शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
4
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
5
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
6
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
8
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
9
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
10
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
11
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
12
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
13
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
14
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
15
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
16
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
17
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
18
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
19
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
20
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान; उपक्रमाच्या नावावर फक्त मनोरंजनात्मक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 11:13 AM

आनंद डेकाटे । लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : समाजात समता प्रस्थापित व्हावी, धर्म, जात, पंथ याचा विचार न करता ...

ठळक मुद्देदोन वर्षात १० कोटीवर खर्चप्रतिष्ठान उभे झाले, समतेच्या प्रयत्नांचे काय?

आनंद डेकाटे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजात समता प्रस्थापित व्हावी, धर्म, जात, पंथ याचा विचार न करता एकूणच सर्व सामाजाचे कल्याण व्हावे, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. याचा उद्देश अतिशय चांगला असला तरी दोन वर्षात एकही ठोस उपक्रम प्रतिष्ठानने राबवलेला नाही. उपक्रमाच्या नावावर केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम सुरु असून त्यावर तब्बल १० कोटीवर रुपये खर्च झाले आहे. त्यामुळे प्रतिष्ठान ठाकले पण समतेच्या प्रयत्नांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानची निर्मिती करण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतला. १५ आॅक्टोबर २०१५ रोजी तसा शासन आदेशही जारी केला. दोन वर्षानंतर १० जुलै २०१७ रोजी या प्रतिष्ठानची निर्मिती झाली. हे प्रतिष्ठान कंपनी कायदा २०१३ च्या ८ (१) (ंए) अंतर्गत कुठलाही नफा न कमविण्याच्या तत्त्वावर स्थापन करण्यात आले आहे. नागपूरची दीक्षाभूमी ही जगला समतेचा संदेश देणारी ऊर्जाभूमी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. म्हणूनच समता प्रतिष्ठानाचे मुख्यालय हे नागपूर येथे करण्यात आले आहे. सामाजिक न्याय भवनात त्याचे मुख्यालय आहे.समाजातील सर्वच दुर्बल घटकांना तसेच शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या प्रदेशातील जनतेला उच्च दर्जाचे शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण मिळावे. समताधिष्ठित मूल्यशिक्षण जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने वाचनालय, अभ्यास कक्ष, संशोधन संस्था, शैक्षणिक केंद्र इत्यादींची स्थापना करणे. समताधिष्ठित राष्ट्र निर्मितीस आवश्यक अशा सामाजिक व आर्थिक मुद्यांवर भाषणे, कार्यशाळा, चर्चासत्र आयोजित करणे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैयक्तिक कागदपत्रे व इतर ऐतिहासिक सामुग्रींचा संग्रह करणे. समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीकरिता कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था, खासगी संस्था इत्यादींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आवश्यक योजना निर्माण करणे.परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाºया गरजवंत व पात्र अशा भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व संशोधनासाठी फेलोशीप, शिष्यवृत्ती जाहीर करणे, इयत्ता दहावीपासून ते सर्वोच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप व शिष्यवृत्ती जाहीर करणे आदी सामाजिक उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून राबवावयाचे आहे. उद्देश चांगला आहे. परंतु उपक्रमाच्या नावावर केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम सुरु आहे. मनोरंजनाचा कार्यक्रम हा उपक्रमाचा एक भाग असू शकतो. परंतु तो उपक्रम नाही. उपक्रम राबवण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता आहे.उदाहरणार्थ तज्ज्ञ मंडळींची नियुक्ती, सल्ला आदी गोष्टीही झालेल्या नाही. मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षात प्रतिष्ठानने १० कोटी रुपये खर्च केले. मात्र हा सर्व खर्च केवळ मनोरंजनात्मक कामांवरच अधिक झाल्याचे दिसून येते.

मुख्यालयात कार्यालय प्रमुखच नाहीदीक्षाभूमी जवळील सामाजिक न्याय भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे मुख्यालय आहे. मुख्यालयतील कामकाज पाहण्यासाठी कार्यालय प्रमुखच नाही. सर्व प्रभारींच्या भरवशावर सुरु आहे. प्रतिष्ठानच्या कामासाठी आवश्यक पदनिश्चिती अद्याप झाली नसल्याची माहिती आहे. तेव्हा कामे कशी होणार, उपक्रम कसे राबवणार.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर