शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

आंबा बाजारात पण दुप्पट भाव; गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्के कमी आवक

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 9, 2024 15:32 IST

विदर्भात आंध्रप्रदेशच्या बैंगनपल्ली आंब्याची सर्वाधिक आवक होते. पण यंदा उशीर झाला आहे

नागपूर : उन्हाळा आणि आंब्याचा रस हे समीकरण आहे. पिकलेले आंब्याने जिभेला पाणी सुटले नाही तर नवलच. मात्र, सध्या आंब्याच्या रसावर ताव मारणाऱ्यांना यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. विदर्भात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले आहे. 

शेजारच्या राज्यातून मुख्यत्त्वे अनंतपूर जिल्ह्यातून (आंध्रप्रदेश) येणाऱ्या आंब्यांची आवकही कमी आहे. सुरुवातीला डिसेंबर महिन्यात कळमना फ्रूट बाजारात बैंगनपल्लीचे भाव १५० रुपयांवर गेले होते. सध्या दररोज बैंगनपल्ली आंब्याच्या दीड ते २ हजार क्रेट (एक क्रेट २० किलो) विक्रीसाठी येत असून भाव दर्जानुसार प्रतिकिलो ७० ते १०० रुपयांपर्यंत उतरले आहेत. सध्या केवळ बैंगनपल्ली आंब्याची आवक आहे. दरवाढीमुळे बाजारात दाखल झालेला आंबा खाण्यास परवडणारा नाही.

कळमना फ्रूट अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, आंध्रप्रदेशात दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाअभावी आंब्याचे उत्पादन २० ते २५ टक्के कमी राहण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून सुरू झालेली आवक मेपर्यंत राहील. सध्या सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी आंब्याची आवक आहे. सध्या कळमन्यात भाव ७० ते १०० रुपये किलो असून किरकोळमध्ये दुप्पट भावात विक्री होत आहे. बैंगनपल्ली आंबा कळमन्यातून मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात विक्रीसाठी जात आहे.किरकोळमध्ये १५० ते १८० रुपये किलोयंदाच्या मोसमात केवळ आंध्रप्रदेशचा बैंगनपल्ली आंबा कळमन्यात विक्रीसाठी आला आहे. घाऊक बाजारात भाव ७० ते १०० रुपये किलो आहेत. किरकोळमध्ये दुप्पट भावात खरेदी करावा लागत आहे. आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील. दोन वर्षांआधी हंगामाअखेरीस किरकोळमध्ये बैंगनपल्लीचे भाव ४० ते ५० रुपये किलोपर्यंत कमी झाले होते. कोकणचा हापूस आणि विदर्भातील गावरानी आंबा येण्यास उशीर आहे.

वारा, अवकाळी पावसाने नुकसानविदर्भात नागपूर जिल्हा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ बुलढाणा, भंडारा, गोंदिया या भागात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात गळाला. काही ठिकाणी तर झाडाला लागलेल्या कैऱ्याही पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे.

भाव कमी कधी होणार?विदर्भात आंध्रप्रदेशच्या बैंगनपल्ली आंब्याची सर्वाधिक आवक होते. पण यंदा उशीर झाला आहे. आंब्याचा हंगाम नोव्हेंबर अखेरपासून मे महिन्यापर्यंत असतो. किरकोळमध्ये भाव १५० ते १८० रुपये किलो आहेत. दोन वर्षांआधी हंगामाअखेर भाव ४० ते ५० रुपयांवर आले होते. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात आंब्याचे भाव कमी होतील.कोकणातून आंबा येण्यास उशीरआंध्रप्रदेशातून येणारे बैगनफल्ली, तोताफल्ली आणि निलम आंब्यांची आवकही गेल्या काही वर्षांपासून कमी होत आहे. नैसर्गिक संकटांचा आंब्याला फटका बसला आहे. रसाचे आंबेही महागले आहेत. सध्या कळमना बाजारात केवळ बैंगनपल्ली आंब्याची आवक आहे. कोकणातून हापूस आंबा येण्यास एक महिन्याचा कालावधी आहे.

यावर्षी विदर्भासह अनेक राज्यात गारपीटीमुळे आंब्याचा बार झडला आहे. त्यामुळे यंदा २० ते २५ टक्के आवक कमी राहील. त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमीच आहे. सध्या आंध्रप्रदेशातून बैंगनपल्ली आंब्याची आवक सुरू आहे. पुढील महिन्यात सर्वच प्रकारचे आंबे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील. - आनंद डोंगरे, अध्यक्ष, कळमना फ्रूट अडतिया असोसिएशन.

टॅग्स :Mangoआंबा