शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नका : शिक्षक संघटनांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 18:52 IST

कमी पटसंख्येच्या नावावर शाळांचे समायोजन करून, शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमी पटसंख्येच्या नावावर शाळांचे समायोजन करून, शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.यातील बहुतेक शाळा या दुर्गम भागातील असून तेथील विद्यार्थ्यांकरिता जवळपासच्या परिसरात शिक्षणाची दुसरी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. बालकांच्या शिक्षणाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार प्रत्येक बालकाला १ किमी अंतराच्या आत प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे, ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला इयत्ता १ ते ५ वीपर्यंतचे शिक्षण १ किमी अंतराच्या आत पर्यायाने गावातच उपलब्ध होणे अनिवार्य आहे. शाळा बंद झाल्या तर येथील विद्यार्थ्यांना परिसरात शिक्षणाची सुविधाच उपलब्ध होणार नाही. हा निर्णय बालकांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेणारा असून, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे, सरचिटणीस अनिल नासरे यांच्यासह दिनकर उरकांदे, विलास काळमेघ, सुरेश श्रीखंडे, हेमंत तितरमारे, मीनल देवरणकर, नीळकंठ लोहकरे, प्रकाश सव्वालाखे, सुरेंद्र कोल्हे, पुष्पा पानसरे, कल्पना इंगळे, नंदकिशोर वंजारी आदींनी केली आहे. यासंदर्भात जि.प.चे सीईओ योगेश कुंभेजकर यांना निवेदनही दिले आहे.सीईओंना दिले निवेदनअखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे यांनीसुद्धा यासंदर्भात सीईओंना निवेदन पाठविले. संघटनेच्या मते, कमी पटसंख्येच्या शाळा बहुतांश दुर्गम व अतिदुर्गम भागातील आहेत. अनेक गावात जायला बारमाही रस्ते नाही, वाहतुकीचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. शाळेत बहुतांश गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची मुले शिक्षण घेतात. हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे.

टॅग्स :Schoolशाळा