शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला चोर ठरवू नका? : रेशन दुकानदारांची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:50 IST

१९६६ पासून आम्ही रेशन दुकानाच्या माध्यमातून सेवा देत आहोत. आणीबाणीच्या काळातही आम्ही सेवा दिल्या आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीतही आम्ही जीव धोक्यात घालून सेवा देत आहोत. तरीही आम्हाला चोर ठरविल्या जात आहे.

ठळक मुद्देजीव धोक्यात घालून देतोय सेवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १९६६ पासून आम्ही रेशन दुकानाच्या माध्यमातून सेवा देत आहोत. आणीबाणीच्या काळातही आम्ही सेवा दिल्या आहेत. कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीतही आम्ही जीव धोक्यात घालून सेवा देत आहोत. तरीही आम्हाला चोर ठरविल्या जात आहे. आमच्यावर अविश्वास दाखविला जात आहे. आमच्यासाठी सरकारने आखून दिलेले काही नियम आहेत. या नियमांच्या चौकटीतच आम्हाला काम करायचे आहे. त्यामुळे आम्हाला चोर ठरवू नका, अशी भावना रेशन दुकानदारांची आहे. सध्या रेशन दुकानांसंदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या आहेत. याचे नेमके काय कारण आहे, याबाबत विदर्भ रास्तभाव दुकानदार, केरोसिन विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांच्याशी केलेली चर्चा.रेशन कुणाला मिळते?नागपूर जिल्ह्यात १२८७ रेशन दुकानदार आहेत. तीन प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना रेशन दिले जाते. यात अंत्योदय कार्डधारकास ३५ किलो धान्य महिन्याला दिले जाते. बीपीएल कार्डधारकाला प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य दिले जाते. तर केशरी रंगाच्या सर्वच कार्डधारकांना रेशन मिळत नाही, त्यात प्राधान्य गटालाच प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य महिन्याला दिले जाते.प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना काय आहे?कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारने देशभरात लॉकडाऊन केले आहे. अशात गरिबांची उपासमार होऊ नये म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू केली आहे. यात प्रतिव्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहेत. परंतु ही योजना फक्त अंत्योदय, बीपीएल व केशरी (प्राधान्यगट) या कार्डधारकांसाठी आहे. या योजनेचा लाभ सध्यातरी कार्डधारकांनाच मिळतो आहे.निकृष्ट धान्य का मिळतेय?सध्या गव्हाचा जो पुरवठा झाला आहे तो २ ते ३ वर्षे जुना स्टॉक आहे. त्यामुळे गव्हाचा दर्जा थोडा सुमार आहे. रेशन दुकानदार स्वत:हुन निकृष्ट धान्य देत नाही.किटमुळे का होतोय वाद?पालकमंत्र्यांनी अंत्योदय कार्डधारकांसाठी १८ वस्तूंची किट रेशन दुकानाच्या माध्यमातून वाटप केली होती. ही किट फक्त अंत्योदय योजनेच्या कार्डधारकांसाठी होती. पण बीपीएल व प्राधान्य गटाच्या कार्डधारकांनीसुद्धा त्याची मागणी केली. तेथूनच रेशन दुकानात वादाला सुरुवात झाली.अचानक रेशन दुकानात गर्दी का वाढली?ज्यांच्याजवळ रेशनकार्ड आहे असे २५ टक्के लोक दुकानातून धान्य घेत नव्हते. असेही लोक आता धान्यासाठी येत आहेत. ज्यांच्याजवळ कार्ड आहे परंतु तो एपीएल गटात येत असल्याने त्यांना धान्य मिळत नाही, तेसुद्धा धान्य मागण्यासाठी येत आहे. काही लोक आधार कार्ड घेऊन धान्य मागत आहे. तर काही लोकांच्या कार्डची डाटा एन्ट्री झाली नाही, तेसुद्धा कार्ड घेऊन धान्य मागत आहे. त्यामुळे रेशन दुकानात गर्दी वाढली आहे.काळाबाजाराचा का होतो आरोप?रेशन दुकानदाराकडे कार्डाच्या हिशेबाने रेशनचा कोटो येतो. अतिरिक्त कोटा मिळत नाही. परंतु काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आमच्याकडे १ क्विंटल धान्याची मागणी करतात. आम्ही त्यांना पुरवू शकत नाही. म्हणून खोट्या तक्रारी करतात. कुठे मारहाणसुद्धा रेशन दुकानदारांना होत आहे. पोलिसातदेखील तक्रारी झाल्या आहे. प्रधानमंत्री कल्याण योजनेंतर्गत ८० टक्के पुरवठा झाला आहे. अजूनही २० टक्के व्हायचा आहे. जिथे धान्य पोहचले तिथे धान्याचे वाटप सुरू आहे. जिथे पोहचले नाही, तिथे धान्य आल्यास लगेच पुरवठा होणार आहे.शासनाकडून त्रास नाही?अन्न व पुरवठा विभाग अतिशय चोख काम करीत आहे. शासनाने आता ज्यांच्याजवळ कार्ड नाही, अशांचे आधार कार्ड व ज्यांच्याजवळ कार्ड आहे पण डाटा इंट्री झाली नाही, अशांचे कार्ड जमा करण्यास सांगितले आहे. एपीएल कार्ड धारकांनाही शासन १२ रुपये किलो तांदूळ व ८ रुपये किलो गहू उपलब्ध करून देणार आहे.सरकारी कर्मचारी दुकानात बसविले, काय कारण आहे?कदाचित सरकारचा आमच्यावर विश्वास नाही. पण आम्ही जीव धोक्यात घालून काम करतो आहे. आम्हालाही माणुसकी आहे. अशा परिस्थितीत आम्हीच काळाबाजार करणार नाही. तरीही सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना दुकानात बसविले, आम्हाला हरकत नाही. जे काळाबाजार करतात त्यांच्या तक्रारी करू शकता. पण बळजबरी आमच्यावर करू नका. दुकानाच्या वेळेसंदर्भात अडवणूक करू नका. कारण आम्हालाही आलेले धान्य वाटप करायचे आहे.रेशन दुकानावर तैनात एनसीसी कॅडेट्सकोरोना विषाणूच्या विरोधात सुरू असलेल्या लढाईत आता नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनसीसी)नेसुद्धा योगदान दिले आहे. एनसीसीच्या महासंचालकांनी ‘एनसीसी योगदान’ ही मोहीम राबविली आहे. या मोहिमेत एनसीसीची प्रशिक्षित मुले-मुली व्हॉलेन्टीअर म्हणून कोरोनाच्या लढाईत सहभागी होत आहेत. जिल्हा प्रशासनालासुद्धा एनसीसीने सहकार्य केले आहे. सध्या रेशन दुकानात होत असलेली गर्दी लक्षात घेता, कार्डधारकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी एनसीसीच्या कॅडेट्सची मदत घेतली आहे. एनसीसीचे ३५० कॅडेट्स व १६ अधिकारी शहरातील ९६ रेशन दुकानात तैनात झाले आहे.

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर