शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भीमराया...उदंड केलीस अमुच्यावरती माया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 10:13 IST

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागपुरात उत्साहात साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देमहामानवाला अभिवादन दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, संविधान चौक, शांतिवन चिचोली येथे लोटला भीमसागर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब म्हणजे समानतेचे, न्यायाचे व ज्ञानाचे प्रतीक. अन्याय, अत्याचार आणि विषमतेविरूद्ध त्यांनी बांधलेल्या वज्रमुठीमुळे या देशातील तमाम दीन, दलित समाजाला समानतेचा अधिकार मिळाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे उपकार आजही अनुयायांच्या मनामनात कोरले आहेत. या महामानवाच्या जयंतीनिमित्त तमाम शोषित, पीडित, वंचित, दीनदु:खी, बहुजनांच्या मनात ‘बलिदानाचे कफन बांधून झिजला तू भीमराया, माय पित्याहून उदंड केलीस अमुच्यावरती माया...’ ही भावना दाटून आली होती.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नागपुरात उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील प्रत्येक भागात, वस्त्यांमध्ये ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली होती. कुणी केक कापून तर कुणी बुद्ध भीम गीते आणि जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. वस्त्यांवस्त्यांमधील बौद्ध विहारांनी रॅली काढून महामानवास मानवंदना दिली. दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, संविधान चौक आणि शांतिवन चिचोली येथे मोठ्या प्रमाणावर जनसागर लोटला होता. विविध राजकीय पक्ष, सामाजिक, धार्मिक संघटनांनीसुद्धा महामानवास अभिवादन केले.दीक्षाभूमीवर महामानवाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली. येथे दोन दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दीक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने सकाळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळीही मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.कामठी येथील जगविख्यात ड्रॅगन पॅलेसही आकर्षक रोषणाईने सजवण्यात आले होते. सकाळी भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी राज्यमंत्री राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाच्या सदस्य अ‍ॅड. सुलेखा कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होत्या. शांतिवन चिचोली येथेही लोकांनी एकत्र येऊन अभिवादन केले.संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मानवंदना देण्यासाठी राजकीय पक्षांसह विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती