडण्यात आली. या प्रक्रियेनंतर या वस्तू तब्बल १०० वर्षे टिकून राहणार होत्या. याला आता तीन वर्षे झाली आहेत; परंतु शांतिवन चिचोलीतील मुख्य संग्रहालयाची इमारत अजूनही अपूर्णच आहे. त्यामुळे या वस्तू संग्रहालयात न ठेवता कुलूपबंदच आहेत. त्यामुळे रासायनिक प्रक्रिया झाली असली तरी मोकळ्या हवामानात या वस्तू असल्याने त्या नष्ट होण्याची भीती आहे.

संग्रहालयाची भव्य इमारत उभी

शांतिवन चिचोलीसाठी सरकारने ४० कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार केला आहे. परंतु, अंतर्गत कामे रखडली आहेत. महामानवाच्या वस्तूंवर रासायनिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे त्या वस्तू कुलूपबंदच आहेत. या वस्तू लवकर संग्रहालयात स्थानांतरित झाल्या नाहीत तर त्या नष्ट होण्याचा धोका नाकारता येत नाही.

- संजय पाटील, कार्यवाह, भारतीय बौद्ध परिषद

टॅग्स :SocialसामाजिकnagpurनागपूरDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर