शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

कमी पटसंख्येच्या शाळा बंद करू नका : शिक्षक संघटनांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 18:52 IST

कमी पटसंख्येच्या नावावर शाळांचे समायोजन करून, शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कमी पटसंख्येच्या नावावर शाळांचे समायोजन करून, शाळा बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका, अशी मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे.यातील बहुतेक शाळा या दुर्गम भागातील असून तेथील विद्यार्थ्यांकरिता जवळपासच्या परिसरात शिक्षणाची दुसरी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. बालकांच्या शिक्षणाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार प्रत्येक बालकाला १ किमी अंतराच्या आत प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे, ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला इयत्ता १ ते ५ वीपर्यंतचे शिक्षण १ किमी अंतराच्या आत पर्यायाने गावातच उपलब्ध होणे अनिवार्य आहे. शाळा बंद झाल्या तर येथील विद्यार्थ्यांना परिसरात शिक्षणाची सुविधाच उपलब्ध होणार नाही. हा निर्णय बालकांचा शिक्षणाचा हक्क हिरावून घेणारा असून, गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे, सरचिटणीस अनिल नासरे यांच्यासह दिनकर उरकांदे, विलास काळमेघ, सुरेश श्रीखंडे, हेमंत तितरमारे, मीनल देवरणकर, नीळकंठ लोहकरे, प्रकाश सव्वालाखे, सुरेंद्र कोल्हे, पुष्पा पानसरे, कल्पना इंगळे, नंदकिशोर वंजारी आदींनी केली आहे. यासंदर्भात जि.प.चे सीईओ योगेश कुंभेजकर यांना निवेदनही दिले आहे.सीईओंना दिले निवेदनअखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष धनराज बोडे यांनीसुद्धा यासंदर्भात सीईओंना निवेदन पाठविले. संघटनेच्या मते, कमी पटसंख्येच्या शाळा बहुतांश दुर्गम व अतिदुर्गम भागातील आहेत. अनेक गावात जायला बारमाही रस्ते नाही, वाहतुकीचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. शाळेत बहुतांश गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची मुले शिक्षण घेतात. हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका आहे.

टॅग्स :Schoolशाळा