शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचताच आयसीसीने धमाका करून टाकला! ऑस्ट्रेलिया संघ बघतच राहिला...
2
संजय राऊत दोन महिने राहणार सार्वजनिक जीवनापासून दूर, समोर आलं चिंताजनक कारण, निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाची चिंता वाढली
3
IND vs AUS :हेजलवूडचा भेदक मारा! तिलक वर्माच्या पदरी भोपळा; ४९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत
4
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
5
राज ठाकरेंच्या मनसेचं उद्धवसेनेत विलिनीकरण होणार?; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा, 'तो' फोटो दाखवला
6
"बुलडोजरनं चिरडून 'त्यांना' 'जहन्नुम'मध्ये...", बिहारमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
7
Vastu Tips: खिडकीत, अंगणात पोपटाचे येणे हे तर लक्ष्मी कृपेचे शुभ चिन्ह; पाहा वास्तू संकेत!
8
अपहरणाचा सीन, फिल्म प्रोजेक्ट..., रोहित आर्याने मराठी अभिनेत्रीला केलेला मेसेज; स्क्रीनशॉट दाखवत म्हणाली....
9
महिलांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये लग्न पत्रिका आली, क्लिक करताच फोन हँग झाला अन्...; नव्या सायबर ट्रॅपने उडवली झोप!
10
आता घरबसल्या करा आधार कार्ड अपडेट; 'ई-आधार ॲप' लवकरच लॉन्च, काय-काय बदलता येणार?
11
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
12
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
13
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
14
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
15
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
16
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
17
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
18
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
19
विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...
20
आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप

‘एआय’ची भीती नकाे, ते आत्मसात करा, संधीचे जग खुले हाेईल

By निशांत वानखेडे | Updated: September 15, 2025 20:40 IST

डॉ. अभय करंदीकर : व्हीएनआयटीचा २३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात

नागपूर : कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आल्यामुळे तरुणांमध्ये नोकऱ्या हिरावून जाण्याची भीती आहे. मात्र एआय, मशिन लर्निंग किंवा डाटा सायन्स हे जग बदलणारे तंत्रज्ञान आहे आणि औद्योगिक क्रांतीप्रमाणे माहिती तंत्रज्ञान क्रांतीनेही नोकरीच्या संधी हिरावण्यापेक्षा अधिक संधी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे त्याची भीती बाळगण्यापेक्षा अभियंते, शास्त्रज्ञांनी ते आत्मसात करण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे जगभरातील संधीची दालने खुली हाेतील, असे आवाहन भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. अभय करंदीकर यांनी केले.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (व्हीएनआयटी) २३ वा दीक्षांत समारंभ साेमवारी उत्साहात पार पडला. याप्रसंगी व्हीएनआयटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मदभूषी मदन गोपाल, व्हीएनआयटीचे संचालक प्रा. प्रेमलाल पटेल, अधिष्ठाता प्रा. विलास कळमकर उपस्थित होते. यावेळी पदवीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शेनय सिद्धेशविनय यांना सर विश्वेश्वरय्या पदकाने सन्मानित करण्यात आले.

डॉ. अभय करंदीकर पुढे म्हणाले, कृत्रिम बुद्धीमत्ता मानवी सर्जनशीलतेचा पर्याय नाही; ती एक सक्षम करणारी गोष्ट आहे. ती तुम्हाला मोठ्या डेटाचे विश्लेषण करण्यास, आधुनिक गोष्टी तयार करण्यास आणि सर्व क्षेत्रांमध्ये उत्पादकता वाढवण्यास मदत करू शकते. परंतु ते तुमच्या सुज्ञपणावर अवलंबून आहे. या नवीन युगात तांत्रिक कौशल्येच नव्हे, तर अनुकूलता, नीतिमत्ता आणि सर्जनशीलता महत्त्वाची आहे. यंत्रे नमुना तयार करू शकतात. परंतु निर्णय घेण्याची क्षमता मनुष्यातच असल्याचे डॉ. करंदीकर म्हणाले. मदभूषी मदन गोपाल म्हणाले, यश पदांवर किंवा पदव्यांवरून मोजले जाणार नाही तर तुम्ही इतरांच्या जीवनात किती प्रभाव पाडता यावर अवलंबून असेल. सचोटी, सर्जनशीलता आणि करुणेने भारताची सेवा करा, असे आवाहन त्यांनी केले.

विज्ञान आणि तंत्रज्ञानात महिलांच्या नेतृत्वात वाढ

विज्ञान आणि तंत्रज्ञानात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील होणारी प्रगती ही भारताचे भविष्य घडवणारी वास्तविकता आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे, ज्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सरकारने महिला वैज्ञानिक योजना आणि परिवर्तनशील संस्थांसाठी विविध उपक्रमांद्वारे महिलांना संशोधन आणि मार्गदर्शनाची संधी मिळाल्याचे डाॅ. करंदीकर म्हणाले.

१२२७ पदव्या प्रदान

व्हीएनआयटीच्या २३ व्या दीक्षांत समारंभात एकूण १२२७ पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ७० डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये २७१ मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, १ मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (संशोधनाद्वारे), विविध विज्ञान शाखांमध्ये ६३ मास्टर ऑफ सायन्स, विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये ७६३ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आणि ५९ बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पदव्या समाविष्ट आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स