शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

आंबा बाजारात पण दुप्पट भाव; गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्के कमी आवक

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 9, 2024 15:32 IST

विदर्भात आंध्रप्रदेशच्या बैंगनपल्ली आंब्याची सर्वाधिक आवक होते. पण यंदा उशीर झाला आहे

नागपूर : उन्हाळा आणि आंब्याचा रस हे समीकरण आहे. पिकलेले आंब्याने जिभेला पाणी सुटले नाही तर नवलच. मात्र, सध्या आंब्याच्या रसावर ताव मारणाऱ्यांना यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. विदर्भात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले आहे. 

शेजारच्या राज्यातून मुख्यत्त्वे अनंतपूर जिल्ह्यातून (आंध्रप्रदेश) येणाऱ्या आंब्यांची आवकही कमी आहे. सुरुवातीला डिसेंबर महिन्यात कळमना फ्रूट बाजारात बैंगनपल्लीचे भाव १५० रुपयांवर गेले होते. सध्या दररोज बैंगनपल्ली आंब्याच्या दीड ते २ हजार क्रेट (एक क्रेट २० किलो) विक्रीसाठी येत असून भाव दर्जानुसार प्रतिकिलो ७० ते १०० रुपयांपर्यंत उतरले आहेत. सध्या केवळ बैंगनपल्ली आंब्याची आवक आहे. दरवाढीमुळे बाजारात दाखल झालेला आंबा खाण्यास परवडणारा नाही.

कळमना फ्रूट अडतिया असोसिएशनचे अध्यक्ष आनंद डोंगरे म्हणाले, आंध्रप्रदेशात दरवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाअभावी आंब्याचे उत्पादन २० ते २५ टक्के कमी राहण्याचा अंदाज आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपासून सुरू झालेली आवक मेपर्यंत राहील. सध्या सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी आंब्याची आवक आहे. सध्या कळमन्यात भाव ७० ते १०० रुपये किलो असून किरकोळमध्ये दुप्पट भावात विक्री होत आहे. बैंगनपल्ली आंबा कळमन्यातून मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात विक्रीसाठी जात आहे.किरकोळमध्ये १५० ते १८० रुपये किलोयंदाच्या मोसमात केवळ आंध्रप्रदेशचा बैंगनपल्ली आंबा कळमन्यात विक्रीसाठी आला आहे. घाऊक बाजारात भाव ७० ते १०० रुपये किलो आहेत. किरकोळमध्ये दुप्पट भावात खरेदी करावा लागत आहे. आवक वाढल्यानंतर भाव कमी होतील. दोन वर्षांआधी हंगामाअखेरीस किरकोळमध्ये बैंगनपल्लीचे भाव ४० ते ५० रुपये किलोपर्यंत कमी झाले होते. कोकणचा हापूस आणि विदर्भातील गावरानी आंबा येण्यास उशीर आहे.

वारा, अवकाळी पावसाने नुकसानविदर्भात नागपूर जिल्हा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ बुलढाणा, भंडारा, गोंदिया या भागात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात गळाला. काही ठिकाणी तर झाडाला लागलेल्या कैऱ्याही पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे.

भाव कमी कधी होणार?विदर्भात आंध्रप्रदेशच्या बैंगनपल्ली आंब्याची सर्वाधिक आवक होते. पण यंदा उशीर झाला आहे. आंब्याचा हंगाम नोव्हेंबर अखेरपासून मे महिन्यापर्यंत असतो. किरकोळमध्ये भाव १५० ते १८० रुपये किलो आहेत. दोन वर्षांआधी हंगामाअखेर भाव ४० ते ५० रुपयांवर आले होते. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात आंब्याचे भाव कमी होतील.कोकणातून आंबा येण्यास उशीरआंध्रप्रदेशातून येणारे बैगनफल्ली, तोताफल्ली आणि निलम आंब्यांची आवकही गेल्या काही वर्षांपासून कमी होत आहे. नैसर्गिक संकटांचा आंब्याला फटका बसला आहे. रसाचे आंबेही महागले आहेत. सध्या कळमना बाजारात केवळ बैंगनपल्ली आंब्याची आवक आहे. कोकणातून हापूस आंबा येण्यास एक महिन्याचा कालावधी आहे.

यावर्षी विदर्भासह अनेक राज्यात गारपीटीमुळे आंब्याचा बार झडला आहे. त्यामुळे यंदा २० ते २५ टक्के आवक कमी राहील. त्यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा आवक कमीच आहे. सध्या आंध्रप्रदेशातून बैंगनपल्ली आंब्याची आवक सुरू आहे. पुढील महिन्यात सर्वच प्रकारचे आंबे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होतील. - आनंद डोंगरे, अध्यक्ष, कळमना फ्रूट अडतिया असोसिएशन.

टॅग्स :Mangoआंबा