शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘एआय’ची भीती नकाे, ते आत्मसात करा, संधीचे जग खुले हाेईल

By निशांत वानखेडे | Updated: September 15, 2025 20:40 IST

डॉ. अभय करंदीकर : व्हीएनआयटीचा २३ वा दीक्षांत समारंभ उत्साहात

नागपूर : कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) आल्यामुळे तरुणांमध्ये नोकऱ्या हिरावून जाण्याची भीती आहे. मात्र एआय, मशिन लर्निंग किंवा डाटा सायन्स हे जग बदलणारे तंत्रज्ञान आहे आणि औद्योगिक क्रांतीप्रमाणे माहिती तंत्रज्ञान क्रांतीनेही नोकरीच्या संधी हिरावण्यापेक्षा अधिक संधी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे त्याची भीती बाळगण्यापेक्षा अभियंते, शास्त्रज्ञांनी ते आत्मसात करण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे जगभरातील संधीची दालने खुली हाेतील, असे आवाहन भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव डॉ. अभय करंदीकर यांनी केले.

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (व्हीएनआयटी) २३ वा दीक्षांत समारंभ साेमवारी उत्साहात पार पडला. याप्रसंगी व्हीएनआयटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मदभूषी मदन गोपाल, व्हीएनआयटीचे संचालक प्रा. प्रेमलाल पटेल, अधिष्ठाता प्रा. विलास कळमकर उपस्थित होते. यावेळी पदवीमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या शेनय सिद्धेशविनय यांना सर विश्वेश्वरय्या पदकाने सन्मानित करण्यात आले.

डॉ. अभय करंदीकर पुढे म्हणाले, कृत्रिम बुद्धीमत्ता मानवी सर्जनशीलतेचा पर्याय नाही; ती एक सक्षम करणारी गोष्ट आहे. ती तुम्हाला मोठ्या डेटाचे विश्लेषण करण्यास, आधुनिक गोष्टी तयार करण्यास आणि सर्व क्षेत्रांमध्ये उत्पादकता वाढवण्यास मदत करू शकते. परंतु ते तुमच्या सुज्ञपणावर अवलंबून आहे. या नवीन युगात तांत्रिक कौशल्येच नव्हे, तर अनुकूलता, नीतिमत्ता आणि सर्जनशीलता महत्त्वाची आहे. यंत्रे नमुना तयार करू शकतात. परंतु निर्णय घेण्याची क्षमता मनुष्यातच असल्याचे डॉ. करंदीकर म्हणाले. मदभूषी मदन गोपाल म्हणाले, यश पदांवर किंवा पदव्यांवरून मोजले जाणार नाही तर तुम्ही इतरांच्या जीवनात किती प्रभाव पाडता यावर अवलंबून असेल. सचोटी, सर्जनशीलता आणि करुणेने भारताची सेवा करा, असे आवाहन त्यांनी केले.

विज्ञान आणि तंत्रज्ञानात महिलांच्या नेतृत्वात वाढ

विज्ञान आणि तंत्रज्ञानात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील होणारी प्रगती ही भारताचे भविष्य घडवणारी वास्तविकता आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे, ज्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. सरकारने महिला वैज्ञानिक योजना आणि परिवर्तनशील संस्थांसाठी विविध उपक्रमांद्वारे महिलांना संशोधन आणि मार्गदर्शनाची संधी मिळाल्याचे डाॅ. करंदीकर म्हणाले.

१२२७ पदव्या प्रदान

व्हीएनआयटीच्या २३ व्या दीक्षांत समारंभात एकूण १२२७ पदव्या प्रदान करण्यात आल्या. यामध्ये ७० डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी, विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये २७१ मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, १ मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी (संशोधनाद्वारे), विविध विज्ञान शाखांमध्ये ६३ मास्टर ऑफ सायन्स, विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये ७६३ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी आणि ५९ बॅचलर ऑफ आर्किटेक्चर पदव्या समाविष्ट आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स