शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

डॉ. माशेलकर यांना नागार्जुन तर नांबिनारायणन यांना आचार्य भारद्वाज पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 22:04 IST

Nagpur News देशातील नामवंत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना नागार्जुन, तर एस. नांबिनारायणन यांना आचार्य भारद्वाज पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

-नागपूर : देशातील नामवंत शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना नागार्जुन, तर एस. नांबिनारायणन यांना आचार्य भारद्वाज पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

हिंदू रिसर्च फाउंडेशन आणि मैत्री परिवारच्या वतीने देण्यात येणाऱ्या या पुरस्काराची घोषणा हिंदू रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. टी. एस. भाल यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली.

पुरस्कार प्रदान सोहळा ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आयटी पार्क, पर्सिस्टंट सिस्टीमच्या कवी कुलगुरू कालिदास सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाईल. या वेळी कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. मधुसूदन पेन्ना व वर्ल्ड हिंदू काँग्रेसचे संस्थापक स्वामी विद्यानंद प्रामुख्याने उपस्थित राहतील.

भारतात अनेक थोर विचारवंत व शास्त्रज्ञ असलेले ऋषीमुनी होऊन गेले. त्यांच्या कार्याची जगाला पुन्हा एकदा नव्याने ओळख व्हावी, या उद्देशाने त्यांच्या नावाने विविध क्षेत्रांतील नामवंत शास्त्रज्ञांना पुरस्कृत करण्याचा निर्णय हिंदू रिसर्च फाउंडेशनने घेतला आहे. संस्थेचे हे पहिले वर्ष आहे. पुढच्या वर्षीपासून आचार्य कपिल, भास्कराचार्य, आचार्य चराक, आचार्य सुश्रुत, आर्यभट्ट, आचार्य पतंजली, विश्वकर्मा, आचार्य चाणक्य, महर्षी व्यास, महर्षी वाल्मीक, कवी कुलगुरू कालिदास आदी ऋषीमुनींच्या नावानेसुद्धा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला मैत्री परिवाराचे सचिव प्रमोद पेंडके, उपाध्यक्ष प्रा. विजय शहाकार, हर्षवर्धन देशमुख व अभिषेक चच्चा उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक