शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

नागपूर शहरात ‘लॉकडाऊन’ नकोच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 21:47 IST

‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी ‘लॉकडाऊन’ लावण्यास शहरातील लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. एकाच वेळी सारख्या विषयावर दोन ठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये हाच सूर दिसून आला. शहरात ‘लॉकडाऊन’ न लावता ‘स्मार्ट अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’ संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी ‘लॉकडाऊन’ लावण्यास शहरातील लोकप्रतिनिधींनी विरोध केला आहे. एकाच वेळी सारख्या विषयावर दोन ठिकाणी झालेल्या बैठकांमध्ये हाच सूर दिसून आला. शहरात ‘लॉकडाऊन’ न लावता ‘स्मार्ट अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली. तर प्रशासनाने ‘लॉकडाऊन’ लावल्यास जनतेसह रस्त्यावर उतरू, असा इशाराच महापौर संदीप जोशी यांनी दुसऱ्या बैठकीत दिला. एकूणच आता ‘लॉकडाऊन’च्या मुद्द्यावरून शहरातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.‘लॉकडाऊन’संदर्भात मनपाच्या सभागृहात दुपारी १२ वाजता पूर्वनियोजित बैठक होती व यात पुढील रूपरेषेवर चर्चा होणार होती. नेमकी याच वेळी पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार,पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक ग्रामीण राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर व डॉ. दीपक सेलोकर यावेळी उपस्थित होते.शहरी व ग्रामीण भागात वाढलेली मृत्यूसंख्या कमी करण्यावर भर देण्यात यावा. ‘लॉकडाऊन’ हा पर्याय नसून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळल्यास कोरोना नियंत्रणात येऊ शकतो. साथीच्या काळात स्वच्छतेसाठी खासगी एजन्सीमार्फ त मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. उद्योग व्यवसाय नुकतेच रुळावर आले असून आता अर्थ चक्राला गती देण्याची वेळ आहे. ‘लॉकडाऊन’ हा पर्याय नसून प्रशासन मृत्यूसंख्या कमी करणे व जनजागृती या विषयी काम करणार आहे. मात्र नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, हा आग्रह कायम राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.लोकप्रतिनिधी आक्रमकलोकप्रतिनिधींच्या बैठकीत ‘लॉकडाऊन’चा विरोधच करण्यात आला. ‘स्मार्ट लॉकडाऊन’चीदेखील आवश्यकता नसल्याचा बैठकीत सूर होता. पुढील बैठक ७ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजता घेण्याचे निश्चित करण्यात आले. या बैठकीला खा. विकास महात्मे, शहरातील भाजपचे सर्व आमदार, मनपा पदाधिकारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.प्रत्येक रुग्णाची ‘अ‍ॅण्टिजेन टेस्ट’वैद्यकीय उपचारासाठी मेडिकलमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची ‘अ‍ॅण्टिजेन टेस्ट’ करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. जनजागृतीसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मदत घेण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.पालकमंत्र्यांवर महापौरांचे टीकास्त्रमनपाची शुक्रवारी दुपारी बैठक होणार आहे यासंदर्भात पालकमंत्र्यांना माहिती होती. त्याच वेळी पालकमंत्र्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्याची गरज नव्हती. आम्हाला पूर्वकल्पना दिली असती तर आम्ही बैठक थोडी उशिरा घेतली असती. एकाच वेळी दोन बैठका झाल्यामुळे जनतेत चुकीचा संदेश गेला आहे. ‘कोरोना’च्या या काळात असे राजकारण करणे योग्य नाही, या शब्दांत महापौरांनी आपली नाराजी व्यक्त केली.लोकप्रतिनिधींच्या बैठकीला मुंढे गैरहजरमनपातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीला मनपा आयुक्त तुकाराम मुंढे पोहोचलेच नाहीत. ते पालकमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी याबाबत काहीही कळविले नाही. जर त्यांनी सांगितले असते तर बैठकीची वेळ बदलता आली असती. मात्र त्यांनी मनपाच्या बैठकीला पाठ दाखविणे योग्य नाही, असे म्हणत लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.सम-विषमचा नियम नकोजेथे १२ मीटरहून अधिक रुंदीचा रस्ता आहे तेथे सम-विषमचा नियम न लावता दोन्ही बाजूंची दुकाने उघडायला परवानगी दिली पाहिजे. शहरात दुकानदारांकडून अवैध पद्धतीने दंड वसुलण्यात येत आहे. याची स्थायी समितीकडून परवानगी घेण्यात आलेली नाही. मनपा प्रशासन व काही हॉटेल संचालकांचे साटेलोटे आहे. १४ दिवस ‘क्वॉरंटाईन’ ठेवून बिल वाढविण्यात येत असल्याचा आरोप महापौरांनी लावला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याguardian ministerपालक मंत्रीNitin Rautनितीन राऊत